शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

भारतात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ; प्रशासनाची चिंता वाढवणारी आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 13:26 IST

सध्या देशात १.४४ लाख सक्रिय रुग्ण आहेत. त्यात २४ तासांत ८१५ रुग्णांची भर पडली आहे. देशात कोरोना संक्रमणाचा वेग अचानक वाढला कसा? आकडेवारी पाहिली तर ६ टक्क्यांहून अधिक रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

नवी दिल्ली - देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. मागील ७ आठवड्यात कोरोना रुग्णसंख्या आणि मृतांच्या आकडेवारी होणारी वाढ चिंताजनक आहे. एका आठवड्यात सव्वा लाखाहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर ३०० हून जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात कोरोनाबाबत प्रशासन खडबडून जागे झाले आहे. बूस्टर डोस जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा यासाठी अभियान सुरू करण्यात आले आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, मागील २४ तासांत कोरोनाचे १६ हजार ९३५ रुग्ण समोर आले आहेत. तर ५१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. चिंतेची बाब म्हणजे १६१ दिवसानंतर पुन्हा कोरोना संक्रमितांचा दर ६ टक्क्याहून अधिक झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचं प्रमाण मानलं तर ज्याठिकाणी पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्याहून अधिक असेल तिथे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. त्यामुळे भारतात कोरोना रुग्णसंख्येत वाढ पाहता प्रशासन सतर्क झाले आहे. 

सध्या देशात १.४४ लाख सक्रिय रुग्ण आहेत. त्यात २४ तासांत ८१५ रुग्णांची भर पडली आहे. देशात कोरोना संक्रमणाचा वेग अचानक वाढला कसा? आकडेवारी पाहिली तर ६ टक्क्यांहून अधिक रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. तर मृतांचा आकडा ३२ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. ११ ते १७ जुलै या काळात १ लाख २८ हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. ३०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ४ ते ११ जुलै कालावधीत १.२० लाख रुग्ण आढळले आणि २३१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

२७ राज्यांत ८ तासांत वाढले रुग्ण देशातील २७ राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं दिसून येते. त्यात दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगालसारख्या राज्यांचा समावेश आहे. तर ८ राज्य अशीही आहेत ज्याठिकाणी रुग्णसंख्येत घट झाल्याचं सकारात्मक चित्र आहे. २४ तासांत पश्चिम बंगालमध्ये २ हजार ६५९, केरळ २६०४, तामिळनाडू २३१६, महाराष्ट्र २१८६ आणि कर्नाटकात ९४४ रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत ४९८ तर यूपीत ३५९ रुग्ण सापडले आहेत. 

संक्रमण वाढण्याचं कारण काय?कोरोना संक्रमण वाढण्यामागे ओमायक्रॉन आणि सब व्हेरिएंट कारणीभूत आहे. देशात ओमायक्रॉन सब व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. महाराष्ट्रात ८० ते ८५ टक्के रुग्ण BA.2, BA2.38 व्हेरिएंटचे आहेत. परंतु सब व्हेरिएंट जास्त गंभीर नाही, त्यामुळे लोकांनी जास्त घाबरू नये असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या