शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

संघ, भाजपाविरोधात लिहिले नसते, तर गौरी लंकेश जिवंत राहिल्या असत्या, भाजपा आमदाराचे वक्तव्य; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:00 IST

कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाविरोधात लिखाण केले नसते तर कदाचित आज त्या जिवंत असत्या, असे वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे आमदार डी. एन. जीवराज यांनी केल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

नवी दिल्ली : कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाविरोधात लिखाण केले नसते तर कदाचित आज त्या जिवंत असत्या, असे वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे आमदार डी. एन. जीवराज यांनी केल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.आ. जीवराज यांनी चिकमंगळुरूच्या कोप्पा येथील सभेत हे विधान केले. ते तेथील शृंगेरी मतदारसंघातून निवडून आले आहेत. कर्नाटकात संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्येनंतर गौरी लंकेश यांनी संघाच्या विरोधातच लिखाण केले.त्यांनी तसे लिखाण केले नसते, तर कदाचित त्या आज जिवंत राहिल्या असत्या. त्यांनी ज्या प्रकारे संघ व भाजपाविरोधात लेखन केले, ते पूर्णपणे चुकीचे होते, असे सांगतानाच, गौरी लंकेश या मला बहिणीसारख्या आहेत, अशी सारवासारवही आ. जीवराज यांनी केली.ते म्हणाले की, काँग्रेस सत्तेत असताना संघाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. मात्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारने आरोपींविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. आतापर्यंत संघाच्या ११ कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. काँग्रेसच्या सत्ताकाळात आम्ही संघाच्या कार्यकर्त्यांना मरताना पाहिले, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)सिद्धरामय्या यांचा सवालविरोधी पक्षांनी आ. जीवराज यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. जीवराज यांनी हे वक्तव्य कशाच्या आधारे केले? गौरी लंकेश यांचे मारेकरी कोण आहेत, हेच ते सांगू इच्छित आहेत की काय, असा सवाल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी जीवराज यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी या वक्तव्याबद्दल आ. जीवराज यांच्या विरोधात शृंगेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.नंतरचा खुलासाविरोधकांच्या टीकेनंतर जीवराज यांनी, मी असे वक्तव्य केलेच नव्हते, प्रसारमाध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे, असा खुलासा केला. सिद्धरामय्या सरकारने आधीच्या हत्यांचा नीट तपास करून आरोपींना तुरुंगात टाकले असते, तर गौरी लंकेश यांची हत्या झाली नसती, असे आपण म्हणालो, असा दावा त्यांनी केला. पण त्यांनी कानडीत केलेल्या भाषणाच्या चित्रफितीमधून त्यांनी गौरी यांच्या हत्येचे समर्थन केल्याचे स्पष्ट होते.कोण आहेत जीवराज : आ. जीवराज यांच्या विरोधात एका २३ वर्षीय महिलेच्या अपहरण व बलात्काराचा गुन्हा २0१३ साली दाखल करण्यात आला होता. गेल्या वर्षी चिकमंगळुरूमध्ये गोरक्षकांनी दलितांवर हल्ला केला होता. त्यानंतर जीवराज यांनी गोरक्षकांचे समर्थन केले होते.तपास दोन आठवड्यांत करागौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास एसआयटीने दोन आठवड्यांत पूर्ण करावा, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. पण तो दोन आठवड्यांतपूर्ण न झाल्यास आम्ही तपास सीबीआयकडे सोपवू, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Gauri Lankeshगौरी लंकेशGauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणCrimeगुन्हा