शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीसाठी दबाव आला असता तर मी राजीनामा दिला असता- पी. चिदंबरम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2017 21:33 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्दे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. 'मी अर्थमंत्री असतो आणि पंतप्रधानांनी माझ्यावर नोटाबंदीसाठी दबाव आणला असता तर मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असता', असं पी. विधान चिदंबरम यांनी केलं आहे.

राजकोट- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. 'मी अर्थमंत्री असतो आणि पंतप्रधानांनी माझ्यावर नोटाबंदीसाठी दबाव आणला असता तर मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असता', असं पी. विधान चिदंबरम यांनी केलं आहे.

राजकोट येथे अर्थव्यवस्थेवर व्याख्यान देताना चिदंबरम यांनी नोटाबंदी, बुलेट ट्रेन आणि जीएसटीच्या निर्णयावरून केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली. नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे आणि जीएसटीचा निर्णय चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी करण्यात ज्या पद्धतीने घाई करण्यात आली ती खटकणारी आहे. पूर्ण खबरदारी घेऊनच जीएसटीची अंमलबजावणी करायला हवी होती, असं चिदंबरम यांनी म्हंटलं आहे. जीएसटी दर जास्तीत जास्त १८ टक्क्यांपर्यंत असावा असं नमूद करताना अनेक वस्तूंवरील अवाजवी जीएसटी हटवण्याची मागणीही त्यांनी केली.

बुलेट ट्रेन प्रकल्पाला प्राधान्य देण्याऐवजी रेल्वे स्टेशन, कोच, सुरक्षा, स्वच्छता, सिग्नल यंत्रणा, उपनगरीय सेवा सुधारण्यासाठी लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचंही चिदंबरम यांनी म्हंटलं. बुलेट ट्रेनच्या एका फेरीत जास्तीत जास्त 600 लोक प्रवार करतील त्यासाठी सरकारने जपानकडून भलीमोठी रक्कम उधार घेतली आहे. बुलेट ट्रेनच्याऐवजी सरकारने या पैशांचा वापर आरोग्या आणि शिक्षण सुधारणेसाठी करायला हवा होता. याची सध्या लोकांना जास्त गरज आहे. बुलेट ट्रेन पुढच्या 10-15 वर्षांनी आपली प्राथमिकता असेल, असं चिदंबरम यांनी म्हंटलं आहे. 

यावेळी चिदंबरम यांनी जम्मू-काश्मीरला स्वायत्तता देण्याच्या मागणीचं समर्थन केलं. स्वायत्तता दिल्यानंतरही जम्मू-काश्मीर हा भारताचाच भाग राहणार असून या मागणीचा विचार करायला हवा, असं चिदंबरम म्हणाले.