गौण खनिजच्या घोटाळ्याकडे दुर्लक्ष
By admin | Updated: February 15, 2016 00:37 IST
सोलापूर:
गौण खनिजच्या घोटाळ्याकडे दुर्लक्ष
सोलापूर: जिल्ातील प्रत्येक ग्रामपंचायतींना मिळालेल्या गौण खनिजच्या निधीतील घोटाळ्याबाबत संथगतीने कारवाई सुरू असल्यामुळे दोषी अधिकारी आणि कर्मचारी बिनधास्त आहेत़ त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़ गौण खनिज निधी घोटाळा, समाजकल्याण घोटाळा, मालमत्ता आदी विषयांवर कायमस्वरुपी तोडगा निघाला नाही, त्यामुळे हे विषय प्रत्येक सभेत येतात़जिल्ातील ८२१ ग्रामपंचायतींना गौणखनिज अंतर्गत शासनाकडून ७६ कोटी २६ लाखांचे अनुदान मिळाले होते; मात्र हे अनुदान मनमानीपणे खर्च केले आहे़ जि़ प़ सदस्य संजय पाटील यांनी यावर आवाज उठविल्यावर चौकशी समिती स्थापन करण्यात आली़ २७ समित्यांनी ३१५ ग्रामपंचायती तपासल्या असून, यामध्ये २३९ ग्रामपंचायती दोषी आढळल्या आहेत़ हे अनुदान जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तहसीलदारांमार्फत गटविकास अधिकार्यांकडे आणि त्यांच्याकडून थेट त्या त्या ग्रामपंचायतींना देण्यात आले होते़ ११ तालुक्यांतील ३३५ ग्रामपंचायतींची त्रिस्तरीय समितीकडून तपासणी करण्यात आली़ यामध्ये ५ ते ५० लाख रुपये मिळालेल्या ग्रामपंचायतींची तपासणी करण्यासाठी विस्तार अधिकारी (पंचायत) यांच्या अध्यक्षतेखाली शाखा अभियंता व उपलेखापाल यांच्या समितीने तपासणी केली़ अशा एकूण २७ त्रिस्तरीय समित्या जिल्ात नेमण्यात आल्या होत्या़ या २७ समित्यांनी ३१५ ग्रामपंचायती तपासल्या़ यामध्ये ५० लाखांपेक्षा जास्त गौणखनिजाचा निधी प्राप्त झालेल्या एकूण २० ग्रामपंचायती सहायक गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, उपअभियंता व उपलेखापाल यांच्या त्रिस्तरीय समितीमार्फत तपासणी करण्यात आली़ या घोटाळ्याची तातडीने चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी अन्यथा पुन्हा भ्रष्ट अधिकार्यांना पाठीशी घातल्याचे काम होईल, असे मत संजय पाटील यांनी व्यक्त केले़ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले होते, मात्र किरकोळ नोटिसा वगळता काहीही कारवाई झाली नसल्याचे दिसून येते़ त्यामुळे या प्रकरणी तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे़