शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
5
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
6
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
7
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
8
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
9
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
10
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
11
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
12
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
13
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
14
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
15
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
16
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
17
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
18
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
19
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
20
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा

'बालाकोटचे श्रेय घेता, तर पुलवामाची जबाबदारी घ्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 07:56 IST

तेलगू देसम : जवानांना बुलेटप्रूफ बसेस का दिल्या नाहीत?

विशाखापट्टणम : केंद्रातील मोदी सरकार बालाकोट एअरस्ट्राईकचे श्रेय घेण्यास तात्काळ पुढे येत असेल, तर या सरकारने जम्मू-काश्मीरमधील पुलवामामधील अतिरेकी हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे, असे तेलगू देसम पार्टीने (टीडीपी) म्हटले आहे.टीडीपीचे राष्ट्रीय प्रवक्ते दिनकर लंका यांनी म्हटले आहे की, सीआरपीएफच्या वाहनांना बुलेटप्रूफ कवच देण्यात मोदी सरकार अयशस्वी झाले आहे. त्यामुळेच १४ फेब्रुवारी रोजी झालेला हल्ला आपण रोखू शकलो नाही व ४० जवान शहीद झाले.

या हल्ल्याला सरकारचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी ७ सप्टेंबर २०१७ रोजी सीआरपीएफच्या बुलेटप्रूफ बसचे उद्घाटन केले. अशा प्रकारची २०० वाहने संरक्षण मंत्रालयाकडे असताना ती वाहने अद्याप जवानांना का दिली गेली नाहीत? या बसेस कुठे आहेत, असा सवालही त्यांनी केला. या सरकारला बालाकोट एअरस्ट्राईकचे श्रेय घ्यायचे असेल, तर जवानांना सुरक्षा पुरवण्यात कमी पडल्याची जबाबदारीही घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. यंदा निवडणुकीच्या मैदानात एकट्याने उतरणे टीडीपीला महागात पडेल का, या प्रश्नाच्या उत्तरात दिनकर लंका म्हणाले की, उलट याचा आम्हाला फायदा होईल. २००४ मध्ये भाजप बरोबर असल्याने आम्हाला अल्पसंख्यकांची मते गमवावी लागली होती. मात्र यंदा स्वतंत्र लढत असल्याने आमच्या मतात निश्चितच वाढ होईल, असेही ते म्हणाले.किंगमेकरच्या भूमिकेसाठी तयारीतेलगू देसम पार्टीला आंध्र प्रदेशातील लोकसभेच्या २५ पैकी २० जागा मिळतील व आम्ही केंद्रात महत्त्वाची भूमिका बजावू, असा दावाही लंका यांनी केला. टीडीपीने २०१४च्या लोकसभा निवडणुकीत १५ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी या पक्षाबरोबर भाजप व अभिनय क्षेत्रातून राजकारणात उतरलेले पवन कल्याण हेही होते. केंद्रात किंगमेकरची भूमिका बजावण्याच्या तयारीत असलेले टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू विरोधी पक्षांना एकत्रित करीत असून, संपूर्ण देशाचा दौरा करीत आहेत.

टॅग्स :Telugu Desam Partyतेलगू देसम पार्टीChandrababu Naiduचंद्राबाबू नायडू