शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

आज विवेकानंद असते तर त्यांच्यावरही गुंडांनी इंजिन ऑइल फेकलं असतं- थरुर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 14:00 IST

झारखंडमध्ये स्वामी अग्निवेश यांच्यावर हल्ला झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

थिरुवनंतपूरम- 19 व्या शतकात जगभरात भारतीय संस्कृती आणि अध्यात्म यांबाबत जागृती करणारे आणि थोर विचारवंत स्वामी विवेकानंद आज असते तर त्यांच्यावरही गुंडांनी हल्ला केला असता असे विधान काँग्रेसचे नेते आणि थिरुवनंतपूरमचे खासदार शशी थरूर यांनी केले आहे. झारखंडमध्ये भारतीय जनता युवा मोर्चा आणि अखिल भारीतय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी स्वामी अग्निवेश यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येते. त्या पार्श्वभूमीवर थरुर बोलत होते.

ज्याप्रमाणे अग्निवेश यांच्यावर हल्ला झाला तसाच आज स्वामी विवेकानंद असते तरी त्यांच्यावर या गुंडांनी हल्ला केला असता याची मला खात्री आहे असे थरुर म्हणाले. लोकांचा आदर करा, माणुसकी अधिक महत्त्वाची आहे असे विवेकानंदांनी आज सांगितले असते म्हणून या गुंडांनी इंजिन ऑइल त्यांच्यावर फेकलं असतं आणि अग्निवेश यांना रस्त्यात पाडलं तसंच त्यांच्याशीही वर्तन केलं असतं, अशा शब्दांमध्ये शशी थरूर यांनी अग्निवेश यांच्या हल्ल्याचा निषेध केला.

थरुर यांनी यावेळी गृहमंत्रालयाने जाहीर केलेली सांप्रदायिक हिंसाचाराची आकडेवारीही सांगितली. गेल्या चार वर्षांमध्ये सांप्रदायिक हिंसेच्या 2920 घटनांची नोंद झाली आहे. तसेच गायीच्या मुद्द्यावरून झालेल्या 70 खटल्यांपैकी 68 खटले भाजपाशासित राज्यांमध्ये नोंदले गेले आहेत.पंतप्रधान परदेशात गेल्यावर वेगवेगळे पोशाख घालतात मात्र ते हिरवा रंग मात्र परिधान करत नाहीत (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये मुस्लीम टोपी घालण्यास नकार दिला होता.) अशा शब्दांमध्ये थरुर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली.

दरम्यान स्वामी अग्निवेश यांनी आपल्याला न्याय मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्यावर हल्ला होऊन 18 दिवस झाले तरिही झारखंड पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही, या आठवड्यात आपण कधीही सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो असे अग्निवेश यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरSwami Vivekanandaस्वामी विवेकानंद