शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

सुभाषचंद्र बोस असते, तर फाळणी झाली नसती! अजित डोवाल यांचे मत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 09:02 IST

डोवाल म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी बोस निर्धाराने लढले. त्यांनी कधीही स्वातंत्र्याची भीक मागितली नाही.

नवी दिल्ली : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यात इंग्रजांना आव्हान देण्याचे धाडस होते. स्वातंत्र्यावेळी ते असते तर देशाची फाळणी झाली नसती,  असे मत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी व्यक्त केले. नवी दिल्ली येथे असोचेमद्वारे आयोजित नेताजी सुभाषचंद्र बोस स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते.  

डोवाल म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी बोस निर्धाराने लढले. त्यांनी कधीही स्वातंत्र्याची भीक मागितली नाही. केवळ राजकीयदृष्ट्या न लढणाऱ्या लोकांचा राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक दृष्टिकोन बदलण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. बोस हे धाडसी प्रवृत्तीचे नेते होते. त्यांच्यात महात्मा गांधींना आव्हान देण्याचेही धाडस होते. परंतु गांधीजींबाबत त्यांना प्रचंड आदर होता.

ते असते तर प्रसंगी देशाची फाळणीही झाली नसती. मोहम्मद अली जिना एकदा असेही म्हटले होते, की केवळ एकाच नेत्याचे ऐकले असते, ते म्हणजे सुभाषचंद्र बोस. देशासाठी सुभाषचंद्र बोस यांनी दिलेले योगदान हे अनुकरणीय असल्याचेही डोवाल यांनी नमूद केले.

टॅग्स :Ajit Dovalअजित डोवाल