शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

“तुम्ही महाराजा लागून गेलात का”; KCR यांचा NDA प्रवेशाचा मानस, पण PM मोदींचा ठाम नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 19:21 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तेलंगणमधील रॅलीत मोठा गौप्यस्फोट; NDA मधील प्रवेश नाकारण्याचे कारणही सांगितले.

PM Narendra Modi Telangana Visit: आगामी लोकसभा निवडणुकांच्या आधी देशातील काही राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. यात तेलंगण राज्याचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने जय्यत तयारी सुरू केली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणाला भेट दिली. निजामाबाद येथे एका रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी मोठा गौप्यस्फोट केला. के. चंद्रशेखर राव हे NDA मध्ये येण्यास इच्छूक होते. मात्र, मीच नको म्हटले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

मी केसीआर यांना एनडीएमध्ये प्रवेश नाकारला. केसीआर दिल्लीत आल्यानंतर मला भेटले होते. मला एनडीएचा भाग व्हायचे आहे, असे ते म्हणाले. मात्र, KTR यांना तुम्ही आशीर्वाद द्यावे, अशी त्यांचे म्हणणे होते. त्याचवेळी मी त्यांना म्हणालो की, तुम्ही राजा-महाराजा लागून गेलात का? सरकार कोणाचे असावे, याचा निर्णय जनता घेईल, असा मोठा गौप्यस्फोट पंतप्रधान मोदी यांनी या सभेवेळी केला. तेलंगणातील जनतेसाठी ८ हजार कोटी रुपयांच्या योजनांची घोषणा करण्यात आली असून, काही योजनांचे भूमिपूजन आणि लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते निजामाबाद येथे करण्यात आले. 

तेलंगणात विविध योजनांसाठी ८ हजार कोटी 

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, तेलंगणात NTPC च्या सुपर थर्मल पॉवर प्रकल्पाच्या पहिल्या ८०० मेगावॅटचे पहिले युनिट राष्ट्राला समर्पित केले जाईल. यामुळे तेलंगणला कमी किमतीत वीज मिळेल. राज्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. देशातील सर्वात पर्यावरणपूरक वीज केंद्रांपैकी हे एक असेल. मनोहराबाद आणि सिद्धीपेट यांना जोडणाऱ्या नवीन रेल्वे मार्गासह रेल्वे प्रकल्पांचे पंतप्रधान मोदी यांनी लोकार्पण केले.  याशिवाय धर्माबाद-मनोहराबाद आणि महबूबनगर-कुरनूल दरम्यान विद्युतीकरण प्रकल्प सुरू करण्यात आला.

रेल्वे मार्गांमुळे आर्थिक विकासाला चालना

७६ किमी लांबीच्या मनोहराबाद-सिद्दीपेट रेल्वे मार्गामुळे या प्रदेशाच्या विशेषतः मेडक आणि सिद्धीपेट जिल्ह्यांच्या सामाजिक तसेच आर्थिक विकासाला चालना मिळेल. धर्माबाद-मनोहराबाद आणि महबूबनगर-कुरनूल दरम्यानच्या विद्युतीकरण प्रकल्पामुळे रेल्वेच्या सरासरी वेगात सुधारणा होण्यास मदत होईल. भारतीय रेल्वेने पुढील काही महिन्यांत सर्व रेल्वे मार्गांचे १०० टक्के विद्युतीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्या ९ वर्षात समस्यांचे निराकरण करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

दरम्यान, गेल्या ९ वर्षांपासून परवडणारी आरोग्यसेवा देण्यासाठी काम करत आहोत. देशभरात एम्स रुग्णालयांची संख्या वाढवली जात आहे. तेलंगणातही एम्सचे काम सुरू आहे. आज जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आयुष्मान भारत भारतात सुरू आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. 

 

टॅग्स :TelanganaतेलंगणाNarendra Modiनरेंद्र मोदीK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावBJPभाजपाBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समिती