शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

सर्व कृषीमालाची हमीभावाने खरेदी अशक्य; अहवाल सार्वजनिक करा, समितीचे सदस्य अनिल घनवट यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 06:49 IST

शेतकरी संघटनेचे नेते घनवट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की सरकारचे संपूर्ण महसुली उत्पन्न हमी भावावर खर्च केले जाऊ शकत नाही. हमी भावाने खरेदी करण्यासाठी सरकारकडे पैसा कुठून येणार? खरेदी केल्यानंतरही त्याची साठवणूक आणि वितरण कसे हाेणार? असे अनेक प्रश्न आहेत.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांबाबत सर्वाेच्च न्यायालयाने एक समिती नेमली हाेती. समितीने न्यायालयात अहवाल सादर केला हाेता. ताे लवकरात लवकर सार्वजनिक करावा, अशी मागणी समितीचे सदस्य अनिल घनवट यांनी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांना पत्र लिहून केली आहे. सर्व प्रकारच्या कृषीमालाची हमी भावाने खरेदी करणे आणि यासाठी कायदा करण्याची शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करणे अशक्य असून लागू करण्यायाेग्य नाही, असे मत घनवट यांनी मांडले आहे. शेतकरी संघटनेचे नेते घनवट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की सरकारचे संपूर्ण महसुली उत्पन्न हमी भावावर खर्च केले जाऊ शकत नाही. हमी भावाने खरेदी करण्यासाठी सरकारकडे पैसा कुठून येणार? खरेदी केल्यानंतरही त्याची साठवणूक आणि वितरण कसे हाेणार? असे अनेक प्रश्न आहेत. कृषीक्षेत्राला मुक्त करणे आणि शेतकऱ्यांना स्वत:च्या मालाचे विपणन करण्याचे स्वातंत्र्य दिल्याने या समस्यांवर ताेडगा निघू शकताे, असे घनवट म्हणाले.त्यांनी सांगितले, की केंद्र सरकारने तीनही कृषी कायद्यांना मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतरही समितीच्या अहवालाला अर्थ राहत नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी अनेक सूचना करण्यात आल्या आहेत. कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये अनेक गैरसमजुती आहेत. शेतकऱ्यांची काही नेत्यांनी दिशाभूल केली आहे, असे माझे मत आहे. त्यामुळे अहवाल सार्वजनिक करून जनतेसमाेर त्यातील मुद्दे आले पाहिजेत, असे घनवट म्हणाले. घनवट म्हणाले की, नवे कायदे अस्तित्वात राहणार नाहीत. मात्र, त्यातून कृषीक्षेत्रातील सुधारणांची प्रबळ इच्छा टिकून राहायला हवी. अनिल घनवट यांनी नवे कृषी कायदे बनविण्यासाठी श्वेतप्रत्रिका काढण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचीही सूचना केली आहे.

देशभर करणार दाैरा-  घनवट यांनी सांगितले की, मी देशभरात दाैरा करणार आहे. शेतकऱ्यांना कृषीक्षेत्रातील सुधारणांच्या फायद्यांबाबत माहिती देणार आहे. - अनेक शेतकरी आवश्यक कृषी सुधारणांची मागणी करत आहेत. पुढील काही महिन्यांमध्ये अशा सुमारे एक लाख शेतकऱ्यांना एकत्र करणार असल्याचेही घनवट म्हणाले.

अनेक सूचनाशेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी या अहवालात अनेक सूचना करण्यात आल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी या सूचनांचा उपयोग होऊ शकतो.

- अनिल घनवट म्हणाले की, तीन कृषी कायद्यांना विराेध करणाऱ्या शेतकऱ्यांनी सैद्धांतिक स्वरूपात कायदे स्वीकारले हाेते. मात्र, ते पूर्णपणे मान्य नव्हते केले. - याचे प्रमुख कारण म्हणजे, सरकारचे चर्चेचे धाेरण नव्हते. त्यामुळे एक सक्षम नीती प्रक्रिया विकसित करावी, अशी मागणीही घनवट यांनी केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीFarmers Protestशेतकरी आंदोलनCentral Governmentकेंद्र सरकारCourtन्यायालय