शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

उसाच्या एफआरपीत २०० रुपये वाढ, महाराष्ट्रात टनाला २,६३७ रुपये शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 04:20 IST

केंद्र सरकारने २०१८-१९च्या साखर हंगामासाठी उसाच्या एफआरपीत (किमान आधारभूत किंमत) टनाला २०० रुपये वाढ करण्याचा तसेच एफआरपीसाठी उसाचा पायाभूत उतारा ९.५ टक्क्यांवरून १० टक्के करण्याचा निर्णय बुधवारी घेतला.

नवी दिल्ली /कोल्हापूर : केंद्र सरकारने २०१८-१९च्या साखर हंगामासाठी उसाच्या एफआरपीत (किमान आधारभूत किंमत) टनाला २०० रुपये वाढ करण्याचा तसेच एफआरपीसाठी उसाचा पायाभूत उतारा ९.५ टक्क्यांवरून १० टक्के करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. नव्या दरानुसार महाराष्ट्रात उसाचा सरासरी उतारा ११.५ गृहित धरला तर उसाला प्रतिटन एफआरपी २६३७ रुपये इतकी निश्चित होऊ शकते.आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्राने अलीकडेच खरिपाच्या १४ पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ केली आहे. त्याचवेळी उसाच्या एफआरपीतही वाढ करण्याचे सूतोवाच केले होते. कृषीमूल्य आयोगानेही २७५० रुपये एफआरपीची शिफारस केली होती. ती आज मान्य करण्यात आली. २०१७-१८च्या हंगामासाठी एफआरपी २५५० रुपये होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीची बैठक झाली. या बैठकीत उसाचा सरासरी उतारा १० टक्के हा पायाभूत धरून प्रतिक्विंटल २७५ रुपये दर देण्याला मान्यता देण्यात आली. १० टक्क्यांपेक्षा अधिक होणाऱ्या उताºयाला प्रति १ टक्का २७५ रुपये जादा दर देण्याला मान्यता देण्यात आली. यामुळे शेतकºयांना ८३ हजार कोटी रुपये जादा मिळतील. ज्या कारखान्यांचा उतारा ९.५ पेक्षा कमी आहे, त्या कारखान्यांकडून शेतकºयांना प्रतिक्विंटल २६१.२५ रुपये दर दिला जाईल. यामध्ये कसलीही कपात असणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान, केंद्र सरकारने जाहीर केलेली एफआरपी साखर कारखान्यांना परवडणारी नाही. त्यासाठी साखरेला किमान ३५०० रुपये क्विंटल दर मिळायला हवा असे इस्माचे महासंचालक अभिनाश वर्मा यांनी म्हटले आहे.>असा मिळेल दरराज्यातील उसाला प्रतिटन ११.५ टक्के साखर उतारा गृहीत धरला तर २७७५ यात जादा १.५ टक्क्यांचे ४१२ रुपये ५० पैसे मिळविले असता ३१८७ रुपये ५० पैसे एफआरपी होतो. यातून तोडणी-वाहतुकीचे प्रतिटन ५५० रुपये वजा केले असता शेतकºयाला २६३७ रुपये प्रतिटन एफआरपी मिळेल.उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा ही राज्ये स्वत:चा उसाचा किमान दर जाहीर करतात. त्याला स्टेट अ‍ॅडव्हायझरी प्राईस असे म्हटले जाते. केंद्राच्या आजच्या निर्णयामुळे या राज्यांनाही आपल्या स्टेट अ‍ॅडव्हायझरी प्राईसमध्ये वाढ करावी लागण्याची शक्यता आहे.देशात यंदा साखरेचे उच्चांकी ३२२ लाख टन उत्पादन झाले आहे. चांगल्या पावसामुळे २०१८-१९ मध्ये हेच साखर उत्पादन ३५० लाख टनावर जाईल, असा अंदाज ‘इस्मा’ या संस्थेने वर्तविला आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने