शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

मला अशा पद्धतीने मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं- कुमारस्वामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 11:56 IST

मी संधिसाधू नाही असं म्हणत कुमारस्वामी यांनी त्यांच्यावर होणारा आरोप फेटाळून लावला आहे. 

बंगळुरू- 'कर्नाटकात जी परिस्थिती होती त्याबद्दल मला जराही आनंद नाही. मी जनतेला खूप वचनं दिली होती. स्पष्ट बहुमत मिळवून मी मुख्यमंत्री होईल अशी माझी इच्छा होती. पण जनतेचा माझ्यावर व पक्षावर तितका विश्वास नाही. लोक करत असलेल्या टीकेची मला जाणीव आहे. मी संधिसाधू आहे असं लोकांना वाटतं. पण माझी बाजू स्पष्ट करण्यासाठी मी मुख्यमंत्री होतो आहे, असं कुमारस्वामी यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.  मी संधिसाधू नाही असं म्हणत कुमारस्वामी यांनी त्यांच्यावर होणारा आरोप फेटाळून लावला आहे. 

मला अशा पद्धतीने मुख्यमंत्रिपद नको होतं. पण ते आता महत्वाचं नाही. सरकार स्थापन करुन ते चांगल्या प्रकारे चालवणं आत्ता महत्वाचं आहे. सिद्धरामय्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. निवडणुकीच्या आधी ते जे काही बोलले तो भूतकाळ आहे. मी भविष्याकडे पाहतो आहे, असं तुम्ही मुख्यमंत्री बनू शकणार नाही असा सिद्धरामय्या यांचा दावा होता ? या प्रश्नावर उत्तर देताना कुमारस्वामी यांनी म्हटलं. शपथविधीनंतर 24 तासात शेतकऱ्यांना कर्जमाफी द्याल का? या प्रश्नाचं उत्तर देताना कुमारस्वामी म्हणाले की, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी मी बांधिल आहे. पण भावनेच्या आधारे निर्णय घेऊ शकत नाही. आमचं सरकार युकीचं सरकार आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं. सरकारी तिजोरीवर खर्चाचा किती भार आहे याची पडताळणी करून आम्ही योग्य निर्णय घेऊ. काँग्रेस पक्षाने जनतेला जी वचनं दिली आहेत ती पूर्ण करायला मी बांधिल आहे, असं कुमारस्वामी यांनी म्हटलं. 

दरम्यान, कर्नाटकात येत्या बुधवारी काँग्रेस आणि जेडीएस आघाडीचं सरकार स्थापन होणार असून कुमारस्वामी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.  

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८kumarswamyकुमारस्वामी