शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावाच्या मुद्द्यावर INDIA आघाडीला पहिला धक्का, या पक्षाने पाठिंबा नाकारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 13:31 IST

YSR Congress: आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी पक्ष आणि लोकसभेमध्ये २२ खासदार असलेल्या वायएसआर काँग्रेस पक्षाने विरोधी आघाडीने आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.

मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या INDIA ने केंद्र सरकारची कोंडी केलेली आहे. लोकसभेमध्ये विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावही दाखल केला आहे. मात्र या अविश्वास प्रस्तावापूर्वी विरोधी आघाडीला मोठा धक्का बसला आहे. आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी पक्ष आणि लोकसभेमध्ये २२ खासदार असलेल्या वायएसआर काँग्रेस पक्षाने विरोधी आघाडीने आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढंच नाही तर वायएसआर काँग्रेसने दिल्लीतील अध्यादेशाच्या मुद्द्यावरही केंद्र सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. वायएसआर काँग्रेसने आतापर्यंत विरोधी पक्षांची आघाडी असलेली INDIA आणि एनडीए या आघाड्यांपासून समान अंतर राखले आहे.

वायएसआर काँग्रेसचा हा निर्णय INDIA आघाडीसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. कारण आतापर्यंत जगनमोहन रेड्डी हे सत्ताधारी आणि विरोधकांपासून समान अंतर राखून आहेत. मात्र वायएसआर काँग्रेस पक्ष हा दीर्घकाळापासून भाजपासोबत आघाडी करेल अशी चर्चा रंगवली जात आहे. एवढंच नाही तर अनेक मुद्द्यांवर वायएसआर काँग्रेसने केंद्र सरकारला पाठिंबा दिला आहे. हल्लीच झालेल्या नव्या संसदेच्या उदघाटन सोहळ्यामध्येही रेड्डी यांचा पक्ष सहभागी झाला होता. 

लोकसभेमध्ये मोदी सरकारकडे बहुमत आहे. भाजपाकडे लोकसभेत ३०१ खासदार आहेत. तर एनडीएकडे एकूण ३३३ मतदार आहेत. तर संपूर्ण विरोधी पक्षांकडे मिळून १४२ खासदार आहेत. विरोधी पक्षांमध्ये काँग्रेसकडे सर्वाधिक ५० खासदार आहेत. अशा परिस्थितीत वायएसआर काँग्रेसचा पाठिंबा मोदी सरकारसाठी फार महत्त्वाचा नाही. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा पाठिंबा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

तर राज्यसभेचा विचार केल्यास एकूण २३८ खासदार आहेत. त्यामध्ये एनडीएकडे १०५ खासदार आहेत. तर INDIA आघाडीकडे ९३ खासदार आहेत. अशा परिस्थितीत भाजपाने दिल्लीवरील विधेयक आणलं तर भाजपाला पाठिंब्यासाठी १५ आणखी खासदारांची आवश्यकता असेल. अशा परिस्थितीत वायएसआर काँग्रेसकडील ९ खासदार हे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.  

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावCentral Governmentकेंद्र सरकार