शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

मणिपूरमध्ये भाजप आमदार, नेत्यांची घरे जाळण्याचा प्रयत्न, हिंसक जमावाची सुरक्षा दलाबरोबर चकमक; दोन जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 06:18 IST

इरिंगबाम पोलिस ठाण्यातून शस्त्रास्त्रे पळविण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.

इम्फाळ / कोलकाता : मणिपूरमध्ये ३ मेपासून सुरू असलेला हिंसाचार अद्यापही सुरूच आहे. शुक्रवारी रात्री इम्फाळ शहरामध्ये सुरक्षा दलाचे जवान व हिंसक जमावामध्ये झालेल्या चकमकीत दोन जण जखमी झाले. संतप्त जमावाने भाजपचा एक आमदार व त्या पक्षाच्या नेत्यांची घरे जाळण्याचा प्रयत्न केला. मणिपूरच्या बिष्णूपूर जिल्ह्यातील क्वाक्ता आणि चुराचंदपूर जिल्ह्यातील कांगवाई येथे संपूर्ण रात्रभर गोळीबार सुरू होता, असे पोलिसांनी सांगितले. इरिंगबाम पोलिस ठाण्यातून शस्त्रास्त्रे पळविण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. हजार लोकांच्या जमावाने या शहरातील राजवाड्याजवळ असलेल्या इमारतींना आग लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून व रबरी गोळ्यांचा मारा करून जमावाला पांगविले. (वृत्तसंस्था)

नेत्याच्या घरात घुसून जमावाने केली तोडफोडइम्फाळमध्ये भाजपचे आमदार बिस्वजित यांच्या घराला आग लावण्याचा व या शहरात भाजप महिला शाखेच्या अध्यक्षा शारदा देवी यांच्या घरात घुसून जमावाने तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा दलांनी त्वरित कारवाई करून या हिंसक जमावाला पांगविले.

आतापर्यंत अनेक मालमत्तांना आगसुमारे दीड महिन्यापासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत अनेक मालमत्तांना आग लावण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री आर. के. रंजन सिंह यांच्या घरावर गुरुवारी रात्री हल्ला करण्यात आला होता. त्यांचे घर जाळण्याचा प्रयत्नही जमावाने केला होता. 

१० विरोधी पक्षांना करायची आहे पंतप्रधानांशी चर्चा : जयराम रमेशमणिपूरमधील स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी त्या राज्यातील १० विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १० जून रोजी एक पत्र पाठवून भेटीसाठी वेळ मागितली होती. मात्र, त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, असा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला. अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी ते विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करतील अशी आशा आहे, असेही जयराम रमेश यांनी म्हटले.

काय आहे वाद?मैतेई आणि कुकी समुदायांतील आरक्षणविषयक वादातून मणिपूर पेटले असून, आतापर्यंत १०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ११ जिल्ह्यांत संचारबंदी लावण्यात आली आहे. अनुसूचित जातीचा (एसटी) दर्जा देण्याच्या मैतेई समुदायाच्या मागणीविरोधात मणिपूरच्या पहाडी जिल्ह्यांत ‘आदिवासी ऐक्य मार्च’चे आयोजन ३ मे रोजी करण्यात आले होते. तेव्हापासून राज्यात हिंसाचार सुरू आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार