शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीररित्या राहणा-या रोहिंग्यांना परत पाठवणे आवश्यकच - गृहराज्यमंत्री रिजिजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 03:29 IST

भारतात बेकायदेशीररित्या घुसलेल्या रोहिंग्यांना परत पाठवणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्दे भारतात बेकायदेशीररित्या घुसलेल्या रोहिंग्यांना परत पाठवणे अत्यंत आवश्यक सर्वोच्च न्यायालयाने कालच केंद्र सरकारकडे तुम्ही रोहिंग्याना परत पाठवण्याचा का विचार करत आहात असा प्रश्न विचारला होता, त्यानंतर दुसर्याच दिवशी रिजिजू यांनी हे वक्तव्य केले आहे.

मुंबई, दि. 6 - भारतात बेकायदेशीररित्या घुसलेल्या रोहिंग्यांना परत पाठवणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केले आहे. संसदेच्या मान्सून अधिवेशनात म्यानमारमधून भारतात घुसलेल्या रोहिंग्यांची आकडेवारी रिजिजू यांनी जाहीर केली होती, तसेच जम्मू आणि काश्मीर राज्यात सर्वाधीक रोहिंग्या राहात असल्याचे सांगितले होते.

बेकायदेशीर स्थलांतरितांना पुन्हा मायदेशी पाठवण्याचे आदेश राज्य सरकारांना देत आहोत असेही रिजिजू यांनी संसदेत सांगितले होते. त्यांच्या या वक्त्वचा मानवाधिकार संघटनांनी निषेध केला होता. हैदराबादेत राहणार्या रोहिंग्यांनी तर आम्हाला ठार मारा पण परत पाठवू नका अशी विनंती सरकारकडे केली होती. जर आम्ही परत म्यानमारला गेलो तर आमचे तुकडे केले जातील अशीही भीती त्यांनी व्यक्त केली होती. 

सर्वोच्च न्यायालयाने कालच केंद्र सरकारकडे तुम्ही रोहिंग्याना परत पाठवण्याचा का विचार करत आहात असा प्रश्न विचारला होता, त्यानंतर दुसर्याच दिवशी रिजिजू यांनी हे वक्तव्य केले आहे. कायदेशीर बाबीमध्ये मला आता पडायचे नाही मात्र रोहिंग्या हे भारतात बेकायदेशीररित्या राहात आहेत, त्यांना परत पाठवणे आवश्यक आहे.भारताने शक्य तितक्या स्थलांतरितांना सामावून घेतले आहे, आता बेकायदेशीर स्थलांतरितांना सामावून घेणे अशक्य आहे असे रिजिजू म्हणाले आहेत. म्यानमारमध्ये वांशिक तणाव उफाळला असतानाच आणि रोहिंग्यांसह हिंदू जीव मुठीत धरुन बांगलादेशच्या दिशेने पळत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा म्यानमार दौरा सुरु आहे. त्यामुळे ते या मुद्द्यावर चर्चा करतील अशी अपेक्षा आहे. लोकशाहीवादी नेत्या आणि म्यानमारच्या स्टेट कौन्सीलर आंग सान सू ची या सत्तेत आल्यावर अल्पसंख्यांकांचे रक्षण करतील अशी अपेक्षा होती, मात्र तसे झालेले नाही. बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांच्यासह जगातील अनेक नेत्यांनी म्यानमारमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्वरित पावले उचला अशी विनंती त्यांना केली आहे तर जगातील अनेक नेत्यांनी व संघटनांनी सू ची यांच्यावर टीकाही केली आहे.