शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

National News : 'आम्ही सत्तेत असतो, तर चीनला 15 मिनिटांत बाहेर फेकून दिलं असतं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 08:06 IST

National News : राहुल गांधींनी नव्यानेच बनवलेल्या कृषी कायद्याविरोधात आपली भूमिका मांडली. तेथील शेतकऱ्यांच्या बाजुने काँग्रेससह इतरही मित्रपक्ष असल्याचे आश्वासन देत, मोदी सरकारवर टीका केली

ठळक मुद्देराहुल गांधींनी नव्यानेच बनवलेल्या कृषी कायद्याविरोधात आपली भूमिका मांडली. तेथील शेतकऱ्यांच्या बाजुने काँग्रेससह इतरही मित्रपक्ष असल्याचे आश्वासन देत, मोदी सरकारवर टीका केली.

नवी दिल्ली - पंजाबला लागून असलेल्या हरयाणाच्या सीमेवर घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि मोजक्या नेत्यांना कृषी कायद्याविरोधी रॅलीसाठी भाजपशासित हरयाणा राज्यात प्रवेश करण्याची परवानगी दिली. पटियालातील सनौर येथील रॅलीनंतर ‘शेती बचाव’ यात्रेच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधी हे ट्रॅक्टरने हरयाणाच्या सीमेवर पोहोचले. येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राहुल यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली. देशातील विविध मुद्द्यांवर बोलताना, लडाख सीमारेषेवरील चीनच्या घुसखोरीवरुनही त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले. 

राहुल गांधींनी नव्यानेच बनवलेल्या कृषी कायद्याविरोधात आपली भूमिका मांडली. तेथील शेतकऱ्यांच्या बाजुने काँग्रेससह इतरही मित्रपक्ष असल्याचे आश्वासन देत, मोदी सरकारवर टीका केली. मोदी सरकार हे शेतकरी, कामगार व गरिबविरोधी सरकार असून अदानी आणि अंबानींचं हित जोपसणारे असल्याची टाकीही राहुल यांनी केली. हाथरस बलात्कार प्रकरण, कृषी कायदे, लॉकडाऊनमधील समस्या, कोरोनातील अपयश यांसह लडाख सीमारेषेवरील भारत-चीन वादावरही राहुल यांनी भाष्य केले. यावेळी, बोलताना चीनने भारताच्या हद्दीत प्रवेश केला असून मोदी सरकार गप्प असल्याचे ते म्हणाले. तसेच, देशात आजमित्तीला युपीएचं सरकार असतं, तर आम्ही चीनला बाहेर फेकून दिलं असतं, त्यासाठी 15 मिनिटांचाही वेळ आम्हाला लागला नसता, असेही राहुल यांनी म्हटले.  

कृषी कायद्याला विरोध, देशाचे नुकसान 

"मी तुम्हाला विचारू इच्छितो, हे कायदे या संकटाच्या काळातच का लागू केले गेले? एवढी घाई कशाची होती? कारण मोदीजींना माहीत आहे, की शेतकरी आणि मजुरांच्या पायावर कुऱ्हाड मारली, की ते घरातून बाहेर निघू शकणार नाहीत. नरेंद्र मोदी केवळ ही व्यवस्था नष्ट करत आहेत. जेथे त्यांनी MSPची हमी द्यायला हवी, तेथे ते या तीन कायद्याच्या माध्यमाने शेतकरी आणि मजुरांना मारत आहेत. त्यांचा गळा कापत आहेत. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना दोनच पर्याय उपलब्ध असतील. ते म्हणजे, अडानी आणि अंबानी. आता आपणच सांगा, एक शेतकरी त्यांच्याशी लढू शकतो? त्यांच्याशी बोलू शकतो? मुळीच नाही, सर्व काही नष्ट होईल. हेच मोदींचे लक्ष्य आहे. येथे मी केवळ शेतकऱ्यांसाठीच उभा नाही, तर भारतातील सर्व जनतेसाठी उभा आहे. कारण केवळ शेतकरी आणि मजुरांचे नाही, तर संपूर्ण देशाचे नुकसान होत आहे," असेही राहुल गांधी म्हणाले.

मोर्चाला परवानगी नाकारली

हरयाणातील भाजप सरकारने सोमवारी म्हटले होते की, काँग्रेस नेते राहुल गांधी काही लोकांसोबत येऊ शकतात; परंतु राज्यातील वातावरण बिघडू शकते म्हणून पंजाबमधून मोठी गर्दी घेऊन आले तर परवानगी दिली जाणार नाही. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनीही म्हटले होते की, राहुल गांधी यांना आपली भूमिका मांडण्याचा हक्क आहे; परंतु पंजाबमधून मोठ्या संख्येने लोक घेऊन आल्यास परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे, राहुल गांधींसमेवत पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सुनील जाखड आणि वरिष्ठ नेते हरीश रावत होते. पंजाबच्या पटियाला जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते; परंतु पिहोवा सीमेवरील टेकोर गावानजीक महामार्गावर तासभर शेती बचाव यात्रा रोखण्यात आली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीchinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदीborder disputeसीमा वाद