शहरं
Join us  
Trending Stories
1
२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, दुबार मतदारावरही उचललं पाऊल
2
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
3
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
4
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
5
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
6
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
7
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
8
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
10
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
11
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
12
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
13
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
14
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
15
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
16
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
17
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
18
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
19
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
20
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर

'पंजाबमध्येही नागालँडसारख्या हत्येच्या घटना घडणार'; फारूक अब्दुल्लांचे केंद्रावर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 12:43 IST

'आम्हाला पाकिस्तानी म्हटले जायचे, मला खलिस्तानीही म्हटले जायचे. पण आम्ही कधीही भारताविरोधात घोषणाबाजी किंवा कट कारस्थान केले नाही.'

नवी दिल्ली:जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांची केंद्र सरकारवरील टीका सुरुच आहे. त्यांनी यापूर्वी अनेक मुद्द्यांवर केंद्रावर निशाणा साधला आहे. आता परत एकदा त्यांनी बीएसएफच्या अधिकारक्षेत्रावरुन केंद्रावर टीका केली आहे. 'त्यांना वाटते की, बहुमत असल्यामुळे ते काहीही करू शकतात. पंजाबमध्ये त्यांनी 50 किमीचा परिसर बीएसएफला का दिला? पोलिसांच्या कार्यक्षमतेवर त्यांना विश्वास नाही का? नागालँडप्रमाणे पंबाजमध्येही हत्या होणार', अशी जहरी टीका त्यांनी केली आहे.

फारुख अब्दुल्ला पुढे म्हणात, 'आम्हाला पाकिस्तानी म्हटले जायचे, मला खलिस्तानीही म्हटले जायचे. पण आम्ही कधीही भारताविरोधात घोषणाबाजी किंवा कट कारस्थान केले नाही. आम्ही महात्मा गांधींच्या मार्गावर चालतो आणि गांधींचा भारत परत आणू इच्छितो. कलम 370 रद्द केल्यापासून राज्यात अडचणी वाढल्या आहेत',असंही ते म्हणाले. शेर-ए-काश्मीर भवन येथे आयोजित एक दिवसीय परिषदेत फारुख अब्दुल्ला बोलत होते. 

'...तर वेळ निघून जाईल'

फारुख अब्दुल्ला पुढे म्हणाले, 'जम्मू-काश्मीरला आम्ही नेहमीच कठीण काळातून बाहेर काढले आहे. आता पुन्हा आपल्याला ते मार्ग शोधावे लागतील ज्याद्वारे आपण आपले हक्क परत मिळवू शकतो. केंद्राला आमचे म्हणणे समजेल तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. आम्हाला नेहमी पाकिस्तानी म्हटले जाते. पण, आमच्या पक्षाच्या एकाही कार्यकर्त्याने कधीच देशाविरोधात घोषणाबाजी केली नाही. कधी ग्रेनेड फेकला नाही, कधी दगड उचलला नाही,'असंही ते म्हणाले.

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370