शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

लग्नानंतर ४ वर्षांनंतर महिलेनं ४ जुळ्या मुलांना दिला जन्म; कुटुंबात आनंदाची लहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 15:19 IST

राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातून एक अनोखी घटना समोर आली आहे.

राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथं खासगी रूग्णालयात एका महिलेनं चार जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. चार वर्षांपूर्वी या महिलेचं लग्न झालं होतं. सध्या महिला आणि तिच्या चारही बाळांची प्रकृती ठीक असल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टर शालिनी अग्रवाल यांनी सांगितलं की, टोंक जिल्ह्यातील वजीरपुरा येथील रहिवासी किरण कंवर यांना वैद्यकीय समस्यांमुळं लग्नाच्या चार वर्षानंतरही अपत्य झालं नव्हतं. किरण काही महिन्यांपूर्वी आयुष्मान रुग्णालयात उपचारासाठी आली होती. उपचारानंतर ती गरोदर राहिली आणि सोनोग्राफी केली असता ती चार मुलांची आई होणार असल्याचं आढळून आलं. तेव्हापासून डॉक्टरांच्या देखरेखीखाली महिलेवर उपचार सुरू होतं.

२ मुलं आणि २ मुलींना दिला जन्म दरम्यान, शनिवारी रात्री महिलेनं पोटात दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर कुटुंबीयांनी तिला आयुष्मान रुग्णालयात दाखल केलं. मग महिला डॉक्टर शालिनी अग्रवाल यांनी शस्त्रक्रिया करून महिलेची प्रसूती केली. महिलेनं जन्म दिलेल्या मुलांमध्ये २ मुलं आणि २ मुलींचा समावेश आहे. सध्या तीन नवजात बालकांवर झनाना रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर एक बालक आणि त्याच्या आईवर आयुष्मान रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कुटुंबात आनंदाची लहर लग्न झाल्यानंतर चार वर्षांनी घरात पाळणा हलणार असल्याचं कळताच चार मुलांना जन्म देणाऱ्या आई किरण कंवर यांच्या घरच्यांनी आनंद व्यक्त केला. नवजात बालकांच्या आईचा चेहराच तिची भावना सांगत होता. किरण कंवर यांच्या कुटुंबात तसेच वजीरपुरा गावात आनंदाचे वातावरण आहे. आई आणि मुलांची प्रकृती जाणून घेण्यासाठी गावातील लोक आणि नातेवाईक रुग्णालयात धाव घेत आहेत. त्याचवेळी मुलांचे वडील किसन मोहन सिंग हे देखील खूप आनंदी आहेत. डॉ. शालिनी अग्रवाल यांनी एकाच वेळी चार मुलांची प्रसूती होणं आणि त्यांची प्रकृती ठीक असणं ही दुर्मिळ घटना असल्याचं सांगितलं. 

टॅग्स :Rajasthanराजस्थान