शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबात 14 अडत्यांना ‘प्राप्तिकर’ची नोटीस, काही जणांवर धाडी; केंद्र सरकार धमकावत असल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 07:04 IST

Punjab : शेतकरी आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्यामुळे आम्हाला धमकाविण्यासाठी केंद्र सरकारने ही कारवाई केली आहे, असा या अडत्यांचा आरोप आहे.

अमृतसर : पंजाबमध्ये शेतीमालाच्या खरेदी-विक्री व्यवहारातील सुमारे १४ बड्या अडत्यांना प्राप्तिकर खात्याने नोटिसा बजावल्या आहेत. त्यातील काही जणांवर या खात्याच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या आहेत. शेतकरी आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्यामुळे आम्हाला धमकाविण्यासाठी केंद्र सरकारने ही कारवाई केली आहे, असा या अडत्यांचा आरोप आहे.त्यातील एका अडत्याने सांगितले की, मला बजावण्यात आलेली नोटीस घेऊन मी प्राप्तिकर खात्याच्या कार्यालयात गेलो. तिथे संबंधित अधिकाऱ्यांना भेटलो असता, तेही हतबल असल्याचे दिसून आले. अडत्यांना नोटिसा पाठविण्याचा, त्यांच्यावर धाडी टाकण्याचा आदेश दिल्लीवरूनच आला आहे, असे प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले, असा दावा या अडत्याने केला. शेतकरी आंदोलनात सहभागी होऊ नका, त्यांना पाठिंबा देऊ नका, असा इशारा प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी आम्हाला दिला, असे एक अडत्या म्हणाला. नोटिसा पाठवून, धाडी टाकून केंद्र सरकारने आमचा छळ सुरू केला आहे, पण या कारवाईला आम्ही घाबरणार नाही. नवे कृषी कायदे रद्द करेपर्यंत शेतकऱ्यांची ही लढाई सुरूच राहील, असेही एका अडत्याने सांगितले. (वृत्तसंस्था)

देशवासीयांना आवाहन२३ डिसेंबर रोजी चौधरी चरणसिंग यांच्या स्मृतिदिनानिमित्त देशभरात किसान दिवस साजरा करण्यात येतो. या दिवशी अन्नदाता शेतकऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्व देशवासीयांना दुपारचे जेवण न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- सोमवारपासून दिल्ली बॉर्डरवरील सर्व आंदोलन स्थळांवर ११ प्रतिनिधी साखळी उपोषणाला बसणार. देशभरातील ज्या-ज्या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी देखील साखळी उपोषण सुरू करण्याचे आवाहन.

- जगभरातील भारतीय नागरिकांना त्या-त्या देशांमध्ये धरणे आंदोलन करून भारतीय दूतावासामध्ये निवेदन देण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.

- एनडीएमधील भाजपेतर सर्व घटक पक्षांना शेतकरी विरोधी कायद्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी व सदरचे कायदे रद्द करण्यासंदर्भात केंद्र सरकारवर दबाव आणावा असे आवाहन करण्यात येणार आहे. 

- दि.२७ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात करणार आहेत, सदरची मन की बात आम्हाला ऐकायची नाही असा संदेश देण्यासाठी या मन की बात संबोधनादरम्यान देशातील सर्व नागरिकांनी टाळ्या, थाळ्या वाजवून निषेध व्यक्त करावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

- संयुक्त किसान मोर्चाचे जगजीत सिंह डल्लेवाल,  योगेंद्र यादव, राकेश टिकेत, डॉ. दर्शन पाल, ऋदुल सिंह मानसा, जसविंदर सिंह बाटी यांनी पत्रकार परिषदेस संबोधित केले.

- या बैठकीत  महाराष्ट्रातील राष्ट्रीय किसान महासंघाचे कोअर कमिटी सदस्य संदीप आबा गिड्डे- पाटील व राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शंकर दरेकर उपस्थित होते. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपPunjabपंजाब