शहरं
Join us  
Trending Stories
1
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
2
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
3
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
4
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
5
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
6
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
7
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
8
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
9
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
10
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
11
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
12
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
13
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
14
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
15
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
16
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
17
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
18
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
19
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
20
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?

स्टॅलिन यांच्या सुरात सूर; तामिळनाडूत काँग्रेसचाही हिंदी भाषेला विरोध, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 12:34 IST

आम्हाला तिसऱ्या भाषेची गरज नाही असं सांगत भाषा वादावर जी डीएमकेची भूमिका असेल तीच काँग्रेसची असेल असं त्यांनी सांगितले.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडू येथे भाषावाद उफाळून आला आहे. या राज्यात केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून लागू त्रिभाषिक फॉर्म्युल्याचा विरोध वाढत आहेत. सोमवारी याबाबत डिएमके खासदारांनी लोकसभा, राज्यसभेत विरोध दर्शवला त्यावेळी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या एका विधानावर त्यांना माफीही मागावी लागली. राज्यात त्रिभाषिक फॉर्म्युला थोपवण्याचा प्रयत्न सुरू असून तो चुकीचा आहे असं सांगत खासदारांनी हिंदी भाषा लादण्यावर आक्षेप घेतला. आता डिएमकेसोबत काँग्रेसनेही या वादात उडी घेतली आहे.

तामिळनाडूत २ भाषा पुरेसे असून तिथे तिसरी भाषा स्वीकारली जाऊ शकत नाही असं काँग्रेसने म्हटलं आहे. तामिळनाडूतील काँग्रेस नेते आणि खासदार कार्ती चिदंबरम यांनी सांगितले की, तामिळनाडूने २ भाषेवर ठाम भूमिका मांडली आहे. तामिळ भाषा आमची ओळख आणि मातृभाषा आहे. इंग्रजी गरजेची आहे कारण जगात त्यातून जोडले जाते. सायन्स, कॉमर्स समजून घेण्यासाठी इंग्रजी आवश्यक आहे. आम्हाला तिसऱ्या भाषेची गरज नाही असं सांगत भाषा वादावर जी डीएमकेची भूमिका असेल तीच काँग्रेसची असेल असं त्यांनी सांगितले.

तामिळनाडूत हिंदीविरुद्ध तामिळ असा वाद निर्माण झाला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद निर्माण केल्याचं बोलले जाते. भाषा वाद तामिळनाडूत अस्मितेचा मुद्दा आहे. त्यामुळे भाजपासाठी हा मुद्दा डोकेदुखी ठरला आहे. त्रिभाषा फॉर्म्युल्यावर तामिळनाडूकडून सहमती दर्शवली होती असं शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान सांगतात, त्याचमुळे राष्ट्रीय शिक्षण धोरणात त्यांचा समावेश केला परंतु त्यानंतर तामिळनाडू सरकारने त्यांची भूमिका बदलली असा आरोप प्रधान यांनी केला. मात्र आम्ही कुठलेही आश्वासन दिले नव्हते असं डिएमकेने पलटवार केला आहे.

दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी सीमांकनाच्या मुद्द्यावरही जोर दिला आहे. जर जनगणनेच्या नव्या आकडेवारी मतदारसंघाचे सीमांकन केले तर तामिळनाडूतील जागा कमी होतील. या प्रकरणात केरळ, कर्नाटकसारख्या इतर दक्षिणेतील राज्यांनीही आवाज उचलला पाहिजे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील लोकसंख्या वाढवली पाहिजे यावर भर दिला आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसhindiहिंदीTamilnaduतामिळनाडू