शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशात मंत्री, अधिकाऱ्यांना संपत्ती जाहीर करावी लागेल; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 05:11 IST

सबका साथ-सबका विकास या धोरणावर सरकार चालविण्यासाठी भ्रष्टाचारच्या विरोधातील झिरो टॉलरन्स नीती व कामात पारदर्शकता गरजेची आहे. सशक्त लोकशाहीसाठी लोकप्रतिनिधींची आचरण शुचिता अत्यंत गरजेची आहे

राजेंद्र कुमारलखनौ : उत्तर प्रदेशात पुन्हा सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भ्रष्टाचार बिलकूल खपवून न घेण्याच्या धोरणाची चर्चा घडवून आणली आहे. त्यांनी राज्याचे सर्व मंत्री, आयएएस व पीसीएस अधिकाऱ्यांना त्यांच्या संपत्तीचा तपशील मागितला आहे. एवढेच नाही तर तीन महिन्यात मंत्री, अधिकाऱ्यांना आपल्या संपूर्ण कुटुंबाच्याही चल-अचल संपत्तीचा तपशील जनतेसमोर ठेवावा लागणार आहे. याबरोबरच मुख्यमंत्र्यांनी जनतेचे सरकार जनतेच्या दारी या मोहिमेचा प्रारंभ करण्यासाठी १८ मंत्र्यांचा समूह गठित केला आहे. या मंत्र्यांच्या समूहांना एकेक विभागाची जबाबदारी दिली आहे. त्या ठिकाणी शुक्रवार ते रविवार असा दौरा मंत्री करतील व सरकारी योजनांची वस्तुस्थिती जाणून घेतील. 

सबका साथ-सबका विकास या धोरणावर सरकार चालविण्यासाठी भ्रष्टाचारच्या विरोधातील झिरो टॉलरन्स नीती व कामात पारदर्शकता गरजेची आहे. सशक्त लोकशाहीसाठी लोकप्रतिनिधींची आचरण शुचिता अत्यंत गरजेची आहे. यानुसार मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, सर्व मंत्र्यांनी तीन महिन्यात आपली व कुटुंबातील सदस्यांची संपूर्ण संपत्ती जाहीर करावी. तसेच कोणत्याही मंत्र्याच्या कुटुंबीयांचा शासकीय कामात हस्तक्षेप नसावा, हे सुनिश्चित करावे लागेल. हे आचरणातून सिद्ध करावे लागेल. लोकप्रतिनिधित्व अधिनियमाच्या तरतुदींचे अक्षरश: पालन करताना मंत्र्यांनी निर्धारित आचरण संहितेचे पूर्ण निष्ठेने पालन करावे. अशाच प्रकारचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांनाही दिले आहेत. सर्व लोकसेवकांना स्वत:ची आणि कुटुंबातील सदस्यांची संपत्ती जाहीर करावी लागणार आहे. हा तपशील सर्वसामान्य जनतेसाठी अवलोकनार्थ ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध करून दिला जाणार आहे. 

सरकार जनतेच्या दारी

१. सरकारी योजनेच्या कामांची प्रगती कुठपर्यंत आली, याची वस्तुनिष्ठ माहिती घेण्यासाठी मंत्र्यांच्या होणाऱ्या दौऱ्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, या अभियानामार्फत सरकार जनतेच्या दारी पोहोचेल. 

२. मंत्री समूह विभागीय दौऱ्यामध्ये आढावा बैठक घेईल. याशिवाय या दौऱ्यात जनचौपालचा कार्यक्रम घेऊन जनतेशी थेट संवाद साधतील. 

३. एखादा भाग, तालुक्याचे अचानक निरीक्षणही करील. दलित, मलिन वस्तीमध्ये सहभोजनाच्या कार्यक्रमातही सहभागी होतील.

४. हा समूह विकास कामाच्या ठिकाणाचे निरीक्षण करून गुणवत्तेचे मूल्यमापन करील. 

५. दौरा करणाऱ्या मंत्र्यांच्या प्रत्येक पथकाला आपला अहवाल मुख्यमंत्री कार्यालयासमोर सादर करावा लागेल. यावर मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मंत्रिसमूहाच्या आकलनावर चर्चा होईल. याद्वारे जनहितासाठी आणखी पावले उचलता येतील.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ