शहरं
Join us  
Trending Stories
1
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
2
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
3
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
4
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
5
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
6
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
7
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
8
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
9
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
10
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
12
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
13
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
14
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
15
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
16
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
17
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
18
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
19
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
20
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट

देशावर एक भाषा लादणे अयोग्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 02:43 IST

- अनिल गोरे, सदस्य, मराठी भाषा सल्लागार समिती, (महाराष्ट्र राज्य) ‘एक देश, एक भाषा’ भारतात योग्य नाही. याला कारण भावनिक नाही. ...

- अनिल गोरे, सदस्य, मराठी भाषा सल्लागार समिती, (महाराष्ट्र राज्य)‘एक देश, एक भाषा’ भारतात योग्य नाही. याला कारण भावनिक नाही. तर शास्त्रीय कारण आहेत. भाषा हे भौगोलिक वैशिष्ट्य आहे. एखाद्या भागातला निसर्ग, व्यवसाय, भूभागाचे हवामान, पीक, जीवनपद्धती, कला कौशल्य यांच्याशी निगडित भाषा असते. महाराष्ट्रात भाषा शेतीशी जोडलेली आहे. भारतात विविध भौगोलिक भाषा आहेत. त्यामुळे भारतात ‘एक भाषा’ होऊ शकत नाही.भाषेला गुणात्मक निकष लावला पाहिजे. हिंदी वगळता सर्व भारतीयांना ४०० वर्षांहून अधिक इतिहास आहे. त्यामुळे हिंदी भाषा लादणे योग्य नाही. भारतातील एकूण ४९ भाषा एकत्र करून हिंदी भाषा निर्माण झाली आहे. त्यामुळे ती कृत्रिम भाषा आहे. देशात एकूण ६,७०० बोलीभाषा आहेत. तर जगात २१ हजार भाषा आहेत. जगात एकाही लोकशाही देशाला राष्ट्रभाषा नाही. १३ देशांनाच राष्ट्रभाषा आहे. १९० देशांना नाही. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी या लोकशाही देशांनी राष्ट्रभाषा ठरवलेली नाही. भाषा ठरवली गेली तर देशाचे तुकडे पडतात. भाषेमुळे तुकडे पडल्याने देशांची नावे भाषेवरून ठेवली गेली. पाकिस्तानने राष्ट्रभाषा ठरवण्याचा आगाऊपणा केल्याने पाकिस्तानचे तुकडे पडले. जिनांनी राष्ट्र निर्माण केले म्हणून त्यांच्या आग्रहाखातर उर्दू ही राष्ट्रभाषा ठरवण्यात आली. मात्र १९७१ लाच पाकिस्तानचा पहिला तुकडा पडला. बांग्लादेश बांग्लाभाषेमुळे वेगळा झाला. भारताने ‘एक देश, एक भाषा’ असे सूत्र स्वीकारल्यास देशाचे १६ तुकडे पडतील. पाकिस्तानसारखे दुर्दैव आपल्याकडे होऊ नये. त्यामुळे भारतीय व्यक्तीने ‘एक देश, बहू भाषा’ असा विचार करावा.