शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या सामाजिक परिणामांमुळे बेपत्ता मुलांच्या संख्येत २ वर्षांत वाढ; मुलींचे प्रमाण सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 08:00 IST

स्वयंसेवी संस्थांकडून चिंता व्यक्त

नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे झालेल्या सामाजिक परिणामांमुळे देशभरात गेल्या दोन वर्षांत बेपत्ता झालेल्या मुलांचे प्रमाण वाढले आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या (एनसीआरबी) आकडेवारीनुसार २०१९ मध्ये ४८ हजार, तर २०२० मध्ये ५९ हजार मुले बेपत्ता झाली. अशा मुलांची या दोन वर्षांतील एकूण संख्या एक लाखाहून अधिक आहे. त्यामध्ये बेपत्ता मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे. 

या स्थितीबाबत चिंता व्यक्त करीत स्वयंसेवी संस्थांनी म्हटले आहे की, बेपत्ता मुलांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी गावपातळीवर बालरक्षण समित्यांची तातडीने स्थापना केली जावी. तसेच बालकांच्या पालनपोषणासंदर्भात पालकांमध्ये जनजागृती करण्याचे काम या समित्यांमार्फत करण्यात यावे. त्यासाठी पुरेसा निधी सरकारने उपलब्ध करून द्यावा.

कैलाश सत्यार्थी फाऊंडेशनशी संलग्न असलेल्या बचपन बचाओ आंदोलन (बीबीए) या संस्थेचे कार्यकारी संचालक धनंजय तिंगाल यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांत देशभरात सुमारे १२ हजार मुलांची आम्ही वेगवेगळ्या आपत्तींतून सुटका केली आहे. कोरोना साथीचे भीषण सामाजिक परिणाम झाले आहेत. मुलांची मानवी तस्करी करण्याचे प्रमाणही त्यामुळे वाढले आहे. 

२०२०मध्ये बेपत्ता मुलींचे प्रमाण ७७ टक्के

२०२० मध्ये देशात मार्च ते जून या कालावधीत संपूर्ण लॉकडाऊन होता. त्यावर्षी बेपत्ता झालेल्या ५९,२६२ मुलांमध्ये १३५६६ मुलगे, ४५,६८७ मुली, नऊ तृतीयपंथीय मुलांचा समावेश आहे. २०१८ मध्ये बेपत्ता झालेल्या मुलांमध्ये मुलींचे प्रमाण ७० टक्के होते. ते प्रमाण २०१९ मध्ये ७१ टक्के व २०२०मध्ये ७७ टक्के झाले असल्याची माहिती नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या् अहवालात देण्यात आली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत