शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

'आज जर आपण गप्प बसलो, तर उद्या...'; निलेश लंकेंचा वक्फ विधेयकावर बोलताना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 17:10 IST

Waqf Bill Nilesh Lanke: वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले. या विधेयकाबद्दल खासदार निलेश लंके यांनी त्यांची भूमिका मांडली. लंके यांनी काही मुद्द्यांकडे सरकारचे लक्ष्य वेधले.

Nilesh Lanke News: 'या विधेयकात असं म्हटलं जात आहे की, वक्फ बोर्ड सशक्त करायचं आहे. पण, प्रत्यक्षात त्यांचे अधिकार सरकारकडे हस्तांतरित होत आहेत. देशभरात वक्फ बोर्डाकडे ९.४ लाख एकर जमीन आहे. त्याची अंदाजे किंमत १.२ लाख कोटी रुपये आहे. प्रश्न इतकाच आहे की, हे वक्फ बोर्डाचे सशक्तीकरण आहे की, वक्फ बोर्ड ताबा मिळवण्याचा डाव आहे?', असा सवाल खासदार निलेश लंके यांनी वक्फ सुधारणा विधेयकावर बोलताना केंद्र सरकारला केला.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

वक्फ सुधारणा विधेयक बुधवारी (२ एप्रिल) दुपारी लोकसभेत सादर करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी चर्चेत सहभाग घेतला. 

निलेश लंकेंनी वक्फ सुधारणा विधेयकाबद्दल मांडली भूमिका

"वक्फ बोर्डाचे अधिकार कमी न करता, योग्य बदल करून त्यामध्ये सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न करावा. सशक्तीकरणाच्या नावाखाली संस्थेचे स्वातंत्र हिरावू नये. संबंधित अल्पसंख्याक समाजाच्या भावना लक्षात घेऊन त्या समाजाचे प्रतिनिधित्व त्या बोर्डामध्ये पुरेशा संख्येने असावे", अशा मागण्या खासदार निलेश लंके यांनी केल्या. 

वाचा >>'तीन तलाकनंतर महिलांना वक्फ बोर्डात प्रतिनिधीत्व, बील मंजूर होईल'; देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं

निलेश लंके पुढे बोलताना म्हणाले की, "हे लक्षात घ्या की, मुस्लीम, पारशी, ख्रिश्चन, शीख, जैन, नवबौद्ध हे अल्पसंख्याक समाज केवळ सांस्कृतिक नव्हे, तर राष्ट्रीय उभारणीचे भागीदार आहेत." 

...तर हे अतिक्रमण करणाऱ्यांना कवच देण्यासारखे -लंके

"वक्फ बोर्डाच्या अध्यक्षाची पूर्वी लोकशाही पद्धतीने निवड होत होती. आता सरकार थेट नियुक्ती करणार आहे. ही बाब संविधानाच्या विरोधात आहे. वक्फचे निर्णय आधी बोर्ड घेत असे, आता तो निर्णय एक सरकारी अधिकारी घेणार. याचा अर्थ सरकारचा हस्तक्षेप वाढणार आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनीवर १२ वर्षे अतिक्रमण झाले आणि त्यावर बोर्डाने काही कारवाई केली नाही, तर ती मालमत्ता अतिक्रमण करणाऱ्याची होणार, ही तरतूद म्हणजे अतिक्रमण करणाऱ्याला एक प्रकारे कवच देत आहोत", अशी टीका लंके यांनी केली.  

"जर आज वक्फ बोर्डाच्या संस्थांवर सरकारचा ताबा असेल, तर उद्या इतर समाजाच्या संस्थाबद्दलही हेच होईल. ही लोकशाहीला छेद देणारी प्रक्रिया आहे. आज जर आपण गप्प बसलो, तर उद्या एक-एक संस्था, एक-एक आवाज, एक-एक विचार संस्थात्मक मार्गाने संपवले जातील", असा इशारा लंके यांनी दिला. 

टॅग्स :nilesh lankeनिलेश लंकेwaqf board amendment billवक्फ बोर्डBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसlok sabhaलोकसभा