शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

'वंदे मातरम्'चे महत्त्वाचे कडवे १९३७ मध्ये वगळले अन् फाळणीची बीजे पेरली- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 13:20 IST

"फुटीरतावादी मानसिकता अजूनही देशासाठी आव्हान"

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताचे महत्त्वाचे कडवे १९३७ मध्ये वगळण्यात आले होते. त्यामुळे फाळणीची बीजे पेरली गेली आणि अशी फुटीर मानसिकता अजूनही देशासाठी एक आव्हान आहे, असे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी म्हटले आहे. वंदे मातरम् गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वर्षभराच्या स्मरणोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. त्यांनी येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये या प्रसंगी एक टपाल तिकीट आणि नाणे जारी केले.

वंदे मातरम् हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा आवाज बनले, ते प्रत्येक भारतीयाच्या भावना व्यक्त करत होते. दुर्दैवाने, १९३७ मध्ये वंदे मातरमचे महत्त्वाचे कडवे जे त्याच्या आत्म्याचा भाग होते, ते वगळण्यात आले. वंदे मातरमच्या विभाजनाने फाळणीची बीजेदेखील पेरली. राष्ट्र उभारणीच्या या ‘महामंत्रा’सोबत हा अन्याय का केला गेला, हे आजच्या पिढीला जाणून घेण्याची गरज आहे. ही फूट पाडणारी मानसिकता अजूनही देशासाठी एक आव्हान आहे, असे ते म्हणाले.

देशभरात विविध कार्यक्रम

वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, आसाम, तेलंगणा, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, सिक्कीम, गोवा, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, त्रिपुरा, ओडिशा, दिल्ली, राजस्थान आदी राज्यांत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

भाजप, संघानेच हे गीत टाळले : खरगे

देशाच्या सामूहिक आत्म्याला जागृत करणाऱ्या आणि भारताच्या स्वातंत्र्याचा आवाज बनलेल्या वंदेमातरमचा काँग्रेसला अभिमान आहे, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे. भाजप आणि संघाने मात्र सार्वत्रिक आदर असलेले हे गीत टाळले आहे, अशी टीका त्यांनी केली. काँग्रेस वंदेमातरमची अभिमानी ध्वजवाहक आहे. या गीतांचा काँग्रेसला अभिमान आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

‘वंदे मातरम्’ एकतेचे  प्रतीक : राष्ट्रपती मुर्मू 

‘वंदे मातरम्’ हे जनतेच्या भावनिक चेतनेचे आणि एकतेचे प्रतीक आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतमाता ‘सुजलाम्’, ‘सुफलाम्’ आणि ‘सुखदाम्’ ठेवण्याचा संकल्प करूया, असे त्यांनी म्हटले आहे.

देशाला एकसंध ठेवले : शाह

‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताने भारतीय स्वातंत्र्य चळवळीला दिशा दिली आणि स्वातंत्र्यानंतर देशाला एकसंध ठेवले, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Vande Mataramवंदे मातरमprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी