शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

संघ, भाजपाविरोधात लिहिले नसते, तर गौरी लंकेश जिवंत राहिल्या असत्या, भाजपा आमदाराचे वक्तव्य; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:00 IST

कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाविरोधात लिखाण केले नसते तर कदाचित आज त्या जिवंत असत्या, असे वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे आमदार डी. एन. जीवराज यांनी केल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

नवी दिल्ली : कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाविरोधात लिखाण केले नसते तर कदाचित आज त्या जिवंत असत्या, असे वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे आमदार डी. एन. जीवराज यांनी केल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.आ. जीवराज यांनी चिकमंगळुरूच्या कोप्पा येथील सभेत हे विधान केले. ते तेथील शृंगेरी मतदारसंघातून निवडून आले आहेत. कर्नाटकात संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्येनंतर गौरी लंकेश यांनी संघाच्या विरोधातच लिखाण केले.त्यांनी तसे लिखाण केले नसते, तर कदाचित त्या आज जिवंत राहिल्या असत्या. त्यांनी ज्या प्रकारे संघ व भाजपाविरोधात लेखन केले, ते पूर्णपणे चुकीचे होते, असे सांगतानाच, गौरी लंकेश या मला बहिणीसारख्या आहेत, अशी सारवासारवही आ. जीवराज यांनी केली.ते म्हणाले की, काँग्रेस सत्तेत असताना संघाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. मात्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारने आरोपींविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. आतापर्यंत संघाच्या ११ कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. काँग्रेसच्या सत्ताकाळात आम्ही संघाच्या कार्यकर्त्यांना मरताना पाहिले, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)सिद्धरामय्या यांचा सवालविरोधी पक्षांनी आ. जीवराज यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. जीवराज यांनी हे वक्तव्य कशाच्या आधारे केले? गौरी लंकेश यांचे मारेकरी कोण आहेत, हेच ते सांगू इच्छित आहेत की काय, असा सवाल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी जीवराज यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी या वक्तव्याबद्दल आ. जीवराज यांच्या विरोधात शृंगेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.नंतरचा खुलासाविरोधकांच्या टीकेनंतर जीवराज यांनी, मी असे वक्तव्य केलेच नव्हते, प्रसारमाध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे, असा खुलासा केला. सिद्धरामय्या सरकारने आधीच्या हत्यांचा नीट तपास करून आरोपींना तुरुंगात टाकले असते, तर गौरी लंकेश यांची हत्या झाली नसती, असे आपण म्हणालो, असा दावा त्यांनी केला. पण त्यांनी कानडीत केलेल्या भाषणाच्या चित्रफितीमधून त्यांनी गौरी यांच्या हत्येचे समर्थन केल्याचे स्पष्ट होते.कोण आहेत जीवराज : आ. जीवराज यांच्या विरोधात एका २३ वर्षीय महिलेच्या अपहरण व बलात्काराचा गुन्हा २0१३ साली दाखल करण्यात आला होता. गेल्या वर्षी चिकमंगळुरूमध्ये गोरक्षकांनी दलितांवर हल्ला केला होता. त्यानंतर जीवराज यांनी गोरक्षकांचे समर्थन केले होते.तपास दोन आठवड्यांत करागौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास एसआयटीने दोन आठवड्यांत पूर्ण करावा, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. पण तो दोन आठवड्यांतपूर्ण न झाल्यास आम्ही तपास सीबीआयकडे सोपवू, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Gauri Lankeshगौरी लंकेशGauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणCrimeगुन्हा