शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

नोटाबंदीसाठी दबाव आला असता तर मी राजीनामा दिला असता- पी. चिदंबरम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2017 21:33 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्दे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. 'मी अर्थमंत्री असतो आणि पंतप्रधानांनी माझ्यावर नोटाबंदीसाठी दबाव आणला असता तर मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असता', असं पी. विधान चिदंबरम यांनी केलं आहे.

राजकोट- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. 'मी अर्थमंत्री असतो आणि पंतप्रधानांनी माझ्यावर नोटाबंदीसाठी दबाव आणला असता तर मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असता', असं पी. विधान चिदंबरम यांनी केलं आहे.

राजकोट येथे अर्थव्यवस्थेवर व्याख्यान देताना चिदंबरम यांनी नोटाबंदी, बुलेट ट्रेन आणि जीएसटीच्या निर्णयावरून केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली. नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे आणि जीएसटीचा निर्णय चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी करण्यात ज्या पद्धतीने घाई करण्यात आली ती खटकणारी आहे. पूर्ण खबरदारी घेऊनच जीएसटीची अंमलबजावणी करायला हवी होती, असं चिदंबरम यांनी म्हंटलं आहे. जीएसटी दर जास्तीत जास्त १८ टक्क्यांपर्यंत असावा असं नमूद करताना अनेक वस्तूंवरील अवाजवी जीएसटी हटवण्याची मागणीही त्यांनी केली.

बुलेट ट्रेन प्रकल्पाला प्राधान्य देण्याऐवजी रेल्वे स्टेशन, कोच, सुरक्षा, स्वच्छता, सिग्नल यंत्रणा, उपनगरीय सेवा सुधारण्यासाठी लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचंही चिदंबरम यांनी म्हंटलं. बुलेट ट्रेनच्या एका फेरीत जास्तीत जास्त 600 लोक प्रवार करतील त्यासाठी सरकारने जपानकडून भलीमोठी रक्कम उधार घेतली आहे. बुलेट ट्रेनच्याऐवजी सरकारने या पैशांचा वापर आरोग्या आणि शिक्षण सुधारणेसाठी करायला हवा होता. याची सध्या लोकांना जास्त गरज आहे. बुलेट ट्रेन पुढच्या 10-15 वर्षांनी आपली प्राथमिकता असेल, असं चिदंबरम यांनी म्हंटलं आहे. 

यावेळी चिदंबरम यांनी जम्मू-काश्मीरला स्वायत्तता देण्याच्या मागणीचं समर्थन केलं. स्वायत्तता दिल्यानंतरही जम्मू-काश्मीर हा भारताचाच भाग राहणार असून या मागणीचा विचार करायला हवा, असं चिदंबरम म्हणाले.