शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, S-400 ने रॉकेट पाडले, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
3
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
4
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
5
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणींवर सामूहिक बलात्कार
6
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
7
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
8
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
9
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
10
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
11
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
12
Operation Sindoor Live Updates: जम्मूमध्ये रॉकेट हल्ला, सांबा क्षेत्रात भीषण गोळीबार
13
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
14
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
15
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
16
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
17
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
18
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
19
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
20
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या

मी शेतकरी विरोधी नाही -पंतप्रधान

By admin | Updated: March 5, 2015 23:47 IST

वादग्रस्त भू-संपादन विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जोरदार टीका केली़ सरकार शेतकरीविरोधी असल्याचा विरोधकांचा आरोप त्यांनी यावेळी खोडून काढला़

खंडवा (मप्ऱ) : वादग्रस्त भू-संपादन विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जोरदार टीका केली़ सरकार शेतकरीविरोधी असल्याचा विरोधकांचा आरोप त्यांनी यावेळी खोडून काढला़येथील श्रीसिंगाजी औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या प्रत्येकी ६०० मेगावॅटच्या दोन युनिटच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मोदी बोलत होते़ नवे भूसंपादन विधेयक आणले म्हणून मी शेतकरीविरोधी असल्याचा कांगावा विरोधक करीत आहेत़ पण मी शेतकरीविरोधी नाही़ मी स्वत: वा माझ्या सरकारने कधीही शेतकऱ्यांचा विरोध केलेला नाही़ आधीच्या संपुआ सरकारने पारित केलेल्या भूसंपादन कायद्यात शाळा, रुग्णालय, निवास, पाणी आणि सिंचन प्रकल्पासाठीची कुठलीही तरतूद केली गेलेली नव्हती़ आम्ही ही तरतूद आणू इच्छितो़ विरोधकांच्या अर्थपूर्ण सूचना वा सुधारणाही आम्ही स्वीकारायला तयार आहोत़ मात्र यावर विरोधक गप्प बसले आहेत, असे मोदी म्हणाले़आपल्या भाषणात मोदींनी अर्थसंकल्पाची प्रशंसा केली़ अर्थसंकल्पात सरकारने समाजातील सर्व वर्गांच्या कल्याणासाठी विविध तरतुदी केल्या आहेत़ गरीब, शेतकरी, दलित, आदिवासी सर्वांना न्याय देण्याचे प्रयत्न केले, असे ते म्हणाले़ देशाच्या विकासासाठी वीज उत्पादन आवश्यक असल्याचे सांगत मोदींनी वीज वाचवण्याचे आवाहन केले़ वीज वाचेल तर कोळसा वाचले आणि कोळसा वाचेल तर देशाचे भविष्य सुरक्षित राहील़आजही देशातील २० टक्के लोकांपर्यंत वीज पोहोचलेली नाही़ हजारो गावात अद्यापही विजेचे खांब उभे नाहीत़ खांब आहेत तिथे विजेच्या तारा पोहोचलेल्या नाही़ या सर्वांपर्यंत वीज पोहोचवण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले़रालोआ सरकार सत्तेवर येताच गत ९ ते १० महिन्यांच्या कार्यकाळात वीज उत्पादनात ११ टक्के वाढ झाली असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला़ (वृत्तसंस्था)