शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

गेल्या ५ वर्षांत भारताने पाहिले रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 08:31 IST

देशात होत असलेल्या परिवर्तनामध्ये खासदारांचाही मोठा वाटा आहे. गेल्या शतकांपासून लोकांना प्रतीक्षा होती ती कामेही पूर्ण झाली आहेत. 

नवी दिल्ली : १७व्या लोकसभेची पाच वर्षे हा रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्मचा (सुधारणा, कामगिरी, परिवर्तन) काळ होता. आता देश वेगाने मोठ्या बदलांच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेत भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत ‘गेम चेंजर’ सुधारणा करण्यात आल्या. त्यामुळे २१व्या शतकातील समर्थ भारताचा भक्कम पाया निर्माण झाला. देशात होत असलेल्या परिवर्तनामध्ये खासदारांचाही मोठा वाटा आहे. गेल्या शतकांपासून लोकांना प्रतीक्षा होती ती कामेही पूर्ण झाली आहेत. 

१७व्या लोकसभेचे हे अंतिम अधिवेशन व तसेच शनिवारी शेवटची बैठक होती. त्याप्रसंगी मोदी म्हणाले की, देशात एकच संविधान असावे अशी जनतेची इच्छा होती. मात्र कलम ३७० रद्द करून ती इच्छा प्रत्यक्षात साकार केली. त्यामध्ये अनेक संकटे आली, पण त्यावर मात करून देशाने योग्य मार्गाने आपली वाटचाल सुरू ठेवली. 

‘कोरोनाच्या साथीचा समर्थपणे मुकाबला’मोदी यांनी सांगितले की, शतकातील सर्वात मोठ्या संकटाचा म्हणजे कोरोनाच्या साथीचा देशाने मुकाबला केला. या बिकट काळात संसदेच्या कामकाजावर विपरित परिणाम होणार नाही याची काळजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतली होती. संसदेसाठी नवी इमारत हवी अशी चर्चा यापूर्वी अनेकदा केली जायची, पण लोकसभा अध्यक्षांनी यासंदर्भात ठाम निर्णय घेतला. संसदेची नवी इमारत साकारली. लोकसभेत सेंगोलची झालेली प्रस्थापना ही विशेष घटना आहे. 

ओम बिर्ला यांचा चेहरा नेहमी हसतमुख पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला व खासदारांचे आभार मानले. मोदी म्हणाले की, लोकसभेत कोणतीही स्थिती उद्भवली तरी ओम बिर्ला यांचा चेहरा कायम हसरा असायचा. त्यांनी या सभागृहाचे कामकाज निष्पक्षपाती पद्धतीने चालविले. काही वेळा आरोप, प्रत्यारोप तसेच संताप, उद्वेगाचेही प्रसंग लोकसभेत घडले. पण ती परिस्थिती बिर्ला यांनी अतिशय कुशलतेने हाताळली. 

‘९७ टक्के कामकाज व्यवस्थित पार पडले’१७व्या लोकसभेत ९७ टक्के कामकाज व्यवस्थित पार पडले. १८व्या लोकसभेत १०० टक्के कामकाज नीट पार पडावे, त्यातून जनतेच्या हिताचे निर्णय व्हावेत याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. महिला आरक्षण विधेयक, त्रिवार तलाकवर घातलेली बंदी ही विधेयके संसदेत संमत झाली होती. त्याबद्दलही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला. 

१७ व्या लोकसभेत  सर्वांत कमी बैठकालोकसभा व राज्यसभेचे कामकाज शनिवारी तहकूब करण्यात आले. संसदीय निवडणुका जाहीर होण्यापूर्वी पार पडलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन हे १७ व्या लोकसभेचे शेवटचे अधिवेशन होते. गेल्या पाच वर्षांत सर्वांत कमी बैठका झाल्या असे पीआरएस या संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे. २०१९-२०२४ या कालावधीत लोकसभेच्या २७२ बैठका झाल्या. १४ व १५ व्या लोकसभेच्या अनुक्रमे ३३२, ३५६ बैठका झाल्या. 

१६ व्या लोकसभेच्या ३३१ बैठका झाल्या होत्या. १३ व्या लोकसभेच्या ३५६ बैठका झाल्या. १९५२ ते १९५७ या कालावधीत पहिल्या लोकसभेच्या ६७७ बैठका झाल्या. तो विक्रम आजही कायम आहे. सरकारने अनेक गोष्टीत सुधारणा केल्या, उत्तम कामगिरी बजावली, त्यामुळे देशात महत्त्वाचे बदल झाले, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी