शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

"बेकायदेशीर स्थलांतरित हे भारताच्या सुरक्षेसाठी धोका", उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 08:14 IST

Jagdeep Dhankhar : बेकायदेशीर स्थलांतरित हे भारताच्या सुरक्षेसाठी धोका असल्याचे जगदीप धनखड यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

नवी दिल्ली : भारत,अमेरिका यासह जगातील अनेक देशांमध्ये सध्या बेकायदेशीर स्थलांतरित हा चर्चेचा विषय ठरला आहे. अमेरिकेत सध्या बेकायदेशीर स्थलांतरितांना पकडून त्यांच्या देशात परत पाठवले जात आहे. तर दुसरीकडे भारतातही हा मुद्दा सध्या चर्चेत असून दिल्लीसह अनेक राज्यातील बेकायदेशीर स्थलांतरिताविरोधात आंदोलन केले जात आहे. अशातच आता भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी एक मोठे विधान केले आहे. 

बेकायदेशीर स्थलांतरित हे भारताच्या सुरक्षेसाठी धोका असल्याचे जगदीप धनखड यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. सोमवारी (दि.२७) जगदीप धनखड यांनी राज्यसभा इंटर्नशिप कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका समूहाला संबोधित केले. यावेळी, बेकायदेशीर स्थलांतरित हे भारताच्या लोकशाहीसाठी धोका आहेत. कारण हे बेकायदेशीर स्थलांतरित आपल्या निवडणूक व्यवस्थेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असे जगदीप धनखड म्हणाले. 

भारत सरकारला बेकायदेशीर स्थलांतरितांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे. पुढे जगदीप धनखड म्हणाले, बेकायदेशीर स्थलांतरित हे आपल्या सामाजिक सौहार्द आणि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी धोक्याचे आहे. आपल्याला आव्हानांकडे पाहावे लागणार आहे. देशासमोरील आव्हान म्हणजे लाखो बेकायदेशीर स्थलांतरित आपल्या भूमीवर राहत आहेत. हे आपल्या सार्वभौमत्वाला आव्हान नाही का? असे लोक आपल्या राष्ट्रवादाशी कधीही जोडले जाऊ शकत नाहीत, असेही जगदीप धनखड यांनी सांगितले.

याचबरोबर, आपल्या देशात लाखो बेकायदेशीर स्थलांतरित राहत आहेत. एखादा देश लाखो बेकायदेशीर स्थलांतरितांना कसे सहन करू शकतो? असा सवाल करत जगदीप धनखड म्हणाले की, बेकायदेशीर स्थलांतरित आपल्या आरोग्य, शिक्षण आणि इतर सुविधांच्या संसाधनांचा वापर करत आहेत. ते अशा नोकऱ्या करत आहेत, ज्या आपल्या लोकांसाठी आहेत. त्यामुळे मला आशा आहे की, सरकारमधील प्रत्येकजण या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करेल. ही समस्या आणि तिचे निराकरण एक दिवसही पुढे ढकलता येणार नाही, असेही जगदीप धनखड म्हणाले.

टॅग्स :jagdeep dhankharजगदीप धनखडIndiaभारत