शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावाच्या मुद्द्यावर INDIA आघाडीला पहिला धक्का, या पक्षाने पाठिंबा नाकारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 13:31 IST

YSR Congress: आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी पक्ष आणि लोकसभेमध्ये २२ खासदार असलेल्या वायएसआर काँग्रेस पक्षाने विरोधी आघाडीने आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.

मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या INDIA ने केंद्र सरकारची कोंडी केलेली आहे. लोकसभेमध्ये विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावही दाखल केला आहे. मात्र या अविश्वास प्रस्तावापूर्वी विरोधी आघाडीला मोठा धक्का बसला आहे. आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी पक्ष आणि लोकसभेमध्ये २२ खासदार असलेल्या वायएसआर काँग्रेस पक्षाने विरोधी आघाडीने आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढंच नाही तर वायएसआर काँग्रेसने दिल्लीतील अध्यादेशाच्या मुद्द्यावरही केंद्र सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. वायएसआर काँग्रेसने आतापर्यंत विरोधी पक्षांची आघाडी असलेली INDIA आणि एनडीए या आघाड्यांपासून समान अंतर राखले आहे.

वायएसआर काँग्रेसचा हा निर्णय INDIA आघाडीसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. कारण आतापर्यंत जगनमोहन रेड्डी हे सत्ताधारी आणि विरोधकांपासून समान अंतर राखून आहेत. मात्र वायएसआर काँग्रेस पक्ष हा दीर्घकाळापासून भाजपासोबत आघाडी करेल अशी चर्चा रंगवली जात आहे. एवढंच नाही तर अनेक मुद्द्यांवर वायएसआर काँग्रेसने केंद्र सरकारला पाठिंबा दिला आहे. हल्लीच झालेल्या नव्या संसदेच्या उदघाटन सोहळ्यामध्येही रेड्डी यांचा पक्ष सहभागी झाला होता. 

लोकसभेमध्ये मोदी सरकारकडे बहुमत आहे. भाजपाकडे लोकसभेत ३०१ खासदार आहेत. तर एनडीएकडे एकूण ३३३ मतदार आहेत. तर संपूर्ण विरोधी पक्षांकडे मिळून १४२ खासदार आहेत. विरोधी पक्षांमध्ये काँग्रेसकडे सर्वाधिक ५० खासदार आहेत. अशा परिस्थितीत वायएसआर काँग्रेसचा पाठिंबा मोदी सरकारसाठी फार महत्त्वाचा नाही. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा पाठिंबा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

तर राज्यसभेचा विचार केल्यास एकूण २३८ खासदार आहेत. त्यामध्ये एनडीएकडे १०५ खासदार आहेत. तर INDIA आघाडीकडे ९३ खासदार आहेत. अशा परिस्थितीत भाजपाने दिल्लीवरील विधेयक आणलं तर भाजपाला पाठिंब्यासाठी १५ आणखी खासदारांची आवश्यकता असेल. अशा परिस्थितीत वायएसआर काँग्रेसकडील ९ खासदार हे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.  

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावCentral Governmentकेंद्र सरकार