शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

'वंदे मातरम्'चे महत्त्वाचे कडवे १९३७ मध्ये वगळले अन् फाळणीची बीजे पेरली- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 13:20 IST

"फुटीरतावादी मानसिकता अजूनही देशासाठी आव्हान"

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताचे महत्त्वाचे कडवे १९३७ मध्ये वगळण्यात आले होते. त्यामुळे फाळणीची बीजे पेरली गेली आणि अशी फुटीर मानसिकता अजूनही देशासाठी एक आव्हान आहे, असे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी म्हटले आहे. वंदे मातरम् गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वर्षभराच्या स्मरणोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. त्यांनी येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये या प्रसंगी एक टपाल तिकीट आणि नाणे जारी केले.

वंदे मातरम् हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा आवाज बनले, ते प्रत्येक भारतीयाच्या भावना व्यक्त करत होते. दुर्दैवाने, १९३७ मध्ये वंदे मातरमचे महत्त्वाचे कडवे जे त्याच्या आत्म्याचा भाग होते, ते वगळण्यात आले. वंदे मातरमच्या विभाजनाने फाळणीची बीजेदेखील पेरली. राष्ट्र उभारणीच्या या ‘महामंत्रा’सोबत हा अन्याय का केला गेला, हे आजच्या पिढीला जाणून घेण्याची गरज आहे. ही फूट पाडणारी मानसिकता अजूनही देशासाठी एक आव्हान आहे, असे ते म्हणाले.

देशभरात विविध कार्यक्रम

वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, आसाम, तेलंगणा, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, सिक्कीम, गोवा, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, त्रिपुरा, ओडिशा, दिल्ली, राजस्थान आदी राज्यांत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

भाजप, संघानेच हे गीत टाळले : खरगे

देशाच्या सामूहिक आत्म्याला जागृत करणाऱ्या आणि भारताच्या स्वातंत्र्याचा आवाज बनलेल्या वंदेमातरमचा काँग्रेसला अभिमान आहे, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे. भाजप आणि संघाने मात्र सार्वत्रिक आदर असलेले हे गीत टाळले आहे, अशी टीका त्यांनी केली. काँग्रेस वंदेमातरमची अभिमानी ध्वजवाहक आहे. या गीतांचा काँग्रेसला अभिमान आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

‘वंदे मातरम्’ एकतेचे  प्रतीक : राष्ट्रपती मुर्मू 

‘वंदे मातरम्’ हे जनतेच्या भावनिक चेतनेचे आणि एकतेचे प्रतीक आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतमाता ‘सुजलाम्’, ‘सुफलाम्’ आणि ‘सुखदाम्’ ठेवण्याचा संकल्प करूया, असे त्यांनी म्हटले आहे.

देशाला एकसंध ठेवले : शाह

‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताने भारतीय स्वातंत्र्य चळवळीला दिशा दिली आणि स्वातंत्र्यानंतर देशाला एकसंध ठेवले, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Vande Mataramवंदे मातरमprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी