शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

"बेकायदेशीर स्थलांतरित हे भारताच्या सुरक्षेसाठी धोका", उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 08:14 IST

Jagdeep Dhankhar : बेकायदेशीर स्थलांतरित हे भारताच्या सुरक्षेसाठी धोका असल्याचे जगदीप धनखड यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

नवी दिल्ली : भारत,अमेरिका यासह जगातील अनेक देशांमध्ये सध्या बेकायदेशीर स्थलांतरित हा चर्चेचा विषय ठरला आहे. अमेरिकेत सध्या बेकायदेशीर स्थलांतरितांना पकडून त्यांच्या देशात परत पाठवले जात आहे. तर दुसरीकडे भारतातही हा मुद्दा सध्या चर्चेत असून दिल्लीसह अनेक राज्यातील बेकायदेशीर स्थलांतरिताविरोधात आंदोलन केले जात आहे. अशातच आता भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी एक मोठे विधान केले आहे. 

बेकायदेशीर स्थलांतरित हे भारताच्या सुरक्षेसाठी धोका असल्याचे जगदीप धनखड यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. सोमवारी (दि.२७) जगदीप धनखड यांनी राज्यसभा इंटर्नशिप कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका समूहाला संबोधित केले. यावेळी, बेकायदेशीर स्थलांतरित हे भारताच्या लोकशाहीसाठी धोका आहेत. कारण हे बेकायदेशीर स्थलांतरित आपल्या निवडणूक व्यवस्थेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असे जगदीप धनखड म्हणाले. 

भारत सरकारला बेकायदेशीर स्थलांतरितांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे. पुढे जगदीप धनखड म्हणाले, बेकायदेशीर स्थलांतरित हे आपल्या सामाजिक सौहार्द आणि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी धोक्याचे आहे. आपल्याला आव्हानांकडे पाहावे लागणार आहे. देशासमोरील आव्हान म्हणजे लाखो बेकायदेशीर स्थलांतरित आपल्या भूमीवर राहत आहेत. हे आपल्या सार्वभौमत्वाला आव्हान नाही का? असे लोक आपल्या राष्ट्रवादाशी कधीही जोडले जाऊ शकत नाहीत, असेही जगदीप धनखड यांनी सांगितले.

याचबरोबर, आपल्या देशात लाखो बेकायदेशीर स्थलांतरित राहत आहेत. एखादा देश लाखो बेकायदेशीर स्थलांतरितांना कसे सहन करू शकतो? असा सवाल करत जगदीप धनखड म्हणाले की, बेकायदेशीर स्थलांतरित आपल्या आरोग्य, शिक्षण आणि इतर सुविधांच्या संसाधनांचा वापर करत आहेत. ते अशा नोकऱ्या करत आहेत, ज्या आपल्या लोकांसाठी आहेत. त्यामुळे मला आशा आहे की, सरकारमधील प्रत्येकजण या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करेल. ही समस्या आणि तिचे निराकरण एक दिवसही पुढे ढकलता येणार नाही, असेही जगदीप धनखड म्हणाले.

टॅग्स :jagdeep dhankharजगदीप धनखडIndiaभारत