शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

"माझ्या तिसऱ्या टर्ममध्ये जगातील टॉप- ३ अर्थव्यवस्थांमध्ये भारत असेल", मोदींचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 20:03 IST

माझ्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत हा जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

narendra modi : माझ्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत हा जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल, असा दावा पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केला आहे. "मी देशाला हा विश्वास देऊ शकतो की, तिसऱ्या टर्ममध्ये जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारताचे देखील नाव असेल. पहिल्या तीनमध्ये हिंदुस्थान अभिमानाने उभा असेल. २०२४ मध्ये आमच्या तिसऱ्या टर्ममध्ये देशाचा विकास अधिक वेगाने होईल. तसेच तुमची स्वप्ने तुमच्या डोळ्यासमोर पूर्ण होताना दिसतील", असेही मोदींनी नमूद केले. 

दिल्लीतील प्रगती मैदानावर भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन समारंभात बोलताना पंतप्रधान मोदींनी हे विधान केले. तसेच आमच्या पहिल्या टर्मच्या सुरुवातीला भारत जागतिक अर्थव्यवस्थेत दहाव्या क्रमांकावर होता. तुम्ही मला जेव्हा काम दिले तेव्हा आपण दहाव्या क्रमांकावर होतो. आमच्या दुसऱ्या टर्ममध्ये भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. आंतरराष्ट्रीय एजन्सी असेही सांगत आहेत की, भारतातील भीषण गरिबी संपण्याच्या मार्गावर आहे, असेही मोदींनी यावेळी सांगितले. 

भारत लोकशाहीची जननी - मोदी पंतप्रधान मोदींनी आणखी सांगितले की, आज संपूर्ण जग स्वीकारत आहे की, भारत लोकशाहीची जननी आहे. आज आपण स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत असताना अमृत महोत्सव साजरा करत आहोत, त्यामुळे हा 'भारत मंडपम' ही आम्हा भारतीयांनी आपल्या लोकशाहीला दिलेली एक सुंदर भेटच आहे. काही आठवड्यांनंतर इथे G-20 शी संबंधित कार्यक्रम आयोजित केले जातील. जगातील बड्या देशांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण जगाला भारताची वाढती पावले आणि भारताची वाढती उंची या 'भारत मंडपम'मधून दिसेल. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानBJPभाजपा