शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘लाचखोरीचा खेळ’ नव्हे, तर दीडपट अधिक नोकऱ्या; PM नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 06:52 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नियुक्तिपत्रांचे वाटप, मागील १० वर्षात सध्याच्या सरकारने १.५ पट अधिक तरुणांना नोकऱ्या दिल्या आहेत. 

नवी दिल्ली - संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या १० वर्षांच्या तुलनेत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने दीडपट अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले.

रोजगार मेळाव्यात नुकत्याच भरती झालेल्या एक लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना नियुक्तिपत्रांचे वाटप केल्यानंतर पंतप्रधान म्हणाले की, त्या काळात नोकऱ्यांसाठी जाहिराती दिल्या जात होत्या. त्यासाठी खूप वेळ लागायचा. नियुक्ती झाल्यापासून ते नियुक्तिपत्र मिळेपर्यंत आणि याचा फायदा घेत ‘लाचखोरीचा खेळ’ही रंगायचा. 

आम्ही भारत सरकारमधील भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक केली आहे. एवढेच नव्हे तर भरती प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण व्हावी यासाठी सरकार खूप आग्रही आहे. त्यामुळे प्रत्येक तरुणाला आपली क्षमता सिद्ध करण्याची समान संधी मिळत आहे. आज प्रत्येक तरुणाला मेहनत आणि कौशल्याने नोकरी मिळू शकते, असा विश्वास आहे. मागील १० वर्षात सध्याच्या सरकारने १.५ पट अधिक तरुणांना नोकऱ्या दिल्या आहेत. 

स्टार्टअप पोहोचले १.२५ लाखांवर

निमलष्करी दलात अनेक नवीन नियुक्त्या करण्यात आल्या. निमलष्करी दलातील भरती प्रक्रियेसाठी आता हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त १३ भारतीय भाषांमध्ये परीक्षा घेतली जाईल. यामुळे लाखो उमेदवारांना परीक्षेत समान संधी मिळणार आहे. आज भारत जगातील तिसरी सर्वांत मोठी स्टार्टअप परिसंस्था. देशातील स्टार्टअपची संख्या आता सुमारे १.२५ लाखांवर पोहोचली आहे. त्यातून तरुणांसाठी लाखो नोकऱ्या निर्माण होत आहेत. देशात सुरू असलेल्यानवीन रेल्वे, रस्ते, विमानतळ आणि जलमार्ग प्रकल्पांमुळे रोजगाराच्या नवीन संधी. 

आज रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रेल्वेतही भरती केली जात आहे. प्रवासाच्या बाबतीत रेल्वे ही सर्वसामान्यांची पहिली पसंती आहे. वंदे भारत एक्स्प्रेससारख्या ४०,००० आधुनिक बोगी तयार केल्या जातील आणि सामान्य गाड्यांमध्ये जोडल्या जातील, ज्यामुळे प्रवाशांच्या सोयी आणि आरामात वाढ होईल, असेही पंतप्रधान म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी