शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
3
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
4
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
5
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरमध्ये तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
6
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
7
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
8
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
9
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
10
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
11
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
12
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
13
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
14
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
15
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
16
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
17
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
18
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
19
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
20
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   

“मी भगवान विष्णूचा कल्की अवतार, जर...”; माजी सरकारी कर्मचाऱ्याचा अजब दावा, जगाला दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 10:29 IST

Rameshchandra Fefar: रमेशचंद्र फेफर हे जल संधारण विभागाच्या सरदार सरोवर येथे अभियंता म्हणून कार्यरत होते.

ठळक मुद्दे८ महिन्यात केवळ १६ दिवस कार्यालयात आल्याप्रकरणी २०१८ मध्ये त्यांना विभागाकडून कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली होती.फेफर हे कार्यालयात येत नसतानाही पगाराची मागणी करत होते. मला फक्त पगार द्या कारण मी कल्की अवतार आहे. या धरतीवर पाऊस पाडण्याचं काम माझ्याकडे आहे

 अहमदाबाद – गुजरात सरकारमधील माजी कर्मचारी रमेशचंद्र फेफर यांनी स्वत:ला श्री विष्णूचा शेवटचा कल्कीचा अवतार असल्याचा अजब दावा केला आहे. ग्रॅच्युटी रक्कम लवकरात लवकर जारी करावी अन्यथा माझ्या दिव्य शक्तींचा वापर करून या वर्षी जगात गंभीर दुष्काळ पाडू असं त्यांनी म्हटलं आहे. फेफर यांनी दैवी अवतार असल्याचा दावा करत अनेक दिवस कार्यालयात अनुपस्थित राहिले त्यानंतर सरकारने त्यांना वेळेआधीच सेवानिवृत्ती दिली आहे.

जल संधारण विभागाचे सचिव यांना १ जुलै रोजी पत्र लिहून रमेशचंद्र फेफर यांनी म्हटलंय की, सरकारमध्ये बसलेले राक्षस माझी १६ रुपये ग्रॅच्युटी आणि एक वर्षाचे वेतन १६ लाख रुपये थांबवून मला त्रस्त करत आहेत. सरकारी अधिकाऱ्यांकडून माझा छळ सुरू आहे. माझा असाच छळ केला तर या धरतीवर भीषण दुष्काळ पडू शकतो. कारण मी भगवान विष्णूचा दहावा अवतार आहे असा दावा त्यांनी पत्रात केला आहे.

रमेशचंद्र फेफर हे जल संधारण विभागाच्या सरदार सरोवर येथे अभियंता म्हणून कार्यरत होते. ८ महिन्यात केवळ १६ दिवस कार्यालयात आल्याप्रकरणी २०१८ मध्ये त्यांना विभागाकडून कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली होती. जल संधारण विभागाचे सचिव एम. के जाधव म्हणाले की, फेफर हे कार्यालयात येत नसतानाही पगाराची मागणी करत होते. मला फक्त पगार द्या कारण मी कल्की अवतार आहे. या धरतीवर पाऊस पाडण्याचं काम माझ्याकडे आहे असा दावा फेफर वारंवार करत असल्याचं सचिवांनी सांगितले.

तसेच फेफर हे मुर्खपणा करत आहेत. मला त्यांचे पत्र मिळाले. त्यात त्यांनी ग्रॅच्युटी आणि १ वर्षाच्या पगाराची मागणी केली आहे. फेफर यांच्या ग्रॅच्युटीचं प्रकरण प्रक्रियेत आहे. मागील वेळी त्यांनी कल्की अवतार असल्याचा दावा केला होता तेव्हा त्यांच्याविरोधात तपास सुरू केला होता. रमेशचंद्र फेफर यांची मानसिक स्थिती पाहता सरकारने त्यांना वेळेआधीच सेवानिवृत्ती दिली आहे.

फेफर यांनी पत्रात असाही दावा केला आहे की, कल्की अवतारात मी या धरतीवर असल्याने मागील २ वर्षात भारतात चांगला पाऊस पडला. देशात दुष्काळ पडला नाही. मागील २० वर्षात चांगल्या पावसामुळे भारताला २० लाख कोटींचा फायदा झाला. तरीही सरकारमध्ये बसलेले राक्षस मला त्रास देत आहेत. याच कारणाने यंदा संपूर्ण जगात भीषण दुष्काळ पडेल. मी सतयुगातही पृथ्वीवर शासन केले होते असा दावा त्यांनी पत्रातून केला आहे.

टॅग्स :Gujaratगुजरात