शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 23:20 IST

Swami Avimukteshwaranand Saraswati on Terrorism: बॉम्बस्फोट आपोआप तर झाले नसतील ना? हे कोणीतरी केले असतील ना? मग ते कोण आहेत? असे थेट सवाल शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केले.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणानंतर भगवा दहशतवाद या मुद्द्यावरून वाद सुरू झाला आहे. दहशतवादाला रंगाशी जोडण्याच्या या वादावर बोलताना शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत. "दहशतवादी हा दहशतवादीच असतो. भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार आहात का?", असा सवाल त्यांनी केला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

माध्यमांशी बोलताना स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले, "दहशतवादाला कोणताही रंग नसतो, तो दहशतवादच असतो. दहशतवादी येतात आणि घटना घडवून निघून जातात. तुम्ही दोषींना शोधू शकत नाही. मुंबईत ७ बॉम्बस्फोट झाले, पण तुम्ही आरोपींना शोधू शकले नाहीत. मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला, तुम्हाला आरोपी शोधता आले नाही", असे म्हणत अविमुक्तेश्वरानंद यांनी तपास यंत्रणा आणि सरकारच्या भूमिकेवरच सवाल केला. 

अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, दहशतवादाला रंग देणार पक्षपाती    "जेव्हा दहशतवाद्यांना शोधण्याचा मुद्दा येतो, तेव्हा स्वतःच्या उणीवा लपवल्या जातात आणि मग दहशतवादामध्ये रंग शोधत बसतात. रंग आयुष्याचा असतो. मेल्यानंतर तुमचे डोळे रंग बघत नाहीत. जे लोक दहशतवादामध्ये रंग शोधत असतात, ते दहशतवादाबद्दल पक्षपाती आहेत", असे खडेबोल स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी राजकारण्यांना सुनावले. 

"बॉम्बस्फोट आपोआपच झाले नसतील ना? कोणतीतरी बॉम्बस्फोट केले असतीलच ना? मग ते कोण आहेत? त्यांना शोधण्यामध्ये भारत सरकार, राज्यातील सरकार अयपशी ठरले आहे. कोणीतरी येतो आणि बॉम्बस्फोट करून निघून जातो मग आम्ही वेळ देऊन आणि पैसा खर्च करूनही त्यांना शोधू शकत नाही. हे म्हणजे आपल्या कार्यक्षमतेवर मोठी थापड बसण्यासारखेच आहे", असा संताप शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :TerrorismदहशतवादMalegaon Blastमालेगाव बॉम्बस्फोटMumbai Bomb Blastमुंबई बॉम्बस्फोटCourtन्यायालय