शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या नोटा बाळगाल, तर तुरुंगाची हवा खाल

By admin | Updated: December 29, 2016 04:03 IST

३१ मार्चनंतर ५०० व एक हजार रुपयांच्या दहापेक्षा अधिक नोटा जवळ बाळगाल, तर तुम्हाला पन्नास हजार रुपयांचा दंड आणि चार वर्षांपर्यंत कैद होऊ शकते.

नवी दिल्ली : ३१ मार्चनंतर ५०० व एक हजार रुपयांच्या दहापेक्षा अधिक नोटा जवळ बाळगाल, तर तुम्हाला पन्नास हजार रुपयांचा दंड आणि चार वर्षांपर्यंत कैद होऊ शकते. चलनातून काढून घेण्यात आलेल्या ५००, तसेच १000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाचे, कायदेशीर विमुद्रीकरण (डिमॉनेटायझेशन) करणाऱ्या वटहुकमाच्या मसुद्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. यामुळे चलनातून बाद केलेल्या नोटांचे मूल्य धारकास अदा करण्याची सरकार व रिझर्व्ह बँकेची जबाबदारी ३१ मार्चनंतर संपुष्टात येईल आणि विमुद्रीकरण केलेल्या नोटा जवळ बाळगणे हा गुन्हा ठरेल.केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेला हा वटहुकूम मसुदा सहीसाठी राष्ट्रपतींकडे पाठविला जाईल. सरकारने ८ नोव्हेंबरचा नोटाबंदीचा निर्णय आणि त्यानंतरचे उपाय प्रशासकीय आदेशांद्वारे केले होते. त्याला कायदेशीर वैधता मिळेल. संसदेच्या येत्या अधिवेशनात या वटहुकमाचे कायद्यात रूपांतर करून घ्यावे लागेल. चलनातील प्रत्येक नोट हे सरकारचे जनतेप्रती ऋण असते. म्हणूनच प्रत्येक चलनी नोटेवर त्या नोटेच्या मूल्याएवढी रक्कम धारकास अदा करण्याचे अभिवचन रिझर्व बँकेच्या गव्हर्नरच्या स्वाक्षरीने छापलेले असते. देशात सर्व प्रकारचे चलन जारी करण्याचा अधिकार कायद्याने फक्त रिझर्व बँकेस दिलेला आहे. मात्र, कोणत्याही नोटा, काही विशिष्ट परिस्थितीत, रिझर्व बँकेच्या सल्ल्याने, सरकार चलनातून काढून घेऊ शकते. (लोकमत न्यूज नेटवर्क)नोटाबंदीमागच्या कायदेशीर बाबी - आताचा वटहुकूम का काढला जात आहे, हे समजण्यासाठी एखादी नोट चलनातून काढून घेणे आणि त्या नोटेचे कायदेशीर विमुद्रीकरण करणे यातील फरक समजावून घेणे गरजेचे आहे. - नोट चलनातून काढून घेतली, तरी तिचे मूल्य व तेवढी रक्कम धारकास अदा करण्याची सरकार/ रिझर्व बँकेची जबाबदारी नष्ट होत नाही. याउलट विमुद्रीकरणाने संबंधित नोटेचे मूल्य कायदेशीरपणे निर्लेखित होते. परिणामी, तेवढे मूल्य धारकास अदा करण्याचे सरकारवर बंधन राहात नाही.- नोटांचे विमुद्रीकरण न करता, त्या फक्त चलनातून काढून घेण्याची कारवाई सरकार प्रशासकीय अधिसूचना काढून करू शकते. मात्र, असे केले की, चलनातून काढून घेतलेल्या नोटांचे मूल्य धारकास वैध नोटांच्या स्वरूपात देण्याची जबाबदारी सरकारवर येते. - म्हणजेच बाद नोटा बदलून द्याव्या लागतीत. याचे कारण नागरिकांकडील चलनी नोटा ही त्यांची मालमत्ता असून, संसदेने केलेल्या कायद्याखेरीज सरकार नागरिकांना त्यांच्या संपत्तीपासून वंचित करू शकत नाही. म्हणूनच विमुद्रीकरण कायद्याने (इथे वटहुकूमही) केले जाऊ शकते. - चलनातून बाद केलेल्या नोटा सरकार बदलून देत असल्याने वा तेवढी रक्कम धारकाच्या बँक खात्यांमध्ये जमा करीत असल्याने नागरिक संपत्तीपासून वंचित होत नाही. त्यामुळे त्यासाठी कायदा करण्याची गरज नसते.- ही कायदेशीर पूर्तता करण्यासाठीच आताचा वटहुकूम ‘स्पेसिफाइड बँक नोट्स (सीझेशन आॅफ लायबेलिटिज) आॅर्डिनन्स’ या नावाने काढण्यात येणार आहे.1978 चा दाखला...याआधी १९७८ मध्ये पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या जनता पक्षाच्या सरकारने पाच हजार व १० हजारांच्या नोटा रद्द केल्या होत्या. त्या वेळी ‘डिमॉनेटायझेशन आॅफ हाय डिनॉमिनेशन करन्सी नोट्स’ असा कायदा करून, त्या नोटांचे कायदेशीर विमुद्रीकरण केले गेले होते. त्या वेळी नोटा बँकांमधून घेण्यासाठी लोकांना १६ ते २४ जुलै अशी फक्त नऊ दिवसांची मुदत दिली गेली होती. त्या वेळी सुरुवातीस वटहुकूम काढून नंतर ३० मार्च रोजी संसदेत रीतसर कायदा केला गेला होता. त्या आधी स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश शासनाने चलनात आणलेल्या उच्च मूल्याच्या नोटांचे विमुद्रीकरण करण्यासाठी सरकारने १९५६ मध्ये कायदा केला होता.९0 टक्के बंद नोटा बँकांत जमा- नरेंद्र मोदी सरकारने ८ नोव्हेंबर रोजी चलनातून बाद केलेल्या पाचशे आणि हजारांच्या नोटांपैकी 90% नोटा बँकांत भरल्या गेल्या आहेत. - 15.4 लाख कोटी रुपये मूल्याच्या नोटा चलनात होत्या. त्यापैकी १४ लाख कोटी रुपयांच्या नोटा बँकांत जमा झाल्या आहेत.- नोटाबंदीनंतर 03 लाख कोटींच्या नोटा बँकांत जमा होणार नाहीत, असा सरकारचा अंदाज होता. तथापि, तो साफ कोलमडला आहे.