शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

उसाच्या एफआरपीत २०० रुपये वाढ, महाराष्ट्रात टनाला २,६३७ रुपये शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 04:20 IST

केंद्र सरकारने २०१८-१९च्या साखर हंगामासाठी उसाच्या एफआरपीत (किमान आधारभूत किंमत) टनाला २०० रुपये वाढ करण्याचा तसेच एफआरपीसाठी उसाचा पायाभूत उतारा ९.५ टक्क्यांवरून १० टक्के करण्याचा निर्णय बुधवारी घेतला.

नवी दिल्ली /कोल्हापूर : केंद्र सरकारने २०१८-१९च्या साखर हंगामासाठी उसाच्या एफआरपीत (किमान आधारभूत किंमत) टनाला २०० रुपये वाढ करण्याचा तसेच एफआरपीसाठी उसाचा पायाभूत उतारा ९.५ टक्क्यांवरून १० टक्के करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. नव्या दरानुसार महाराष्ट्रात उसाचा सरासरी उतारा ११.५ गृहित धरला तर उसाला प्रतिटन एफआरपी २६३७ रुपये इतकी निश्चित होऊ शकते.आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्राने अलीकडेच खरिपाच्या १४ पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ केली आहे. त्याचवेळी उसाच्या एफआरपीतही वाढ करण्याचे सूतोवाच केले होते. कृषीमूल्य आयोगानेही २७५० रुपये एफआरपीची शिफारस केली होती. ती आज मान्य करण्यात आली. २०१७-१८च्या हंगामासाठी एफआरपी २५५० रुपये होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीची बैठक झाली. या बैठकीत उसाचा सरासरी उतारा १० टक्के हा पायाभूत धरून प्रतिक्विंटल २७५ रुपये दर देण्याला मान्यता देण्यात आली. १० टक्क्यांपेक्षा अधिक होणाऱ्या उताºयाला प्रति १ टक्का २७५ रुपये जादा दर देण्याला मान्यता देण्यात आली. यामुळे शेतकºयांना ८३ हजार कोटी रुपये जादा मिळतील. ज्या कारखान्यांचा उतारा ९.५ पेक्षा कमी आहे, त्या कारखान्यांकडून शेतकºयांना प्रतिक्विंटल २६१.२५ रुपये दर दिला जाईल. यामध्ये कसलीही कपात असणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान, केंद्र सरकारने जाहीर केलेली एफआरपी साखर कारखान्यांना परवडणारी नाही. त्यासाठी साखरेला किमान ३५०० रुपये क्विंटल दर मिळायला हवा असे इस्माचे महासंचालक अभिनाश वर्मा यांनी म्हटले आहे.>असा मिळेल दरराज्यातील उसाला प्रतिटन ११.५ टक्के साखर उतारा गृहीत धरला तर २७७५ यात जादा १.५ टक्क्यांचे ४१२ रुपये ५० पैसे मिळविले असता ३१८७ रुपये ५० पैसे एफआरपी होतो. यातून तोडणी-वाहतुकीचे प्रतिटन ५५० रुपये वजा केले असता शेतकºयाला २६३७ रुपये प्रतिटन एफआरपी मिळेल.उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा ही राज्ये स्वत:चा उसाचा किमान दर जाहीर करतात. त्याला स्टेट अ‍ॅडव्हायझरी प्राईस असे म्हटले जाते. केंद्राच्या आजच्या निर्णयामुळे या राज्यांनाही आपल्या स्टेट अ‍ॅडव्हायझरी प्राईसमध्ये वाढ करावी लागण्याची शक्यता आहे.देशात यंदा साखरेचे उच्चांकी ३२२ लाख टन उत्पादन झाले आहे. चांगल्या पावसामुळे २०१८-१९ मध्ये हेच साखर उत्पादन ३५० लाख टनावर जाईल, असा अंदाज ‘इस्मा’ या संस्थेने वर्तविला आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने