शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

रेल्वेला लेटमार्क लागला तर अधिकाऱ्यांच्या बढतीलाही लेटमार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:10 IST

रेल्वे उशिरा धावण्यामुळे त्रासलेल्या प्रवाशांना रेल्वे मंत्रालयाने मोठा दिलासा दिला आहे. यापुढे रेल्वेगाड्या वेळेवर धावतील. तसे झाले नाही तर त्याची किमत संबंधित अधिका-याला मोजावी लागेल व ते मोल असेल त्या अधिका-याच्या बढतीला विलंब.

नवी दिल्ली : रेल्वे उशिरा धावण्यामुळे त्रासलेल्या प्रवाशांना रेल्वे मंत्रालयाने मोठा दिलासा दिला आहे. यापुढे रेल्वेगाड्या वेळेवर धावतील. तसे झाले नाही तर त्याची किमत संबंधित अधिका-याला मोजावी लागेल व ते मोल असेल त्या अधिका-याच्या बढतीला विलंब.रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेच्या विभागीय प्रमुखांना यापुढे रेल्वे उशिरा धावल्यास त्यांचे मूल्यमापन त्या प्रमाणात लांबणीवर टाकले जाईल, असे सांगितले. गोयल यांनी अधिकाºयांना वक्तशीरपणे काम करण्यास महिनाभराची मुदत दिली आहे. गेल्या आठवड्यात अंतर्गत बैठकीत गोयल यांनी विभागीय महाव्यवस्थापकांना खडसावले व म्हटले की, रेल्वेगाड्यांच्या उशिरासाठी तुम्ही देखभालीची कारणे पुढे करू शकत नाहीत, असे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.- उत्तर रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना गोयल यांच्या संतापाला तोंड द्यावे लागले. या विभागात २९ मेपर्यंत ४९.५९ टक्के एवढीच कार्यक्षमता नोंदवली गेली. गेल्या वर्षी या कालावधीतील कार्यक्षमतेच्या तुलनेत यावेळी ३२.७४ टक्के घट झाली.- गोयल यांच्या भडिमाराला अधिकाºयाला तोंडद्यावे लागले तरी मंत्र्यांना हा विलंब मोठ्या प्रमाणावर रेल्वेमार्गांच्या नूतनीकरणामुळे झाल्याचे व त्याचा फटका अधिकाºयाला बसला असल्याचेमाहीत होते.- रेल्वेगाड्या वेळेवर धावण्याचे आकडे अपेक्षेपेक्षा फारच कमी होते. विभाग त्यांची अकार्यक्षमता लपवण्यासाठी देखभालीची कारणे पुढे करतात हे स्पष्टआहे, असे सूत्रांनी सांगितले. या बैठकीत गोयल यांनी प्रत्येक विभागीय प्रमुखाला व्यक्तिश: बोलावून घेतले व अत्यंत कमी गाड्या वेळेवर का धावल्या याचे स्पष्टीकरण मागितले.

टॅग्स :railwayरेल्वे