शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुधारणा- मनोज नरवणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 19:54 IST

लष्करातील माझ्या अनुभवामुळे, विशेषत: शेवटच्या दोन कामकाजांमुळे प्रशिक्षणाबरोबरच कार्यबद्दलही मला चांगली कल्पना मिळालेली आहे.

नवी दिल्ली: जनरल बिपीन रावत यांच्या निवृत्तीनंतर लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज भारतीय सैन्याच्या लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे. लष्करातील माझ्या अनुभवामुळे, विशेषत: शेवटच्या दोन कामकाजांमुळे प्रशिक्षणाबरोबरच कार्यबद्दलही मला चांगली कल्पना मिळालेली आहे. त्यामुळे कार्यवाहीमधील तत्परतेचे मापदंड राखणे आवश्यक आहे, असं ते म्हणाले आहेत. 

दहशतवाद ही जगभरातील समस्या आहे आणि बर्‍याच काळापासून भारतही दहशतवादाचा सामना करत आहे. त्यामुळेच संपूर्ण जग आणि दहशतवादाने ग्रस्त असलेल्या अनेक देशांना आपल्याला नेमका कोणता धोका आहे, याची जाणीव होत आहे.आमच्या शेजारील देश दहशतवादाचा वापर करून युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. शेजारील राष्ट्रांकडून सुरू असलेलं छुपं युद्ध फार काळ चालणार नाही. अशी स्थिती जास्त काळ टिकू शकत नाही. कारण लोकांना सारखं सारखं मूर्ख बनवता येत नाही.अनुच्छेद 370च्या रद्दबातलानंतरच्या परिस्थितीत निश्चितच सुधारणा झाली आहे.हिंसाचाराच्या घटनांमध्ये घट झाली आहे, जम्मू-काश्मीरच्या लोकसंख्येच्या दृष्टीने हे चांगले आहे. प्रदेशात शांतता व समृद्धी आणण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे. युद्धबंदीचे उल्लंघन होत आहे, आम्हाला हे माहीत आहे की पलीकडे जाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या विविध लाँचपॅडमध्ये दुसरीकडे दहशतवादी आहेत, पण आम्ही हा धोका पत्करण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत.वास्तविक नियंत्रण रेषा कोठे आहे यावर मतभेदांमुळे उल्लंघन होत आहे. नियंत्रण रेषेवर शांतता कशी टिकवायची यासंदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून दहशतवाद्यांच्या जमिनीवरच्या हालचाली कमी झालेल्या आहेत.