शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 23:20 IST

Swami Avimukteshwaranand Saraswati on Terrorism: बॉम्बस्फोट आपोआप तर झाले नसतील ना? हे कोणीतरी केले असतील ना? मग ते कोण आहेत? असे थेट सवाल शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केले.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणानंतर भगवा दहशतवाद या मुद्द्यावरून वाद सुरू झाला आहे. दहशतवादाला रंगाशी जोडण्याच्या या वादावर बोलताना शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत. "दहशतवादी हा दहशतवादीच असतो. भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार आहात का?", असा सवाल त्यांनी केला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

माध्यमांशी बोलताना स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले, "दहशतवादाला कोणताही रंग नसतो, तो दहशतवादच असतो. दहशतवादी येतात आणि घटना घडवून निघून जातात. तुम्ही दोषींना शोधू शकत नाही. मुंबईत ७ बॉम्बस्फोट झाले, पण तुम्ही आरोपींना शोधू शकले नाहीत. मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला, तुम्हाला आरोपी शोधता आले नाही", असे म्हणत अविमुक्तेश्वरानंद यांनी तपास यंत्रणा आणि सरकारच्या भूमिकेवरच सवाल केला. 

अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, दहशतवादाला रंग देणार पक्षपाती    "जेव्हा दहशतवाद्यांना शोधण्याचा मुद्दा येतो, तेव्हा स्वतःच्या उणीवा लपवल्या जातात आणि मग दहशतवादामध्ये रंग शोधत बसतात. रंग आयुष्याचा असतो. मेल्यानंतर तुमचे डोळे रंग बघत नाहीत. जे लोक दहशतवादामध्ये रंग शोधत असतात, ते दहशतवादाबद्दल पक्षपाती आहेत", असे खडेबोल स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी राजकारण्यांना सुनावले. 

"बॉम्बस्फोट आपोआपच झाले नसतील ना? कोणतीतरी बॉम्बस्फोट केले असतीलच ना? मग ते कोण आहेत? त्यांना शोधण्यामध्ये भारत सरकार, राज्यातील सरकार अयपशी ठरले आहे. कोणीतरी येतो आणि बॉम्बस्फोट करून निघून जातो मग आम्ही वेळ देऊन आणि पैसा खर्च करूनही त्यांना शोधू शकत नाही. हे म्हणजे आपल्या कार्यक्षमतेवर मोठी थापड बसण्यासारखेच आहे", असा संताप शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :TerrorismदहशतवादMalegaon Blastमालेगाव बॉम्बस्फोटMumbai Bomb Blastमुंबई बॉम्बस्फोटCourtन्यायालय