शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

दिल्लीकडे मोर्चा काढण्यावर ठाम राहणार की घरी परतणार?; केंद्र अन् शेतकऱ्यांमध्ये आज बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 10:18 IST

हरियाणातील ७ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंदी

नवी दिल्ली: आपल्या मागण्यांसाठी शेतकरी पुन्हा एकदा आंदोलन करत आहेत. दिल्लीकडे कूच करण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना पंजाब-हरियाणा सीमेवर थांबवण्यात आले आहे, जिथे शेतकरी तळ ठोकून आहेत. शेतकरी आणि सरकारमध्ये बैठकांच्या तीन फेऱ्या झाल्या. मात्र, या बैठकांमध्ये एकमत होऊ शकले नाही. यानंतर रविवारी पुन्हा एकदा शेतकरी आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये चर्चेची चौथी फेरी होणार आहे. अशा परिस्थितीत या बैठकीत तोडगा निघेल, अशी आशा आहे.

वास्तविक, यापूर्वी ८, १२ आणि १५ फेब्रुवारी रोजी शेतकरी नेते आणि सरकार यांच्यात बैठका झाल्या, मात्र त्यात यश आले नाही. कारण, शेतकऱ्यांनी पिकांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) देण्याच्या त्यांच्या मागणीवर ठाम राहिले. सरकारने शेतकऱ्यांच्या १० मागण्या मान्य केल्या आहेत. तीन मागण्यांवर हे प्रकरण अडकले आहे. म्हणजेच किमान आधारभूत किंमत (एमएसपी) हमी कायदा, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन यावर एकमत होऊ शकले नाही.

केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनीही रविवारी शेतकरी संघटनांसोबत होणाऱ्या बैठकीत काहीतरी तोडगा निघेल, अशी आशा व्यक्त केली आहे. यावर लवकरच तोडगा काढू, असे ते म्हणाले. अशा परिस्थितीत केंद्र सरकार शेतकऱ्यांना एमएसपीवर समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव देऊ शकते, अशीही चर्चा आहे. मात्र, याला मान्यता मिळणार की नाही आणि शेतकरी दिल्लीकडे मोर्चा काढण्यावर ठाम राहणार की घरी परतणार? या प्रश्नांची उत्तरे आता रविवारच्या बैठकीनंतरच मिळतील.

हरियाणातील ७ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंदी-

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे हरियाणातील सात जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवेवरील बंदी वाढवण्यात आली आहे. आता अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, हिस्सार, फतेहाबाद आणि सिरसा येथे १९ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२ पर्यंत इंटरनेट सेवा बंद राहणार आहे. याबाबत हरियाणा सरकारने पुन्हा एकदा परिपत्रक जारी केले आहे. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजल्यापासून या जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंदी लागू आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीPunjabपंजाबHaryanaहरयाणाCentral Governmentकेंद्र सरकार