शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

छळाच्या गुन्ह्यांत सर्वांनाच आरोपी करण्याची प्रवृत्ती वाढली; दिल्ली हायकोर्टाने व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 10:24 IST

कौटुंबिक विवादांच्या गुन्ह्यांत अल्पवयीनांसह सासरच्या सर्व नातेवाइकांना गोवण्याची प्रवृत्ती महिलांमध्ये वाढत आहे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

डॉ. खुशालचंद बाहेती, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : कौटुंबिक विवादांच्या गुन्ह्यांत अल्पवयीनांसह सासरच्या सर्व नातेवाइकांना गोवण्याची प्रवृत्ती महिलांमध्ये वाढत आहे, असे दिल्लीउच्च न्यायालयाने म्हटले आहे.

४९८ अ दाखल असल्यामुळे नोकरीत न घेण्याचे प्रकरण न्यायालयात होते. एप्रिल २०१७ मध्ये विक्रम राहुल यांची उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली. नेमणुकीचा आदेश मिळण्यापूर्वीच ऑक्टोबर २०१८ मध्ये त्यांच्या वहिनीने त्यांच्या कुटुंबातील सर्वांविरुद्ध कलम ४९८ (अ) आयपीसी अंतर्गत गुन्हा नोंदवला. नोव्हेंबर २०१९ मध्ये पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. यात त्यांना संशयित आरोपी परंतु सध्या खटला चालवण्याइतके पुरावे नाहीत असे दाखवण्यात आले. 

खटल्याच्या अंतिम निर्णयापर्यंत त्यांची नेमणूक प्रलंबित ठेवण्यात आली. याविरुद्ध केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात केलेले अपील फेटाळण्यात आले आणि प्रकरण हायकोर्टात पोहोचले. केवळ एफआयआरमध्ये नाव असल्याने नोकरीला अनिश्चित काळासाठी स्थगिती देऊ शकत नाही, असे मत व्यक्त करत हायकोर्टाने पीएसआय म्हणून नियुक्त करण्याचे निर्देश दिले आणि कौटुंबिक कलहाच्या गुन्ह्यांत पतीच्या कुटुंबातील सर्वांना ओढण्याच्या प्रवृत्तीवर हायकोर्टाने टीका केली.

काय म्हणाले न्यायालय?

न्यायमूर्ती व्ही. कामेश्वर राव आणि अनुप कुमार मेंदिरट्टा यांनी सांगितले की, वैवाहिक विवादाच्या संदर्भात एफआयआरमध्ये अल्पवयीन मुलांसह सर्व नातेवाइकांना गोवण्याची प्रवृत्ती महिलांमध्ये वाढत आहे. 

अशा तक्रारी पुढे कुटुंबांमध्ये निकाली काढल्या जातात आणि नंतर क्षुल्लक मुद्द्यांवरून त्या दाखल केल्याचे सांगितले जाते. ४९८ अ चा मोठ्या प्रमाणात गैरवापर यापू्र्वीही लक्षात आला आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीHigh Courtउच्च न्यायालय