शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
2
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
3
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
4
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
5
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
7
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
8
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
9
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
10
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
11
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
12
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
13
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
14
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
15
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
16
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
18
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
19
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
20
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!

Rahul Gandhi: राहुल गांधींना "झटके पे झटका"! खासदारकी गेल्यानंतर, आता खाली करावा लागू शकतो बंगला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 20:53 IST

राहुल गांधी 2004 मध्ये लोकसभा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना हा बंगला देण्यात आला होता.

खासदारकी गेल्यानंतर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत आणखी वाढण्याची शक्यता आहे. गुन्हेगारी स्वरुपाच्या मानहानी खटल्यात उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही, तर राहुल गांधींना दिल्लीतील सरकारी बंगलाही महिनाभराच्या आत खाली करावा लागू शकतो. राहुल गांधी 2004 मध्ये लोकसभा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना हा बंगला देण्यात आला होता.

सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना 2019 च्या मानहानी प्रकरणात दोषी ठरविले आणि दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. यानंतर न्यायालयाने त्यांना लगेचच जामीन मंजूर करत उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी 30 दिवसांची मुदतही दिली आहे. यानंतर, लोकसभा सचिवालयाने शुक्रवारी त्यांना खासदार म्हणून अपात्र ठरवले आहे. यासंदर्भात बोलताना, गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, लोकसभेने अपात्र ठरवल्यानंतर,  राहुल गांधींना सरकारी निवासस्थानात राहण्याचा अधिकार नाही. नियमानुसार त्यांना आपात्र ठरवल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत बंगला खाली करावा लागेल.

2020 मध्ये प्रियांका गांधींनाही खाली करावा लागला होता बंगला -काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनाही जुलै 2020 मध्ये लोधी इस्टेट येथील त्यांचा सरकारी बंगला रिकामा करावा लागला होता. कारण त्यांची सुरक्षा कमी केल्यानंतर त्या त्यासाठी पात्र नव्हत्या. राहुल गांधींना दोषी ठरविणे आणि अपात्र ठरवण्याविरोधात राजकीय आणि कायदेशीर लढाई शेवटच्या श्वासापर्यंत लढू, असे काँग्रेस पक्षाने म्हटले आहे.

प्रियांका गांधींचे ट्विट - यासंदर्भात प्रियंका गांधींनी ट्विट करत आपला संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, 'नरेंद्र मोदीजी तुमच्या चमचांनी एका शहीद पंतप्रधानाच्या मुलाला देशद्रोही, मीर जाफर म्हटले. तुमच्याच एका मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधीचे वडील कोण? असा सवाल केला होता. कश्मीरी पंडितांच्या परंपरेनुसार, एक मुलगा वडिलांच्या मृत्यूनंतर डोक्यावर पगडी घालतो.'

'तुम्ही संसदेसमोर आमचे कुटुंब आणि कश्मीरी पंडितांचा अपमान केला आणि नेहरू आडनाव का लावत नाही, असा सवाल केला. पण, तुम्हाला तर कोणत्याही न्यायाधीशाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली नाही. तुम्हाला संसदेतून अपात्रही ठरवले नाही. एक सच्चा देशभक्त म्हणून राहुलने गौतम अदानी, नीरव मोदी आणि मेहूल चौकसीच्या लुटीवर प्रश्न विचारला होता,' असेही प्रियांका म्हणाल्या.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधी