शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
3
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, निफ्टीत ५० अंकांची तेजी; FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी
4
Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू
5
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
6
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
7
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
8
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
9
९८ लाख कोटींच्या साम्राज्याचा सम्राट निवृत्त! वॉरेन बफे यांचा कंपनीतून ९५ व्या वर्षी राजीनामा
10
आजपासून काय-काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? कार महागणार, पीएफच्या नियमांतही मोठे बदल होणार अन् बरंच काही...!
11
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
12
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
13
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
14
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
15
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
16
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
17
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
18
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
19
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
20
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
Daily Top 2Weekly Top 5

माफी मागितल्यास वादावर पडदा; महामंत्री वैष्णवदास दिगंबर आखाडा बैठक : ११ सदस्य समिती स्थापना

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

पंचवटी : चतु:संप्रदायाच्या ध्वजावरून वाद होऊन श्री महंतांचा अपमान केला आणि त्यातूनच बहिष्कृत केलेल्या तीन खालशांनी माफी मागितल्यास वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. आखाड्याच्या खालशात सुरू झालेले वाद मिटविण्यासाठी खालशातीलच अकरा सदस्यांच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती दिगंबर आखाड्याचे महामंत्री वैष्णवदास यांनी दिली.

पंचवटी : चतु:संप्रदायाच्या ध्वजावरून वाद होऊन श्री महंतांचा अपमान केला आणि त्यातूनच बहिष्कृत केलेल्या तीन खालशांनी माफी मागितल्यास वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. आखाड्याच्या खालशात सुरू झालेले वाद मिटविण्यासाठी खालशातीलच अकरा सदस्यांच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती दिगंबर आखाड्याचे महामंत्री वैष्णवदास यांनी दिली.
तीन दिवसांपूर्वीच दिगंबर आखाड्याने महात्यागी कॅम्पच्या सीतारामदास डाकोरचे माधवाचार्य आणि तेराभाई त्यागी खालशाचे बृजमोहनदास या तिघा खालशांवर बहिष्कार टाकण्यात आला होता. या विषयावर चर्चा करण्यासाठी बुधवारी सकाळी दिगंबर आखाड्यात खालशांची बैठक झाली. महंत कृष्णदास महाराज, महंत रामकिशोरदासशास्त्री, महंत गंगादास, जगन्नाथ पुरी, महंत वैष्णवदास यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत खालशांचे वाद मिटविण्यासाठी ११ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीबरोबर बहिष्कृत खालशांचे महंत चर्चा करून काय निर्णय घ्यायचा प्रस्ताव ठेवतील तर समिती खालशांसमोर आखाड्याने मांडलेले प्रस्ताव मांडण्याचे काम करणार आहे.
दिगंबर आखाड्यात झालेल्या बैठकीत केवळ बहिष्कृत केलेल्या खालशांवरच चर्चा करण्यात आली. तर आखाडा परिषद अध्यक्ष पदावरच्या चर्चेस साधू-महंतांनी पूर्णविराम दिला. चतु:संप्रदायच्या ध्वजारोहण सोहळ्यात ध्वजा कोणत्या रंगाची फडकवायची यावरून वाद झाला होता व त्यातून बहिष्कृत केलेल्या खालशांच्या महंतांचा वाद मिटविण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीत समावेश केलेला नाही. विना मतलब वाद करण्यात अर्थ नाही, आम्ही स्नानासाठी आलो आहोत असे म्हणून वाद मिटविण्यास सुरुवात झाली आहे. निर्वाणी, निमार्ेही आखाड्याशी काही घेणे नाही, असेही बैठकीला उपस्थित असलेल्या साधू-महंतांनी सांगितले. (वार्ताहर)
बॉक्स
परंपरेनुसार चतु:संप्रदाय ध्वज लाल
ज्या चतु:संप्रदायाच्या ध्वजावरून वाद झाला तो ध्वज लाल रंगाचाच असल्याची कबुली जगन्नाथपुरीचे महंत गंगादास महाराज यांनी दिली आहे. केवळ काही साधू-महंतांनी भ्रम निर्माण केला आहे. बैठकीत योग्य ती चर्चा झाली असून त्यातूनच लवकर तोडगा निघण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले.