शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
3
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
4
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
5
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
6
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
7
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
8
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
9
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
10
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
11
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
12
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
13
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
14
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
15
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
16
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
17
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
18
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
19
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
20
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...

बेकायदेशीररित्या राहणा-या रोहिंग्यांना परत पाठवणे आवश्यकच - गृहराज्यमंत्री रिजिजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 03:29 IST

भारतात बेकायदेशीररित्या घुसलेल्या रोहिंग्यांना परत पाठवणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्दे भारतात बेकायदेशीररित्या घुसलेल्या रोहिंग्यांना परत पाठवणे अत्यंत आवश्यक सर्वोच्च न्यायालयाने कालच केंद्र सरकारकडे तुम्ही रोहिंग्याना परत पाठवण्याचा का विचार करत आहात असा प्रश्न विचारला होता, त्यानंतर दुसर्याच दिवशी रिजिजू यांनी हे वक्तव्य केले आहे.

मुंबई, दि. 6 - भारतात बेकायदेशीररित्या घुसलेल्या रोहिंग्यांना परत पाठवणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केले आहे. संसदेच्या मान्सून अधिवेशनात म्यानमारमधून भारतात घुसलेल्या रोहिंग्यांची आकडेवारी रिजिजू यांनी जाहीर केली होती, तसेच जम्मू आणि काश्मीर राज्यात सर्वाधीक रोहिंग्या राहात असल्याचे सांगितले होते.

बेकायदेशीर स्थलांतरितांना पुन्हा मायदेशी पाठवण्याचे आदेश राज्य सरकारांना देत आहोत असेही रिजिजू यांनी संसदेत सांगितले होते. त्यांच्या या वक्त्वचा मानवाधिकार संघटनांनी निषेध केला होता. हैदराबादेत राहणार्या रोहिंग्यांनी तर आम्हाला ठार मारा पण परत पाठवू नका अशी विनंती सरकारकडे केली होती. जर आम्ही परत म्यानमारला गेलो तर आमचे तुकडे केले जातील अशीही भीती त्यांनी व्यक्त केली होती. 

सर्वोच्च न्यायालयाने कालच केंद्र सरकारकडे तुम्ही रोहिंग्याना परत पाठवण्याचा का विचार करत आहात असा प्रश्न विचारला होता, त्यानंतर दुसर्याच दिवशी रिजिजू यांनी हे वक्तव्य केले आहे. कायदेशीर बाबीमध्ये मला आता पडायचे नाही मात्र रोहिंग्या हे भारतात बेकायदेशीररित्या राहात आहेत, त्यांना परत पाठवणे आवश्यक आहे.भारताने शक्य तितक्या स्थलांतरितांना सामावून घेतले आहे, आता बेकायदेशीर स्थलांतरितांना सामावून घेणे अशक्य आहे असे रिजिजू म्हणाले आहेत. म्यानमारमध्ये वांशिक तणाव उफाळला असतानाच आणि रोहिंग्यांसह हिंदू जीव मुठीत धरुन बांगलादेशच्या दिशेने पळत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा म्यानमार दौरा सुरु आहे. त्यामुळे ते या मुद्द्यावर चर्चा करतील अशी अपेक्षा आहे. लोकशाहीवादी नेत्या आणि म्यानमारच्या स्टेट कौन्सीलर आंग सान सू ची या सत्तेत आल्यावर अल्पसंख्यांकांचे रक्षण करतील अशी अपेक्षा होती, मात्र तसे झालेले नाही. बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांच्यासह जगातील अनेक नेत्यांनी म्यानमारमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्वरित पावले उचला अशी विनंती त्यांना केली आहे तर जगातील अनेक नेत्यांनी व संघटनांनी सू ची यांच्यावर टीकाही केली आहे.