शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

हरयाणात 'आप'चा झाडू चालला; झेडपीत भाजपची सफाई, केवळ २२ जागांवर विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 06:18 IST

१०२ पैकी केवळ २२ जागांवर कमळ फुलले

हरीश गुप्ता लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : हरयाणातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा पराभव हा धक्कादायक ठरला आहे, कारण त्यांना १०२ जागांपैकी केवळ २२ जागा जिंकता आल्या आहेत. २२ जिल्ह्यांत जिल्हा परिषदेच्या ४११ जागा होत्या. भाजपने केवळ १०२ जागा आपल्या चिन्हावर लढविण्याचा निर्णय घेतला होता. या पक्षाने मात्र अपक्ष म्हणून १५१ जागा जिंकल्याचा दावा केला आहे. 

उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या नेतृत्वाखालील त्यांच्या सहकारी जेजेपीने रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेतला आणि भाजपला शहरी भागावर लक्ष केंद्रित करण्यास भाग पाडले. मात्र, रविवारी निकाल हाती आल्यानंतर भाजपची मोठी कोंडी झाली. जेजेपीसाठी धक्कादायक बाब म्हणजे त्यांचा प्रतिस्पर्धी आयएनएलडीचा मोठा विजय झाला आहे. त्यांनी ९८ जागांवर निवडणूक लढविली आणि १३ जागा जिंकल्या. दोन्ही पक्ष जाट मतांवर वर्चस्व मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. 

अपक्षांची सुरू झाली लगबग n सर्वात आश्चर्यकारक घडामोडी म्हणजे, आपचा उदय. ११४ वॉर्डांमधून १४ जागा त्यांनी जिंकल्या आहेत. हरयाणात आप बूस्टर डोसच्या शोधात असताना हे निकाल आले आहेत. n काँग्रेसने पक्षाच्या चिन्हावर निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. मोठ्या संख्येने त्यांचे उमेदवार अपक्ष म्हणून विजयी झाल्याचा दावा त्यांनी केला. n भाजपने दोन महिन्यांपूर्वी ४६ नगरपालिकांत बहुमत मिळविले होते. पुढील महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची प्रमुख पदे काबीज करण्यासाठी अपक्षांची लगबग सुरू झाली आहे.

टॅग्स :AAPआपHaryanaहरयाणाElectionनिवडणूकBJPभाजपा