शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

मी शेतकरी विरोधी नाही -पंतप्रधान

By admin | Updated: March 5, 2015 23:47 IST

वादग्रस्त भू-संपादन विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जोरदार टीका केली़ सरकार शेतकरीविरोधी असल्याचा विरोधकांचा आरोप त्यांनी यावेळी खोडून काढला़

खंडवा (मप्ऱ) : वादग्रस्त भू-संपादन विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जोरदार टीका केली़ सरकार शेतकरीविरोधी असल्याचा विरोधकांचा आरोप त्यांनी यावेळी खोडून काढला़येथील श्रीसिंगाजी औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या प्रत्येकी ६०० मेगावॅटच्या दोन युनिटच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मोदी बोलत होते़ नवे भूसंपादन विधेयक आणले म्हणून मी शेतकरीविरोधी असल्याचा कांगावा विरोधक करीत आहेत़ पण मी शेतकरीविरोधी नाही़ मी स्वत: वा माझ्या सरकारने कधीही शेतकऱ्यांचा विरोध केलेला नाही़ आधीच्या संपुआ सरकारने पारित केलेल्या भूसंपादन कायद्यात शाळा, रुग्णालय, निवास, पाणी आणि सिंचन प्रकल्पासाठीची कुठलीही तरतूद केली गेलेली नव्हती़ आम्ही ही तरतूद आणू इच्छितो़ विरोधकांच्या अर्थपूर्ण सूचना वा सुधारणाही आम्ही स्वीकारायला तयार आहोत़ मात्र यावर विरोधक गप्प बसले आहेत, असे मोदी म्हणाले़आपल्या भाषणात मोदींनी अर्थसंकल्पाची प्रशंसा केली़ अर्थसंकल्पात सरकारने समाजातील सर्व वर्गांच्या कल्याणासाठी विविध तरतुदी केल्या आहेत़ गरीब, शेतकरी, दलित, आदिवासी सर्वांना न्याय देण्याचे प्रयत्न केले, असे ते म्हणाले़ देशाच्या विकासासाठी वीज उत्पादन आवश्यक असल्याचे सांगत मोदींनी वीज वाचवण्याचे आवाहन केले़ वीज वाचेल तर कोळसा वाचले आणि कोळसा वाचेल तर देशाचे भविष्य सुरक्षित राहील़आजही देशातील २० टक्के लोकांपर्यंत वीज पोहोचलेली नाही़ हजारो गावात अद्यापही विजेचे खांब उभे नाहीत़ खांब आहेत तिथे विजेच्या तारा पोहोचलेल्या नाही़ या सर्वांपर्यंत वीज पोहोचवण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले़रालोआ सरकार सत्तेवर येताच गत ९ ते १० महिन्यांच्या कार्यकाळात वीज उत्पादनात ११ टक्के वाढ झाली असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला़ (वृत्तसंस्था)