शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कोरोनाच्या सामाजिक परिणामांमुळे बेपत्ता मुलांच्या संख्येत २ वर्षांत वाढ; मुलींचे प्रमाण सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 08:00 IST

स्वयंसेवी संस्थांकडून चिंता व्यक्त

नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे झालेल्या सामाजिक परिणामांमुळे देशभरात गेल्या दोन वर्षांत बेपत्ता झालेल्या मुलांचे प्रमाण वाढले आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या (एनसीआरबी) आकडेवारीनुसार २०१९ मध्ये ४८ हजार, तर २०२० मध्ये ५९ हजार मुले बेपत्ता झाली. अशा मुलांची या दोन वर्षांतील एकूण संख्या एक लाखाहून अधिक आहे. त्यामध्ये बेपत्ता मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे. 

या स्थितीबाबत चिंता व्यक्त करीत स्वयंसेवी संस्थांनी म्हटले आहे की, बेपत्ता मुलांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी गावपातळीवर बालरक्षण समित्यांची तातडीने स्थापना केली जावी. तसेच बालकांच्या पालनपोषणासंदर्भात पालकांमध्ये जनजागृती करण्याचे काम या समित्यांमार्फत करण्यात यावे. त्यासाठी पुरेसा निधी सरकारने उपलब्ध करून द्यावा.

कैलाश सत्यार्थी फाऊंडेशनशी संलग्न असलेल्या बचपन बचाओ आंदोलन (बीबीए) या संस्थेचे कार्यकारी संचालक धनंजय तिंगाल यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांत देशभरात सुमारे १२ हजार मुलांची आम्ही वेगवेगळ्या आपत्तींतून सुटका केली आहे. कोरोना साथीचे भीषण सामाजिक परिणाम झाले आहेत. मुलांची मानवी तस्करी करण्याचे प्रमाणही त्यामुळे वाढले आहे. 

२०२०मध्ये बेपत्ता मुलींचे प्रमाण ७७ टक्के

२०२० मध्ये देशात मार्च ते जून या कालावधीत संपूर्ण लॉकडाऊन होता. त्यावर्षी बेपत्ता झालेल्या ५९,२६२ मुलांमध्ये १३५६६ मुलगे, ४५,६८७ मुली, नऊ तृतीयपंथीय मुलांचा समावेश आहे. २०१८ मध्ये बेपत्ता झालेल्या मुलांमध्ये मुलींचे प्रमाण ७० टक्के होते. ते प्रमाण २०१९ मध्ये ७१ टक्के व २०२०मध्ये ७७ टक्के झाले असल्याची माहिती नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या् अहवालात देण्यात आली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत