शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

...तर अर्थव्यवस्थेला मोठा धक्का; मोदी सरकारला भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 19:12 IST

आयएलअँडएफएस कंपनीला वाचवण्यासाठी सरकारचे प्रयत्न

नवी दिल्ली: इन्फ्रस्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसच्या (आयएलअँडएफएस) रुपात आम्ही केवळ एका कंपनीला नव्हे, तर आर्थिक संकटाच्या समुद्रात सापडलेल्या टायटॅनिकला वाचवत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. आयएलअँडएफएस कंपनी बुडाल्यास अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो, अशी माहिती केंद्र सरकारनं न्यायालयाला दिली. आयएलअँडएफएसला वाचवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचंदेखील सरकारनं न्यायालयाला सांगितलं. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलमध्ये दाखल केलेल्या 36 पानी याचिकेत केंद्र सरकारनं आयएलअँडएफएस कंपनीचा उल्लेख टायटॅनिक जहाज असा केला आहे. कंपनीच्या संचालकांना व्यवस्थापन सांभाळण्यात अपयश आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. 'आयएलअँडएफएस कंपनीला वाचवणं अतिशय गरजेचं आहे. कारण कंपनीवर 910 अब्ज रुपयांचं कर्ज आहे. यातील दोन तृतीयांश कर्ज सरकारी बँकांचं आहे,' असं सरकारनं याचिकेत म्हटलं आहे. आयएलअँडएफएस कंपनीच्या उपकंपन्यादेखील कर्जाची परतफेड करण्यात अपयशी ठरल्यास देशाच्या आर्थिक स्थिरतेवर गंभीर परिणाम होतील, असं सरकारनं याचिकेत नमूद केलं आहे. 'आयएलअँडएफएसच्या भांडवल गोळा करण्याच्या आणि पायाभूत प्रकल्प पूर्ण करण्याच्या क्षमतेवर परिणाम झाल्यास त्याचा मोठा फटका पायभूत क्षेत्रासह शेअर बाजार आणि अर्थव्यवस्थेला बसेल. त्यामुळे मोठं नुकसान होईल,' अशी भीती केंद्र सरकारनं याचिकेतून व्यक्त केली आहे. ‘आयएलअँडएफएस’ ही कंपनी रस्ते, बोगदे, जल प्रक्रिया प्रकल्प आणि वीज प्रकल्पांना गेल्या ३0 वर्षांपासून अर्थसाह्य करते. कर्ज फेडण्यासाठी यापैकी कोणतीही मालमत्ता कंपनी विकू शकत नाही. कंपनीचे ऊर्जा प्रकल्प इंधन आणि खरेदी कराराअभावी अडकले आहेत. रस्ते प्रकल्प पर्यावरण मंजुऱ्यांतून कसेबसे बाहेर काढले गेले, परंतु टोल वसुली पुरेशी नसल्यामुळे नवं संकट निर्माण झालं आहे. महामार्ग प्राधिकरणासोबतच्या वादामुळे काही प्रकल्प रखडले आहेत.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकारshare marketशेअर बाजार