शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
4
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
6
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
7
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
8
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
9
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
10
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
11
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
12
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
13
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
14
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
15
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
16
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
18
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
19
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
20
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!

'आज जर आपण गप्प बसलो, तर उद्या...'; निलेश लंकेंचा वक्फ विधेयकावर बोलताना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 17:10 IST

Waqf Bill Nilesh Lanke: वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले. या विधेयकाबद्दल खासदार निलेश लंके यांनी त्यांची भूमिका मांडली. लंके यांनी काही मुद्द्यांकडे सरकारचे लक्ष्य वेधले.

Nilesh Lanke News: 'या विधेयकात असं म्हटलं जात आहे की, वक्फ बोर्ड सशक्त करायचं आहे. पण, प्रत्यक्षात त्यांचे अधिकार सरकारकडे हस्तांतरित होत आहेत. देशभरात वक्फ बोर्डाकडे ९.४ लाख एकर जमीन आहे. त्याची अंदाजे किंमत १.२ लाख कोटी रुपये आहे. प्रश्न इतकाच आहे की, हे वक्फ बोर्डाचे सशक्तीकरण आहे की, वक्फ बोर्ड ताबा मिळवण्याचा डाव आहे?', असा सवाल खासदार निलेश लंके यांनी वक्फ सुधारणा विधेयकावर बोलताना केंद्र सरकारला केला.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

वक्फ सुधारणा विधेयक बुधवारी (२ एप्रिल) दुपारी लोकसभेत सादर करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी चर्चेत सहभाग घेतला. 

निलेश लंकेंनी वक्फ सुधारणा विधेयकाबद्दल मांडली भूमिका

"वक्फ बोर्डाचे अधिकार कमी न करता, योग्य बदल करून त्यामध्ये सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न करावा. सशक्तीकरणाच्या नावाखाली संस्थेचे स्वातंत्र हिरावू नये. संबंधित अल्पसंख्याक समाजाच्या भावना लक्षात घेऊन त्या समाजाचे प्रतिनिधित्व त्या बोर्डामध्ये पुरेशा संख्येने असावे", अशा मागण्या खासदार निलेश लंके यांनी केल्या. 

वाचा >>'तीन तलाकनंतर महिलांना वक्फ बोर्डात प्रतिनिधीत्व, बील मंजूर होईल'; देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं

निलेश लंके पुढे बोलताना म्हणाले की, "हे लक्षात घ्या की, मुस्लीम, पारशी, ख्रिश्चन, शीख, जैन, नवबौद्ध हे अल्पसंख्याक समाज केवळ सांस्कृतिक नव्हे, तर राष्ट्रीय उभारणीचे भागीदार आहेत." 

...तर हे अतिक्रमण करणाऱ्यांना कवच देण्यासारखे -लंके

"वक्फ बोर्डाच्या अध्यक्षाची पूर्वी लोकशाही पद्धतीने निवड होत होती. आता सरकार थेट नियुक्ती करणार आहे. ही बाब संविधानाच्या विरोधात आहे. वक्फचे निर्णय आधी बोर्ड घेत असे, आता तो निर्णय एक सरकारी अधिकारी घेणार. याचा अर्थ सरकारचा हस्तक्षेप वाढणार आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनीवर १२ वर्षे अतिक्रमण झाले आणि त्यावर बोर्डाने काही कारवाई केली नाही, तर ती मालमत्ता अतिक्रमण करणाऱ्याची होणार, ही तरतूद म्हणजे अतिक्रमण करणाऱ्याला एक प्रकारे कवच देत आहोत", अशी टीका लंके यांनी केली.  

"जर आज वक्फ बोर्डाच्या संस्थांवर सरकारचा ताबा असेल, तर उद्या इतर समाजाच्या संस्थाबद्दलही हेच होईल. ही लोकशाहीला छेद देणारी प्रक्रिया आहे. आज जर आपण गप्प बसलो, तर उद्या एक-एक संस्था, एक-एक आवाज, एक-एक विचार संस्थात्मक मार्गाने संपवले जातील", असा इशारा लंके यांनी दिला. 

टॅग्स :nilesh lankeनिलेश लंकेwaqf board amendment billवक्फ बोर्डBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसlok sabhaलोकसभा