शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

नोटाबंदीसाठी दबाव आला असता तर मी राजीनामा दिला असता- पी. चिदंबरम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2017 21:33 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्दे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. 'मी अर्थमंत्री असतो आणि पंतप्रधानांनी माझ्यावर नोटाबंदीसाठी दबाव आणला असता तर मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असता', असं पी. विधान चिदंबरम यांनी केलं आहे.

राजकोट- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. 'मी अर्थमंत्री असतो आणि पंतप्रधानांनी माझ्यावर नोटाबंदीसाठी दबाव आणला असता तर मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असता', असं पी. विधान चिदंबरम यांनी केलं आहे.

राजकोट येथे अर्थव्यवस्थेवर व्याख्यान देताना चिदंबरम यांनी नोटाबंदी, बुलेट ट्रेन आणि जीएसटीच्या निर्णयावरून केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली. नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे आणि जीएसटीचा निर्णय चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी करण्यात ज्या पद्धतीने घाई करण्यात आली ती खटकणारी आहे. पूर्ण खबरदारी घेऊनच जीएसटीची अंमलबजावणी करायला हवी होती, असं चिदंबरम यांनी म्हंटलं आहे. जीएसटी दर जास्तीत जास्त १८ टक्क्यांपर्यंत असावा असं नमूद करताना अनेक वस्तूंवरील अवाजवी जीएसटी हटवण्याची मागणीही त्यांनी केली.

बुलेट ट्रेन प्रकल्पाला प्राधान्य देण्याऐवजी रेल्वे स्टेशन, कोच, सुरक्षा, स्वच्छता, सिग्नल यंत्रणा, उपनगरीय सेवा सुधारण्यासाठी लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचंही चिदंबरम यांनी म्हंटलं. बुलेट ट्रेनच्या एका फेरीत जास्तीत जास्त 600 लोक प्रवार करतील त्यासाठी सरकारने जपानकडून भलीमोठी रक्कम उधार घेतली आहे. बुलेट ट्रेनच्याऐवजी सरकारने या पैशांचा वापर आरोग्या आणि शिक्षण सुधारणेसाठी करायला हवा होता. याची सध्या लोकांना जास्त गरज आहे. बुलेट ट्रेन पुढच्या 10-15 वर्षांनी आपली प्राथमिकता असेल, असं चिदंबरम यांनी म्हंटलं आहे. 

यावेळी चिदंबरम यांनी जम्मू-काश्मीरला स्वायत्तता देण्याच्या मागणीचं समर्थन केलं. स्वायत्तता दिल्यानंतरही जम्मू-काश्मीर हा भारताचाच भाग राहणार असून या मागणीचा विचार करायला हवा, असं चिदंबरम म्हणाले.