शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"बेळगावात येण्याचं धाडस कराल तर.…’’ कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्राच्या मंत्र्यांना इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 15:55 IST

Maharashtra Karnataka Border Dispute : बेळगाव दौऱ्यावर जाण्याचं नियोजन करत असलेल्या महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी इशारा दिला आहे.

 बंगळुरू - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद पेटला असून, त्या मुद्द्यावरून दोन्ही राज्यातील राज्य सरकराने आणि नेते आमने-सामने आले आहेत. दरम्यान, बेळगाव दौऱ्यावर जाण्याचं नियोजन करत असलेल्या महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी इशारा दिला आहे.

बेळगावमध्ये येण्याचं धाडस केल्यास कायदेशीर उपाययोजना केल्या जातील, असा इशारा बोम्मई यांनी महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांना दिला आहे. सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोम्मई यांनी सांगितले की, या प्रकरणी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे. तसेच त्यांच्या मंत्र्यांना बेळगावमध्ये न पाठवण्याचं आवाहन करणार आहे. या मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते. तसेच सीमाभागातील अधिकाऱ्यांनाही कठोर पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे बोम्मई यांनी सांगितले. 

महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावादादरम्यान, महाराष्ट्र सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई हे ६ डिसेंबर रोजी कर्नाटकातील बेळगाव येथे जाणार होते. यावेळी ते महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना भेटणार होते. तसेच सीमावादावर त्यांच्यासोबत चर्चा करणार होते. त्याआधी या दोन्ही मंत्र्यांचा दौरा ३ डिसेंबर रोजी नियोजित करण्यात आला होता.

दरम्यान, राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्याबाबतची फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ते म्हणले की,  मंत्र्यांचा बेळगाव दौरा हा महापरिनिर्वाण दिनानिमित्त होता. त्यासाठी एका कार्यक्रमाला मंत्री जाणार होते. त्यात महाराष्ट्राचं काही म्हणणं आहे. कर्नाटकचं काही म्हणणं आहे. मंत्र्यांनी ठरवलं तर ते जाऊ शकतात. त्यांना जाण्यापासून कुणी रोखू शकणार नाही. मात्र महापरिनिर्वाण दिनी असा वाद तयार करायचा का हा महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे यासंदर्भात काही ना काही विचार आम्ही करतोय. माननीय मुख्यमंत्री आम्हाला याबाबत अंतिम निर्णय देतील. महापरिनिर्वाण दिन आमच्यासाठी मोठा दिवस आहे. त्यादिवशी एखादं आंदोलन व्हावं. कुठलीही चुकीची घटना व्हावी हे योग्य नाही. भविष्यात आपल्याला तिथे जाता येईल. तिथे जाण्यापासून कुणी रोखू शकणार नाहीत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.  

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारKarnatakकर्नाटकPoliticsराजकारण