शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

"सीआरपीएफचे जवान नसते तर...", मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी जिरीबाममधील हल्ल्याची दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 10:26 IST

मणिपूरमधील जिरीबाममध्ये झालेल्या हल्ल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आज माहिती दिली.

गेल्या काही दिवसापासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे.  आता जिरीबाम जिल्ह्यात हिंसाचार झाला असून त्यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारने याला दहशतवादी हल्ला म्हटले आहे. या हल्ल्यावेळी वेळीच केंद्रीय राखीव पोलीस दलाने  हस्तक्षेप करून अनेकांचा जीव वाचवला आहे.

मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनीही या घटनेवर वक्तव्य केले आहे. बिरेन सिंह म्हणाले की, '१० कुकी दहशतवाद्यांनी जिरीबाममधील बोरोबेकरा येथे एका मदत छावणीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तिथे ११५ अंतर्गत विस्थापित लोक राहत होते, पण त्यांचे हल्लाचे नियोजन सीआरपीएफने हाणून पाडली.

‘कसाबलादेखील नि:पक्ष सुनावणी मिळाली’, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

आसामच्या आंतरराज्य सीमेवर असलेल्या बोरोबेकरा गावात ११ नोव्हेंबर रोजी केंद्रीय दलांसोबत झालेल्या गोळीबारात सर्व १० दहशतवादी ठार झाल्याचेही त्यांनी सांगितले. या घटनेत सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला आहे.

बिरेन सिंह म्हणाले की, जर सीआरपीएफ तैनात केले नसते तर अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असता. कुकी दहशतवादी रॉकेट लाँचर, एके 47 आणि अनेक अत्याधुनिक शस्त्रे घेऊन आले होते. त्यांनी पोलीस छावणीवर हल्ला या हल्ल्यात दोन जण जागीच ठार झाले.

हल्लेखोर बोरोबेकरा रिलीफ कॅम्पमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते, तिथे ११५ मैतेई नागरिक राहत होते. मात्र सीआरपीएफने वेळीच हस्तक्षेप केल्याने जीव वाचला. सीएम बिरेन सिंह म्हणाले की, आठ निष्पाप लोकांचा बळी जाणे अत्यंत दुर्दैवी आहे. या हल्ल्यात दोन ठार झाले आणि तीन लहान मुलांसह सहा जणांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली.

दुसरीकडे, मणिपूरच्या दहा कुकी आमदारांनी लुटलेली शस्त्रे परत मिळवण्यासाठी संपूर्ण राज्यात AFSPA लागू करण्याची मागणी केली आहे. या आमदारांमध्ये राज्यातील सत्ताधारी भाजप आघाडीच्या सात आमदारांचाही समावेश आहे.

दरम्यान, राज्याच्या काही भागात पुन्हा AFSFA लागू करण्याच्या मागणीसाठी इंफाळ खोऱ्यात निदर्शने करण्यात आली. तर राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. मणिपूरमधील हिंसाचारग्रस्त जिरीबामसह सहा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा पुन्हा लागू करण्यात आला आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार