शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

आर्थिक दुर्बल घटकांसाठी उत्पन्न मर्यादा 8 लाख; समितीची शिफारस मान्य करण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 06:01 IST

EWS Reservation: केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती. आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) निश्चित करण्यासाठी कौटुंबिक उत्पन्न हा व्यवहार्य निकष आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :  तीन सदस्यांच्या समितीने  आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) निश्चित करण्यासाठी एकूण वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा ८ लाख रुपयांची कायम ठेवण्यासंबंधी  केलेली शिफारस मान्य करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली.

आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) निश्चित करण्यासाठी कौटुंबिक उत्पन्न हा व्यवहार्य निकष आहे आणि सद्य: स्थितीत ईडब्ल्यूएस घटक ठरविण्यासाठी वार्षिक कौटुंबिक ८ लाख रुपयांची उत्पन्न मर्यादा रास्त आहे, अशी शिफारस समितीने केल्याचे सरकारने म्हटले आहे.नीट-पीजी प्रवेशासंबंधी दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञा पत्रात केंद्र सरकारने म्हटले आहे की,  समितीने अशी शिफारस केली आहे की,  ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपये आहे, ती कुटुंबेच ईडब्ल्यूएसचे लाभ मिळण्यासाठी पात्र असतील.

केंद्र सरकारच्या वतीने सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाचे सचिव आर. सुब्रमण्यम यांनी प्रतिज्ञा पत्र दाखल केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, मी सन्मानपूर्वक निवेदन करतो की,  नवीन निकष लागू करण्यासह  समितीच्या शिफारशी मान्य करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.  ईडब्ल्यूएस घटक निश्चित करण्यासाठीच्या निकषांचा फेरविचार करण्यासंबंधी केंद्र सरकारने न्यायालयाला आश्वासन दिले होते. त्यानुसार ३० नोव्हेंबर रोजी सरकारने  अजय भूषण पांडेय ( माजी वित्त सचिव), व्ही. के. मल्होत्रा ( सदस्य सचिव, आयसीएसएस) आणि संजीव संन्याल (केंद्राचे प्रधान आर्थिक सल्लागार) यांचा समावेश असलेली तीन सदस्यांंची समिती स्थापन केली होती.

काय म्हटले होते समितीने अहवालात...    मागच्या वर्षी ३१ डिसेंबर रोजी समितीने केंद्र सरकारकडे अहवाल सुपूर्द केला होता. ईडब्ल्यूएससाठी सध्या  ८ लाख रुपयांची वार्षिक कौटुंबिक उत्पनाची मर्यादा किंवा त्यापेक्षा कमी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा कायम ठेवावी, असे समितीने अहवालात म्हटले होते. म्हणजे, ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न  ८ लाख रुपये आहे, अशी कुटुंबे  ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या लाभासाठी पात्र असतील.   

टॅग्स :reservationआरक्षण