शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

मणिपूरमध्ये शांतता करार दुसऱ्याच दिवशी संपुष्टात; मैतेईबरोबर केलेला करार हमार जमातीच्या संघटनेकडून रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 13:10 IST

...तसेच मैतेई जमातीबरोबर केलेला करार संपुष्टात आणल्याचे हमार जमातीच्या संघटनेने शनिवारी जाहीर केले.

इम्फाळ : मणिपूरमधील जिरिबाम जिल्ह्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मैतेई व हमार जमातींमध्ये करार होऊन २४ तास उलटायच्या आत त्या ठिकाणी हवेत गोळीबार करण्याच्या तसेच सध्या कोणीही राहत नसलेले घर जाळण्याच्या घटना शुक्रवारी रात्री घडल्या. तसेच मैतेई जमातीबरोबर केलेला करार संपुष्टात आणल्याचे हमार जमातीच्या संघटनेने शनिवारी जाहीर केले.

जिरिबाममध्ये हिंसाचार उफाळून आल्यानंतर तेथील काही गावांमध्ये मैतेई जमातीच्या लोकांनी आपली घरेदारे सोडून सुरक्षित ठिकाणी पलायन केले होते. त्यापैकी एका गावातील घर जाळण्यात आले आहे. हे कृत्य करणाऱ्या सशस्त्र हल्लेखोरांनी हवेत गोळीबारही केला. या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी त्या गावाकडे धाव घेतली. त्या हल्लेखोरांचा आता कसून शोध सुरू आहे. जिरिबाम येथे शांतता प्रस्थापित होण्यासाठी मैतेई व हमार या जमातींमध्ये आसाममधील कचर जिल्ह्यात सीआरपीएफ छावणीत गुरुवारी एक करार झाला होता. त्यासाठी जिल्हा प्रशासन, आसाम रायफल्स, सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता.

या करारप्रसंगी थाडौ, पायते आणि मिझो जमातीचे प्रतिनिधीही उपस्थित होते. या सर्वांची पुढील बैठक येत्या १५ ऑगस्टला आयोजिण्यात आली आहे. मैतेईबरोबर केलेला करार संपुष्टात आणल्याची घोषणा हमार इनपुई या संघटनेने केल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले. आमच्याशी संबंधित गटांनी प्रमुख नेत्यांना कल्पना न देता हा करार करण्यात आला होता असे या संघटनेने म्हटले आहे. करारात सहभागी झालेले लोक हे हमार जमातीचे प्रतिनिधी नाहीत असा दावाह करण्यात आला. शांततेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांच्या भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात मणिपूरमध्ये उफाळलेल्या हिंसाचारात २००हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता व हजारो लोकांना विस्थापित व्हावे लागले होते. (वृत्तसंस्था

मणिपूरमध्ये आसाम रायफल्सचे जवान तैनात ठेवामणिपूरमधील हिंसाचारग्रस्त भागांमध्ये आसाम रायफल्सचेच जवान तैनात ठेवावेत. त्यांच्याऐवजी सीआरपीएफचे जवान या राज्यात तैनात करू नयेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी कुकी-झो जमातीच्या दहा आमदारांनी त्यांना पत्र पाठवून केली आहे. आसाम रायफल्समधील जवानांना मणिपूरची खडानखडा माहिती आहे. त्याऐवजी या परिसराची फारशी माहिती नसलेल्या दलाचे जवान तैनात केले तर मणिपूरमध्ये हिंसाचार वाढण्याची शक्यता आहे, अशी भीती कुकी-झो जमातीच्या आमदारांनी या पत्रात व्यक्त केली आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार