शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

धर्मनिरपेक्ष नागरी संहिता लागू करणे ही काळाची गरज- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 05:10 IST

एकाच वेळी सर्व निवडणुका घेण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला भर

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी गुरुवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात, देशात धर्मनिरपेक्ष नागरी संहिता लागू करणे ही काळाची गरज असल्याचे आणि धर्माच्या आधारावर देशाची विभागणी करणाऱ्या कायद्यांना आधुनिक जगात कोणतेही स्थान नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन केले.

मोदी यांनी पंतप्रधानपदाच्या सलग तिसऱ्या कारकिर्दीतील पहिले आणि सलग ११ वे भाषण केले.  आपण ७५ वर्षे सध्याच्याच सांप्रदायिक नागरी संहितेसह जगलो आहोत. ही नागरी संहिता भेदभावाला खतपाणी घालण्याबरोबरच देशाची धार्मिक आधारावर विभागणी करते. विषमतेलाही प्रोत्साहन देते. आपल्याला धर्मनिरपेक्ष नागरी संहितेकडे वाटचाल करायची आहे. देशात धर्मनिरपेक्ष नागरी संहिता येणे ही काळाची गरज आहे, असे  मोदी यांनी नमूद केले. धर्मनिरपेक्ष नागरी संहिता ही संविधानाचा आत्मा आहे. सर्वोच्च न्यायालयानेही तिची गरज अधोरेखित केल्याचे मोदी म्हणाले. 

भ्रष्टाचाराची वाळवी

देशातील प्रत्येक नागरिक भ्रष्टाचाराच्या वाळवीने हैराण झाला आहे. भ्रष्टाचारामुळे जनतेचा सरकारवरील, प्रशासनावरील विश्वास उडतो आणि राष्ट्रीय विकासात बाधा निर्माण होते. काहीजण मात्र या वाळवीचे समर्थन करतात, तिचे उदात्तीकरण करून तिला संरक्षण देतात.

७५ हजार नव्या जागा

दरवर्षी २५ लाख भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जातात. त्यामुळे येत्या पाच वर्षांत वैद्यकीयच्या ७५ हजार नव्या जागा तयार करण्यात येतील. जागा वाढल्यानंतर भारतातच चांगले शिक्षण घेता येईल. 

पांढरा कुर्ता, चुडीदार आणि राजस्थानी पगडी

पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना संबोधित करताना पांढरा कुर्ता आणि चुडीदारसह बहुरंगी राजस्थानी लेहरिया प्रिंट पगडी परिधान केली होती. त्यांनी देशवासीयांना उद्देशून आजवरचे सर्वात मोठे म्हणजे ९८ मिनिटांचे भाषण केले.

पीडितेला जलद न्याय मिळवून द्या

कोलकाता येथे एका निवासी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या झाल्याबद्दल मोदींनी तीव्र संताप व्यक्त केला. अशा प्रकरणांमध्ये जलद न्याय मिळावा, यासाठी राज्य सरकारांनी अत्यंत तातडीने उपाय करावेत.

त्यांना होणाऱ्या शिक्षेला मोठी प्रसिद्धी दिली पाहिजे

आई, बहिणी आणि मुलींवर अत्याचाराचे पाप करणाऱ्यांना फाशी होऊ शकते हे माहीत व्हावे, म्हणून अशा आरोपींना ठोठावलेल्या शिक्षेला जास्तीतजास्त प्रसिद्धी दिली पाहिजे.

राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एक लाख तरुणांना राजकारणात आणणार

राजकारणाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसलेल्या देशातील एक लाख युवकांना लोक प्रतिनिधी म्हणून राजकारणात आणायचे आहे. जातीवाद आणि राजकारणातील घराणेशाहीचा अस्त करण्यात देशातील या तरुणांची मदत होईल. हे युवक कोणत्याही पक्षात सामील होऊ शकतात. त्यांच्या सहभागामुळे सळसळते रक्त राजकारणात येईल आणि लोकशाहीला एक नवा विचार पुढे घेऊन जाईल.

वन नेशन, वन इलेक्शन

विविध प्रकारच्या अनेक निवडणुका वारंवार घ्याव्या लागत असल्याने देशाच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात, एक देश एक निवडणुकीचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सर्व पक्षांनी पुढे येऊन सहकार्य करावे.- पंतप्रधान नरेंद्र माेदी

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी