शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

'पंजाबमध्येही नागालँडसारख्या हत्येच्या घटना घडणार'; फारूक अब्दुल्लांचे केंद्रावर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 12:43 IST

'आम्हाला पाकिस्तानी म्हटले जायचे, मला खलिस्तानीही म्हटले जायचे. पण आम्ही कधीही भारताविरोधात घोषणाबाजी किंवा कट कारस्थान केले नाही.'

नवी दिल्ली:जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांची केंद्र सरकारवरील टीका सुरुच आहे. त्यांनी यापूर्वी अनेक मुद्द्यांवर केंद्रावर निशाणा साधला आहे. आता परत एकदा त्यांनी बीएसएफच्या अधिकारक्षेत्रावरुन केंद्रावर टीका केली आहे. 'त्यांना वाटते की, बहुमत असल्यामुळे ते काहीही करू शकतात. पंजाबमध्ये त्यांनी 50 किमीचा परिसर बीएसएफला का दिला? पोलिसांच्या कार्यक्षमतेवर त्यांना विश्वास नाही का? नागालँडप्रमाणे पंबाजमध्येही हत्या होणार', अशी जहरी टीका त्यांनी केली आहे.

फारुख अब्दुल्ला पुढे म्हणात, 'आम्हाला पाकिस्तानी म्हटले जायचे, मला खलिस्तानीही म्हटले जायचे. पण आम्ही कधीही भारताविरोधात घोषणाबाजी किंवा कट कारस्थान केले नाही. आम्ही महात्मा गांधींच्या मार्गावर चालतो आणि गांधींचा भारत परत आणू इच्छितो. कलम 370 रद्द केल्यापासून राज्यात अडचणी वाढल्या आहेत',असंही ते म्हणाले. शेर-ए-काश्मीर भवन येथे आयोजित एक दिवसीय परिषदेत फारुख अब्दुल्ला बोलत होते. 

'...तर वेळ निघून जाईल'

फारुख अब्दुल्ला पुढे म्हणाले, 'जम्मू-काश्मीरला आम्ही नेहमीच कठीण काळातून बाहेर काढले आहे. आता पुन्हा आपल्याला ते मार्ग शोधावे लागतील ज्याद्वारे आपण आपले हक्क परत मिळवू शकतो. केंद्राला आमचे म्हणणे समजेल तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. आम्हाला नेहमी पाकिस्तानी म्हटले जाते. पण, आमच्या पक्षाच्या एकाही कार्यकर्त्याने कधीच देशाविरोधात घोषणाबाजी केली नाही. कधी ग्रेनेड फेकला नाही, कधी दगड उचलला नाही,'असंही ते म्हणाले.

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370