शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

"बेकायदेशीर स्थलांतरित हे भारताच्या सुरक्षेसाठी धोका", उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 08:14 IST

Jagdeep Dhankhar : बेकायदेशीर स्थलांतरित हे भारताच्या सुरक्षेसाठी धोका असल्याचे जगदीप धनखड यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

नवी दिल्ली : भारत,अमेरिका यासह जगातील अनेक देशांमध्ये सध्या बेकायदेशीर स्थलांतरित हा चर्चेचा विषय ठरला आहे. अमेरिकेत सध्या बेकायदेशीर स्थलांतरितांना पकडून त्यांच्या देशात परत पाठवले जात आहे. तर दुसरीकडे भारतातही हा मुद्दा सध्या चर्चेत असून दिल्लीसह अनेक राज्यातील बेकायदेशीर स्थलांतरिताविरोधात आंदोलन केले जात आहे. अशातच आता भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी एक मोठे विधान केले आहे. 

बेकायदेशीर स्थलांतरित हे भारताच्या सुरक्षेसाठी धोका असल्याचे जगदीप धनखड यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. सोमवारी (दि.२७) जगदीप धनखड यांनी राज्यसभा इंटर्नशिप कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका समूहाला संबोधित केले. यावेळी, बेकायदेशीर स्थलांतरित हे भारताच्या लोकशाहीसाठी धोका आहेत. कारण हे बेकायदेशीर स्थलांतरित आपल्या निवडणूक व्यवस्थेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असे जगदीप धनखड म्हणाले. 

भारत सरकारला बेकायदेशीर स्थलांतरितांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे. पुढे जगदीप धनखड म्हणाले, बेकायदेशीर स्थलांतरित हे आपल्या सामाजिक सौहार्द आणि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी धोक्याचे आहे. आपल्याला आव्हानांकडे पाहावे लागणार आहे. देशासमोरील आव्हान म्हणजे लाखो बेकायदेशीर स्थलांतरित आपल्या भूमीवर राहत आहेत. हे आपल्या सार्वभौमत्वाला आव्हान नाही का? असे लोक आपल्या राष्ट्रवादाशी कधीही जोडले जाऊ शकत नाहीत, असेही जगदीप धनखड यांनी सांगितले.

याचबरोबर, आपल्या देशात लाखो बेकायदेशीर स्थलांतरित राहत आहेत. एखादा देश लाखो बेकायदेशीर स्थलांतरितांना कसे सहन करू शकतो? असा सवाल करत जगदीप धनखड म्हणाले की, बेकायदेशीर स्थलांतरित आपल्या आरोग्य, शिक्षण आणि इतर सुविधांच्या संसाधनांचा वापर करत आहेत. ते अशा नोकऱ्या करत आहेत, ज्या आपल्या लोकांसाठी आहेत. त्यामुळे मला आशा आहे की, सरकारमधील प्रत्येकजण या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करेल. ही समस्या आणि तिचे निराकरण एक दिवसही पुढे ढकलता येणार नाही, असेही जगदीप धनखड म्हणाले.

टॅग्स :jagdeep dhankharजगदीप धनखडIndiaभारत