शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

इम्रान खान यांची प्रतिहल्ल्याची वल्गना चोवीस तासांमध्येच विरली; पाक नरमला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 05:26 IST

भारताची मागणी । प्रतिहल्ल्यावेळी पाकिस्तानच्या ताब्यात घेतलेल्या वैमानिकाला सोडा

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे तळ नष्ट केल्यानंतर पाकिस्तानी विमानांनीही बुधवारी काश्मीरमध्ये घुसखोरी केली खरी, पण त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चर्चेचा व शांततेचा प्रस्ताव ठेवल्याने भारतापुढे पाकिस्तान नरमल्याचे दिसते. पुलवामा हल्ल्यात पाक दहशतवाद्यांचा हात असल्याच्या भारताच्या आरोपाची चौकशी करण्यास आपण तयार आहोत, अशी नमती भूमिका त्यांनी घेतली. आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणाचा पाठिंबा मिळणे शक्य नाही आणि मुस्लीम राष्ट्रेही युद्धजन्य परिस्थितीत मदत करणार नाही, हे इम्रान खान यांच्या लक्षात आल्यानेच ते अचानक मवाळ झाले.

त्यानंतर भारतानेही पुलवामा हल्ल्याचे सारे पुरावे पाकिस्तानच्या दिल्लीतील उच्चायुक्तांना दिले. त्यानंतर पाकच्या विमानांना पिटाळून लावताना, कोसळलेल्या भारतीय विमानाच्या पायलटला सोडण्याची मागणीही पाकिस्तानकडे केली. तसेच त्याला पाकिस्तानने कोणताही शारीरिक वा मानसिक त्रास देऊ नये आणि त्याच्या हवाई दलातील दर्जाप्रमाणे वागणूक द्यावी, असेही भारताने बजावले आहे. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान असे त्याचे नाव आहे.

भारत व पाकिस्तानमध्ये युद्ध होऊ नये, शांतताच असायला हवी, असे सांगत, इम्रान खान यांनी मोठ्या युद्धांमध्ये गणिते चुकतात आणि सर्वसामान्यांची परवड होते, असे नमूद केले. तसेच पहिले व दुसरे महायुद्ध, अमेरिकेने अफगाणिस्थानात केलेली लष्करी मोहीम तसेच व्हिएतनाम युद्ध यांचे दाखलेही दिले. या प्रकरणात अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवाद्यांवर कारवाई करा, असे ठणकावतानाच, भारताची उघडपणे बाजू घेतली होती. पण पाकिस्तानचा मित्र चीननेही दहशतवाद्यांना आश्रय देऊ नका, असे सुनावले. त्यामुळे झालेली पंचाईत इम्रान खान यांच्या वक्तव्यांतून दिसत होती. पाकिस्तान लष्करानेही पडती भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले. भारताने खरोखर युद्ध केले, तर आपण त्याचा सामना करू शकणार नाही, असे लष्कराच्या लक्षात आल्यामुळेच तेथील अधिकाऱ्यांनीही आपली भाषा बदलली.

पाकची नवी भाषापाकिस्तानची ओळख युद्ध करण्यासाठी नाही. शांतता हाच आमचा संदेश आहे. युद्धात कोणाचाच विजय होत नसतो. आम्ही शांततेच्या मार्गावर चालू इच्छितो. भारतालाही शांतता हवी असेल, तर आपण चर्चा करणे गरजेचे आहे. युद्धाच्या माध्यमातून कोणताही मुद्दा सोडविला जाऊ शकत नाही, अशी पाकिस्तानची भूमिका आहे. भारताने आमच्या या प्रस्तावावर शांतपणे विचार करावा.

हवाई दलाचे सहा अधिकारी हेलिकॉप्टर कोसळून मृत्युमुखी 

भारतीय हवाई दलाचे एक मालवाहू हेलिकॉप्टर बुधवारी सकाळी बडगाम जिल्ह्यात कोसळले आणि त्यातील सहा अधिकारी व एक स्थानिक रहिवासी असे सात जण त्यात मरण पावले. या हेलिकॉप्टरमध्ये असलेले नाशिकचे स्क्वाड्रन लीडर निनाद अनिल मांडवगाणे हेही या अपघातात मरण पावले.या अपघातानंतर हे हेलिकॉप्टरही आम्ही पाडल्याचा दावा करीत पाकने त्या अपघाताची छायाचित्रे समाजमाध्यमांवर पोस्ट केली. हे एमआय-१७ प्रकारचे हेलिकॉप्टर होते. बडगाम जिल्ह्यातील गरेंद कलाँ या गावी हे हेलिकॉप्टर कोसळले. सुरुवातीला ते विमान असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. सातही जणांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत, तसेच या अपघाताच्या चौकशीचे आदेश हवाई दलाने दिले आहेत.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तान