शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खाण कोसळून ७० जण अडकले? अवैध उत्खननातून घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 08:44 IST

या भागात प्रदीर्घ काळापासून अवैध उत्खनन सुरू आहे. येथे दररोज १५० टन कोळशाचे उत्खनन होते, असे सांगितले जाते.

एस. पी. सिन्हा -

धनबाद : झारखंडच्या धनबाद जिल्ह्यात चिरकुंडा भागामध्ये गुरुवारी सकाळी कोळशाच्या अवैध उत्खननामुळे खाण कोसळून ७० जण दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे सर्वजण बंगालचे रहिवासी असल्याचे समजते. परिसरात सुरू असलेल्या अवैध उत्खननामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. तात्पुरत्या स्वरूपात बंद झालेल्या खनन क्षेत्रात ही दुर्घटना घडली, असे सांगितले जाते. गुरुवारी सकाळी ८.३० वाजता जुमरीजोडजवळ रस्ता खचला. त्यानंतर खाण खचली. त्यात उत्खनन करणारे लोक अडकले. ५० मीटर क्षेत्रात हा प्रकार घडला. जुमरीजोड-चांच लाईनवर अचानक रेल्वे लाईनचा रस्ता मोठा आवाज होऊन धसला. याचबरोबर विजेचा खांबही जमिनीत गेला. या घटनेनंतर लोक घाबरले व त्यांनी याची माहिती पोलीस व बीसीसीएल व्यवस्थापनाला दिली. 

दररोज १५० टन कोळशाचे उत्खनन : या भागात प्रदीर्घ काळापासून अवैध उत्खनन सुरू आहे. येथे दररोज १५० टन कोळशाचे उत्खनन होते, असे सांगितले जाते. तरीही याकडे कोणी लक्ष देत नाही. यापूर्वीही या भागात अवैध खाण कोसळून अनेकांनी प्राण गमावले आहेत. एक महिन्यापूर्वीच दहीबाडी व सी पॅचमध्ये अवैध उत्खनन सुरू असताना जमीन खचल्यामुळे अनेकांचे प्राण गेले होते. जिल्हा प्रशासनाने ५ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. 

टॅग्स :Jharkhandझारखंड