शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

उत्तर भारतात हाहाकार! पावसाचे ७२ तासांत ७६ बळी; हिमाचलमध्ये ३९ ठिकाणी भूस्खलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 05:41 IST

उत्तराखंडमध्ये मध्य प्रदेशच्या ४ जणांचा मृत्यू, नवी दिल्लीत सखल भागातील लाेकांना सुरक्षितस्थळी हलवले

नवी दिल्ली - हिमाचल, उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये ६ दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. हिमाचलमध्ये २४ तासांत ३९ ठिकाणी भूस्खलन झाले. बियास नदीच्या प्रवाहामुळे इमारती वाहून गेल्या, पूल कोसळले. यमुनेने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर आता सखल भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे. गेल्या ७२ तासांत देशातील विविध राज्यांमध्ये ७६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

उत्तराखंडच्या उत्तर काशीमध्ये मध्य प्रदेशातील पर्यटकांच्या वाहनांवर दरड कोसळून  मध्य प्रदेशातील इंदूरच्या ४ पर्यटकांचा मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले आहेत. दिल्लीतील यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीने धोक्याचा टप्पा ओलांडला आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत नदीचे पाणी २०६.३२ मीटरवरून वाहत होते. १९७८ मध्ये यमुनेच्या पाण्याने सर्वोच्च २०७.४९ मीटर पातळी गाठली होती.हिमाचलमध्ये आतापर्यंत आपत्तीत २३ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर ४ लोक बेपत्ता आहेत. 

मुसळधार पावसाने उत्तर भारतात हाहाकार उडाला असून, प्रचंड नुकसान झाले आहे. हिमाचलच्या सोलन जिल्ह्यातील शामती येथे मंगळवारी दरडी कोसळल्याने अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. तर उत्तराखंड येथील उत्तरकाशी-गंगोत्री महामार्गावर संततधारेमुळे दरडी कोसळून त्याखाली वाहने दबली गेली. बचावपथके ती वाहने बाजूला काढताना तसेच मातीच्या ढिगाऱ्याखाली माणसे तर अडकलेली नाहीत ना याची खातरजमा करत आहेत.

टॅग्स :Rainपाऊसlandslidesभूस्खलन