शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
4
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
5
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
6
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
7
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
8
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
9
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
10
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
11
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
12
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
13
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
14
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
15
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
16
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
17
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
18
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
19
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
20
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?

'वंदे मातरम्'चे महत्त्वाचे कडवे १९३७ मध्ये वगळले अन् फाळणीची बीजे पेरली- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 13:20 IST

"फुटीरतावादी मानसिकता अजूनही देशासाठी आव्हान"

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताचे महत्त्वाचे कडवे १९३७ मध्ये वगळण्यात आले होते. त्यामुळे फाळणीची बीजे पेरली गेली आणि अशी फुटीर मानसिकता अजूनही देशासाठी एक आव्हान आहे, असे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी म्हटले आहे. वंदे मातरम् गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वर्षभराच्या स्मरणोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. त्यांनी येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये या प्रसंगी एक टपाल तिकीट आणि नाणे जारी केले.

वंदे मातरम् हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा आवाज बनले, ते प्रत्येक भारतीयाच्या भावना व्यक्त करत होते. दुर्दैवाने, १९३७ मध्ये वंदे मातरमचे महत्त्वाचे कडवे जे त्याच्या आत्म्याचा भाग होते, ते वगळण्यात आले. वंदे मातरमच्या विभाजनाने फाळणीची बीजेदेखील पेरली. राष्ट्र उभारणीच्या या ‘महामंत्रा’सोबत हा अन्याय का केला गेला, हे आजच्या पिढीला जाणून घेण्याची गरज आहे. ही फूट पाडणारी मानसिकता अजूनही देशासाठी एक आव्हान आहे, असे ते म्हणाले.

देशभरात विविध कार्यक्रम

वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, आसाम, तेलंगणा, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, सिक्कीम, गोवा, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, त्रिपुरा, ओडिशा, दिल्ली, राजस्थान आदी राज्यांत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

भाजप, संघानेच हे गीत टाळले : खरगे

देशाच्या सामूहिक आत्म्याला जागृत करणाऱ्या आणि भारताच्या स्वातंत्र्याचा आवाज बनलेल्या वंदेमातरमचा काँग्रेसला अभिमान आहे, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे. भाजप आणि संघाने मात्र सार्वत्रिक आदर असलेले हे गीत टाळले आहे, अशी टीका त्यांनी केली. काँग्रेस वंदेमातरमची अभिमानी ध्वजवाहक आहे. या गीतांचा काँग्रेसला अभिमान आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

‘वंदे मातरम्’ एकतेचे  प्रतीक : राष्ट्रपती मुर्मू 

‘वंदे मातरम्’ हे जनतेच्या भावनिक चेतनेचे आणि एकतेचे प्रतीक आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतमाता ‘सुजलाम्’, ‘सुफलाम्’ आणि ‘सुखदाम्’ ठेवण्याचा संकल्प करूया, असे त्यांनी म्हटले आहे.

देशाला एकसंध ठेवले : शाह

‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताने भारतीय स्वातंत्र्य चळवळीला दिशा दिली आणि स्वातंत्र्यानंतर देशाला एकसंध ठेवले, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Vande Mataramवंदे मातरमprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी