शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीररित्या राहणा-या रोहिंग्यांना परत पाठवणे आवश्यकच - गृहराज्यमंत्री रिजिजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 03:29 IST

भारतात बेकायदेशीररित्या घुसलेल्या रोहिंग्यांना परत पाठवणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्दे भारतात बेकायदेशीररित्या घुसलेल्या रोहिंग्यांना परत पाठवणे अत्यंत आवश्यक सर्वोच्च न्यायालयाने कालच केंद्र सरकारकडे तुम्ही रोहिंग्याना परत पाठवण्याचा का विचार करत आहात असा प्रश्न विचारला होता, त्यानंतर दुसर्याच दिवशी रिजिजू यांनी हे वक्तव्य केले आहे.

मुंबई, दि. 6 - भारतात बेकायदेशीररित्या घुसलेल्या रोहिंग्यांना परत पाठवणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केले आहे. संसदेच्या मान्सून अधिवेशनात म्यानमारमधून भारतात घुसलेल्या रोहिंग्यांची आकडेवारी रिजिजू यांनी जाहीर केली होती, तसेच जम्मू आणि काश्मीर राज्यात सर्वाधीक रोहिंग्या राहात असल्याचे सांगितले होते.

बेकायदेशीर स्थलांतरितांना पुन्हा मायदेशी पाठवण्याचे आदेश राज्य सरकारांना देत आहोत असेही रिजिजू यांनी संसदेत सांगितले होते. त्यांच्या या वक्त्वचा मानवाधिकार संघटनांनी निषेध केला होता. हैदराबादेत राहणार्या रोहिंग्यांनी तर आम्हाला ठार मारा पण परत पाठवू नका अशी विनंती सरकारकडे केली होती. जर आम्ही परत म्यानमारला गेलो तर आमचे तुकडे केले जातील अशीही भीती त्यांनी व्यक्त केली होती. 

सर्वोच्च न्यायालयाने कालच केंद्र सरकारकडे तुम्ही रोहिंग्याना परत पाठवण्याचा का विचार करत आहात असा प्रश्न विचारला होता, त्यानंतर दुसर्याच दिवशी रिजिजू यांनी हे वक्तव्य केले आहे. कायदेशीर बाबीमध्ये मला आता पडायचे नाही मात्र रोहिंग्या हे भारतात बेकायदेशीररित्या राहात आहेत, त्यांना परत पाठवणे आवश्यक आहे.भारताने शक्य तितक्या स्थलांतरितांना सामावून घेतले आहे, आता बेकायदेशीर स्थलांतरितांना सामावून घेणे अशक्य आहे असे रिजिजू म्हणाले आहेत. म्यानमारमध्ये वांशिक तणाव उफाळला असतानाच आणि रोहिंग्यांसह हिंदू जीव मुठीत धरुन बांगलादेशच्या दिशेने पळत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा म्यानमार दौरा सुरु आहे. त्यामुळे ते या मुद्द्यावर चर्चा करतील अशी अपेक्षा आहे. लोकशाहीवादी नेत्या आणि म्यानमारच्या स्टेट कौन्सीलर आंग सान सू ची या सत्तेत आल्यावर अल्पसंख्यांकांचे रक्षण करतील अशी अपेक्षा होती, मात्र तसे झालेले नाही. बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांच्यासह जगातील अनेक नेत्यांनी म्यानमारमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्वरित पावले उचला अशी विनंती त्यांना केली आहे तर जगातील अनेक नेत्यांनी व संघटनांनी सू ची यांच्यावर टीकाही केली आहे.