शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

'बालाकोटचे श्रेय घेता, तर पुलवामाची जबाबदारी घ्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 07:56 IST

तेलगू देसम : जवानांना बुलेटप्रूफ बसेस का दिल्या नाहीत?

विशाखापट्टणम : केंद्रातील मोदी सरकार बालाकोट एअरस्ट्राईकचे श्रेय घेण्यास तात्काळ पुढे येत असेल, तर या सरकारने जम्मू-काश्मीरमधील पुलवामामधील अतिरेकी हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे, असे तेलगू देसम पार्टीने (टीडीपी) म्हटले आहे.टीडीपीचे राष्ट्रीय प्रवक्ते दिनकर लंका यांनी म्हटले आहे की, सीआरपीएफच्या वाहनांना बुलेटप्रूफ कवच देण्यात मोदी सरकार अयशस्वी झाले आहे. त्यामुळेच १४ फेब्रुवारी रोजी झालेला हल्ला आपण रोखू शकलो नाही व ४० जवान शहीद झाले.

या हल्ल्याला सरकारचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी ७ सप्टेंबर २०१७ रोजी सीआरपीएफच्या बुलेटप्रूफ बसचे उद्घाटन केले. अशा प्रकारची २०० वाहने संरक्षण मंत्रालयाकडे असताना ती वाहने अद्याप जवानांना का दिली गेली नाहीत? या बसेस कुठे आहेत, असा सवालही त्यांनी केला. या सरकारला बालाकोट एअरस्ट्राईकचे श्रेय घ्यायचे असेल, तर जवानांना सुरक्षा पुरवण्यात कमी पडल्याची जबाबदारीही घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. यंदा निवडणुकीच्या मैदानात एकट्याने उतरणे टीडीपीला महागात पडेल का, या प्रश्नाच्या उत्तरात दिनकर लंका म्हणाले की, उलट याचा आम्हाला फायदा होईल. २००४ मध्ये भाजप बरोबर असल्याने आम्हाला अल्पसंख्यकांची मते गमवावी लागली होती. मात्र यंदा स्वतंत्र लढत असल्याने आमच्या मतात निश्चितच वाढ होईल, असेही ते म्हणाले.किंगमेकरच्या भूमिकेसाठी तयारीतेलगू देसम पार्टीला आंध्र प्रदेशातील लोकसभेच्या २५ पैकी २० जागा मिळतील व आम्ही केंद्रात महत्त्वाची भूमिका बजावू, असा दावाही लंका यांनी केला. टीडीपीने २०१४च्या लोकसभा निवडणुकीत १५ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी या पक्षाबरोबर भाजप व अभिनय क्षेत्रातून राजकारणात उतरलेले पवन कल्याण हेही होते. केंद्रात किंगमेकरची भूमिका बजावण्याच्या तयारीत असलेले टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू विरोधी पक्षांना एकत्रित करीत असून, संपूर्ण देशाचा दौरा करीत आहेत.

टॅग्स :Telugu Desam Partyतेलगू देसम पार्टीChandrababu Naiduचंद्राबाबू नायडू