शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

भारतात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ; प्रशासनाची चिंता वाढवणारी आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 13:26 IST

सध्या देशात १.४४ लाख सक्रिय रुग्ण आहेत. त्यात २४ तासांत ८१५ रुग्णांची भर पडली आहे. देशात कोरोना संक्रमणाचा वेग अचानक वाढला कसा? आकडेवारी पाहिली तर ६ टक्क्यांहून अधिक रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

नवी दिल्ली - देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. मागील ७ आठवड्यात कोरोना रुग्णसंख्या आणि मृतांच्या आकडेवारी होणारी वाढ चिंताजनक आहे. एका आठवड्यात सव्वा लाखाहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर ३०० हून जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात कोरोनाबाबत प्रशासन खडबडून जागे झाले आहे. बूस्टर डोस जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा यासाठी अभियान सुरू करण्यात आले आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, मागील २४ तासांत कोरोनाचे १६ हजार ९३५ रुग्ण समोर आले आहेत. तर ५१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. चिंतेची बाब म्हणजे १६१ दिवसानंतर पुन्हा कोरोना संक्रमितांचा दर ६ टक्क्याहून अधिक झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचं प्रमाण मानलं तर ज्याठिकाणी पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्याहून अधिक असेल तिथे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. त्यामुळे भारतात कोरोना रुग्णसंख्येत वाढ पाहता प्रशासन सतर्क झाले आहे. 

सध्या देशात १.४४ लाख सक्रिय रुग्ण आहेत. त्यात २४ तासांत ८१५ रुग्णांची भर पडली आहे. देशात कोरोना संक्रमणाचा वेग अचानक वाढला कसा? आकडेवारी पाहिली तर ६ टक्क्यांहून अधिक रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. तर मृतांचा आकडा ३२ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. ११ ते १७ जुलै या काळात १ लाख २८ हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. ३०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ४ ते ११ जुलै कालावधीत १.२० लाख रुग्ण आढळले आणि २३१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

२७ राज्यांत ८ तासांत वाढले रुग्ण देशातील २७ राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं दिसून येते. त्यात दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगालसारख्या राज्यांचा समावेश आहे. तर ८ राज्य अशीही आहेत ज्याठिकाणी रुग्णसंख्येत घट झाल्याचं सकारात्मक चित्र आहे. २४ तासांत पश्चिम बंगालमध्ये २ हजार ६५९, केरळ २६०४, तामिळनाडू २३१६, महाराष्ट्र २१८६ आणि कर्नाटकात ९४४ रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत ४९८ तर यूपीत ३५९ रुग्ण सापडले आहेत. 

संक्रमण वाढण्याचं कारण काय?कोरोना संक्रमण वाढण्यामागे ओमायक्रॉन आणि सब व्हेरिएंट कारणीभूत आहे. देशात ओमायक्रॉन सब व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. महाराष्ट्रात ८० ते ८५ टक्के रुग्ण BA.2, BA2.38 व्हेरिएंटचे आहेत. परंतु सब व्हेरिएंट जास्त गंभीर नाही, त्यामुळे लोकांनी जास्त घाबरू नये असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या