शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

मणिपूरमध्ये भाजप आमदार, नेत्यांची घरे जाळण्याचा प्रयत्न, हिंसक जमावाची सुरक्षा दलाबरोबर चकमक; दोन जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 06:18 IST

इरिंगबाम पोलिस ठाण्यातून शस्त्रास्त्रे पळविण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.

इम्फाळ / कोलकाता : मणिपूरमध्ये ३ मेपासून सुरू असलेला हिंसाचार अद्यापही सुरूच आहे. शुक्रवारी रात्री इम्फाळ शहरामध्ये सुरक्षा दलाचे जवान व हिंसक जमावामध्ये झालेल्या चकमकीत दोन जण जखमी झाले. संतप्त जमावाने भाजपचा एक आमदार व त्या पक्षाच्या नेत्यांची घरे जाळण्याचा प्रयत्न केला. मणिपूरच्या बिष्णूपूर जिल्ह्यातील क्वाक्ता आणि चुराचंदपूर जिल्ह्यातील कांगवाई येथे संपूर्ण रात्रभर गोळीबार सुरू होता, असे पोलिसांनी सांगितले. इरिंगबाम पोलिस ठाण्यातून शस्त्रास्त्रे पळविण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. हजार लोकांच्या जमावाने या शहरातील राजवाड्याजवळ असलेल्या इमारतींना आग लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून व रबरी गोळ्यांचा मारा करून जमावाला पांगविले. (वृत्तसंस्था)

नेत्याच्या घरात घुसून जमावाने केली तोडफोडइम्फाळमध्ये भाजपचे आमदार बिस्वजित यांच्या घराला आग लावण्याचा व या शहरात भाजप महिला शाखेच्या अध्यक्षा शारदा देवी यांच्या घरात घुसून जमावाने तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा दलांनी त्वरित कारवाई करून या हिंसक जमावाला पांगविले.

आतापर्यंत अनेक मालमत्तांना आगसुमारे दीड महिन्यापासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत अनेक मालमत्तांना आग लावण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री आर. के. रंजन सिंह यांच्या घरावर गुरुवारी रात्री हल्ला करण्यात आला होता. त्यांचे घर जाळण्याचा प्रयत्नही जमावाने केला होता. 

१० विरोधी पक्षांना करायची आहे पंतप्रधानांशी चर्चा : जयराम रमेशमणिपूरमधील स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी त्या राज्यातील १० विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १० जून रोजी एक पत्र पाठवून भेटीसाठी वेळ मागितली होती. मात्र, त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, असा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला. अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी ते विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करतील अशी आशा आहे, असेही जयराम रमेश यांनी म्हटले.

काय आहे वाद?मैतेई आणि कुकी समुदायांतील आरक्षणविषयक वादातून मणिपूर पेटले असून, आतापर्यंत १०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ११ जिल्ह्यांत संचारबंदी लावण्यात आली आहे. अनुसूचित जातीचा (एसटी) दर्जा देण्याच्या मैतेई समुदायाच्या मागणीविरोधात मणिपूरच्या पहाडी जिल्ह्यांत ‘आदिवासी ऐक्य मार्च’चे आयोजन ३ मे रोजी करण्यात आले होते. तेव्हापासून राज्यात हिंसाचार सुरू आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार