शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

"बेळगावात येण्याचं धाडस कराल तर.…’’ कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्राच्या मंत्र्यांना इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 15:55 IST

Maharashtra Karnataka Border Dispute : बेळगाव दौऱ्यावर जाण्याचं नियोजन करत असलेल्या महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी इशारा दिला आहे.

 बंगळुरू - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद पेटला असून, त्या मुद्द्यावरून दोन्ही राज्यातील राज्य सरकराने आणि नेते आमने-सामने आले आहेत. दरम्यान, बेळगाव दौऱ्यावर जाण्याचं नियोजन करत असलेल्या महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी इशारा दिला आहे.

बेळगावमध्ये येण्याचं धाडस केल्यास कायदेशीर उपाययोजना केल्या जातील, असा इशारा बोम्मई यांनी महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांना दिला आहे. सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोम्मई यांनी सांगितले की, या प्रकरणी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे. तसेच त्यांच्या मंत्र्यांना बेळगावमध्ये न पाठवण्याचं आवाहन करणार आहे. या मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते. तसेच सीमाभागातील अधिकाऱ्यांनाही कठोर पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे बोम्मई यांनी सांगितले. 

महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावादादरम्यान, महाराष्ट्र सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई हे ६ डिसेंबर रोजी कर्नाटकातील बेळगाव येथे जाणार होते. यावेळी ते महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना भेटणार होते. तसेच सीमावादावर त्यांच्यासोबत चर्चा करणार होते. त्याआधी या दोन्ही मंत्र्यांचा दौरा ३ डिसेंबर रोजी नियोजित करण्यात आला होता.

दरम्यान, राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्याबाबतची फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ते म्हणले की,  मंत्र्यांचा बेळगाव दौरा हा महापरिनिर्वाण दिनानिमित्त होता. त्यासाठी एका कार्यक्रमाला मंत्री जाणार होते. त्यात महाराष्ट्राचं काही म्हणणं आहे. कर्नाटकचं काही म्हणणं आहे. मंत्र्यांनी ठरवलं तर ते जाऊ शकतात. त्यांना जाण्यापासून कुणी रोखू शकणार नाही. मात्र महापरिनिर्वाण दिनी असा वाद तयार करायचा का हा महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे यासंदर्भात काही ना काही विचार आम्ही करतोय. माननीय मुख्यमंत्री आम्हाला याबाबत अंतिम निर्णय देतील. महापरिनिर्वाण दिन आमच्यासाठी मोठा दिवस आहे. त्यादिवशी एखादं आंदोलन व्हावं. कुठलीही चुकीची घटना व्हावी हे योग्य नाही. भविष्यात आपल्याला तिथे जाता येईल. तिथे जाण्यापासून कुणी रोखू शकणार नाहीत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.  

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारKarnatakकर्नाटकPoliticsराजकारण