शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

'काँग्रेस केंद्रात सत्तेवर आल्यास मच्छीमारांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 06:12 IST

राहुल यांचे आश्वासन; मोदींसारखा मी खोटारडा नाही

थ्रिसूर : लोकसभा निवडणुकांनंतर काँग्रेस केंद्रात सत्तेवर आल्यास मच्छीमारांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात येईल असे आश्वासन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी येथे दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे मी खोटी आश्वासने देत नाही असाही टोला त्यांनी लगावला.केरळमधील त्रिप्रयार येथे अखिल भारतीय मच्छीमार काँग्रेसने आयोजिलेल्या राष्ट्रीय मच्छीमार संसद या कार्यक्रमात ते बोलत होते. राहुल गांधी यांनी सांगितले की, तुम्ही माझी भाषणे बारकाईने ऐकलीत तर लक्षात येईल की मी जे सांगतो ते करतो. एखादा निर्णय घेतला तर तो अंमलात आणल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. काँग्रेस पक्ष नेहमीच आपल्या शब्दांवर ठाम राहतो.राहुल गांधी यांनी तामिळनाडूतील चेन्नई येथील स्टेला मॅरिस महिला महाविद्यालयामध्ये बुधवारी बोलताना असे आश्वासन दिले होते की, आम्ही सत्तेवर आल्यास संसदेत व विधानसभांत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील विधेयक मंजूर करण्यात येईलच, पण सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ३३ टक्के आक्षण ठेवण्यासाठी कायद्यात दुरुस्ती केली जाईल. विविध प्रांतातील दुर्लक्षित घटकांच्या मागण्या लक्षात घेऊन त्याप्रमाणे राहुल गांधी लोकसभा निवडणुकांतील प्रचारसभांमध्ये सध्या विविध आश्वासनांची पेरणी करत आहेत.उद्योगपतींकडेच लक्षराहुल गांधी मच्छीमारांच्या कार्यक्रमात म्हणाले की, शेतकरी, मच्छीमार, लघुउद्योजक यांच्याकडे लक्ष न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त अनिल अंबानी, नीरव मोदीसारख्या बड्या उद्योगपतींच्या मागण्या मान्य करीत आहेत. या उद्योगपतींनी मागण्या केल्या की पंतप्रधान १० सेकंदांत पूर्ण करतात, असेही ते उपरोधिक शैलीत म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधी