शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
6
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
7
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
8
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
9
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
10
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
11
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
12
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
13
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
14
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
16
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
17
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
18
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
19
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
20
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी

स्टॅलिन यांच्या सुरात सूर; तामिळनाडूत काँग्रेसचाही हिंदी भाषेला विरोध, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 12:34 IST

आम्हाला तिसऱ्या भाषेची गरज नाही असं सांगत भाषा वादावर जी डीएमकेची भूमिका असेल तीच काँग्रेसची असेल असं त्यांनी सांगितले.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडू येथे भाषावाद उफाळून आला आहे. या राज्यात केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून लागू त्रिभाषिक फॉर्म्युल्याचा विरोध वाढत आहेत. सोमवारी याबाबत डिएमके खासदारांनी लोकसभा, राज्यसभेत विरोध दर्शवला त्यावेळी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या एका विधानावर त्यांना माफीही मागावी लागली. राज्यात त्रिभाषिक फॉर्म्युला थोपवण्याचा प्रयत्न सुरू असून तो चुकीचा आहे असं सांगत खासदारांनी हिंदी भाषा लादण्यावर आक्षेप घेतला. आता डिएमकेसोबत काँग्रेसनेही या वादात उडी घेतली आहे.

तामिळनाडूत २ भाषा पुरेसे असून तिथे तिसरी भाषा स्वीकारली जाऊ शकत नाही असं काँग्रेसने म्हटलं आहे. तामिळनाडूतील काँग्रेस नेते आणि खासदार कार्ती चिदंबरम यांनी सांगितले की, तामिळनाडूने २ भाषेवर ठाम भूमिका मांडली आहे. तामिळ भाषा आमची ओळख आणि मातृभाषा आहे. इंग्रजी गरजेची आहे कारण जगात त्यातून जोडले जाते. सायन्स, कॉमर्स समजून घेण्यासाठी इंग्रजी आवश्यक आहे. आम्हाला तिसऱ्या भाषेची गरज नाही असं सांगत भाषा वादावर जी डीएमकेची भूमिका असेल तीच काँग्रेसची असेल असं त्यांनी सांगितले.

तामिळनाडूत हिंदीविरुद्ध तामिळ असा वाद निर्माण झाला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद निर्माण केल्याचं बोलले जाते. भाषा वाद तामिळनाडूत अस्मितेचा मुद्दा आहे. त्यामुळे भाजपासाठी हा मुद्दा डोकेदुखी ठरला आहे. त्रिभाषा फॉर्म्युल्यावर तामिळनाडूकडून सहमती दर्शवली होती असं शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान सांगतात, त्याचमुळे राष्ट्रीय शिक्षण धोरणात त्यांचा समावेश केला परंतु त्यानंतर तामिळनाडू सरकारने त्यांची भूमिका बदलली असा आरोप प्रधान यांनी केला. मात्र आम्ही कुठलेही आश्वासन दिले नव्हते असं डिएमकेने पलटवार केला आहे.

दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी सीमांकनाच्या मुद्द्यावरही जोर दिला आहे. जर जनगणनेच्या नव्या आकडेवारी मतदारसंघाचे सीमांकन केले तर तामिळनाडूतील जागा कमी होतील. या प्रकरणात केरळ, कर्नाटकसारख्या इतर दक्षिणेतील राज्यांनीही आवाज उचलला पाहिजे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील लोकसंख्या वाढवली पाहिजे यावर भर दिला आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसhindiहिंदीTamilnaduतामिळनाडू