शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

संघ, भाजपाविरोधात लिहिले नसते, तर गौरी लंकेश जिवंत राहिल्या असत्या, भाजपा आमदाराचे वक्तव्य; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:00 IST

कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाविरोधात लिखाण केले नसते तर कदाचित आज त्या जिवंत असत्या, असे वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे आमदार डी. एन. जीवराज यांनी केल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

नवी दिल्ली : कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाविरोधात लिखाण केले नसते तर कदाचित आज त्या जिवंत असत्या, असे वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे आमदार डी. एन. जीवराज यांनी केल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.आ. जीवराज यांनी चिकमंगळुरूच्या कोप्पा येथील सभेत हे विधान केले. ते तेथील शृंगेरी मतदारसंघातून निवडून आले आहेत. कर्नाटकात संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्येनंतर गौरी लंकेश यांनी संघाच्या विरोधातच लिखाण केले.त्यांनी तसे लिखाण केले नसते, तर कदाचित त्या आज जिवंत राहिल्या असत्या. त्यांनी ज्या प्रकारे संघ व भाजपाविरोधात लेखन केले, ते पूर्णपणे चुकीचे होते, असे सांगतानाच, गौरी लंकेश या मला बहिणीसारख्या आहेत, अशी सारवासारवही आ. जीवराज यांनी केली.ते म्हणाले की, काँग्रेस सत्तेत असताना संघाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. मात्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारने आरोपींविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. आतापर्यंत संघाच्या ११ कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. काँग्रेसच्या सत्ताकाळात आम्ही संघाच्या कार्यकर्त्यांना मरताना पाहिले, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)सिद्धरामय्या यांचा सवालविरोधी पक्षांनी आ. जीवराज यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. जीवराज यांनी हे वक्तव्य कशाच्या आधारे केले? गौरी लंकेश यांचे मारेकरी कोण आहेत, हेच ते सांगू इच्छित आहेत की काय, असा सवाल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी जीवराज यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी या वक्तव्याबद्दल आ. जीवराज यांच्या विरोधात शृंगेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.नंतरचा खुलासाविरोधकांच्या टीकेनंतर जीवराज यांनी, मी असे वक्तव्य केलेच नव्हते, प्रसारमाध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे, असा खुलासा केला. सिद्धरामय्या सरकारने आधीच्या हत्यांचा नीट तपास करून आरोपींना तुरुंगात टाकले असते, तर गौरी लंकेश यांची हत्या झाली नसती, असे आपण म्हणालो, असा दावा त्यांनी केला. पण त्यांनी कानडीत केलेल्या भाषणाच्या चित्रफितीमधून त्यांनी गौरी यांच्या हत्येचे समर्थन केल्याचे स्पष्ट होते.कोण आहेत जीवराज : आ. जीवराज यांच्या विरोधात एका २३ वर्षीय महिलेच्या अपहरण व बलात्काराचा गुन्हा २0१३ साली दाखल करण्यात आला होता. गेल्या वर्षी चिकमंगळुरूमध्ये गोरक्षकांनी दलितांवर हल्ला केला होता. त्यानंतर जीवराज यांनी गोरक्षकांचे समर्थन केले होते.तपास दोन आठवड्यांत करागौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास एसआयटीने दोन आठवड्यांत पूर्ण करावा, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. पण तो दोन आठवड्यांतपूर्ण न झाल्यास आम्ही तपास सीबीआयकडे सोपवू, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Gauri Lankeshगौरी लंकेशGauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणCrimeगुन्हा