शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

विद्यार्थी शाळा उघडण्याची वाट बघत होता; झाडाला हात लावताच जागीच मृत्यू; सारेच हळहळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 20:28 IST

शाळा उघडण्याची वाट पाहत झाडाखाली उभ्या असलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

भरतपूर: राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात एक हदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. शाळा सुरू होण्याची वाट पाहणाऱ्या १२ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. कडुलिंबाच्या झाडाला स्पर्श करताच विद्यार्थ्याचा जीव गेला. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार नोंदवली आहे. कैथवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या इकलेरा गावात हा प्रकार घडला.

इकलेरा गावात वास्तव्यास असलेला अंशू राजकीय विद्यालयाचा विद्यार्थी होता. शुक्ववारी तो वेळेआधी शाळेत पोहोचला. शाळेचा दरवाजा उघडलेला नाही हे पाहून तो कडुलिंबाच्या झाडाखाली जाऊन वाट पाहू लागला. या झाडावरून ११ किलोव्हॅटची लाईन जाते. त्याची तार नीट नव्हती. त्यामुळे झाडात करंट जात होता. त्यामुळे अंशूनं झाडाला हात लावताच त्याला जोरदार झटका बसला. विजेचा धक्का लागताच अंशू बेशुद्ध होऊन पडला. जागीच त्याचा मृत्यू झाला.

अंशूला विजेचा धक्का बसताना आसपासच्या लोकांनी पाहिलं. त्यांनी त्याला तातडीनं रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. यानंतर या घटनेची माहिती अंशूच्या कुटुंबीयांना देण्यात आली. त्यांनी तातडीनं रुग्णालय गाठलं. अंशूच्या मृत्यूसाठी वीज विभाग जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांनी कैथवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.